शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

अभिजात मराठी ५०० कोटींची

By admin | Updated: March 21, 2017 01:58 IST

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित का आहे? तर हा दर्जा मिळाला, तर भाषेसाठी ५०० कोटींची तरतूद

डोंबिवली : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित का आहे? तर हा दर्जा मिळाला, तर भाषेसाठी ५०० कोटींची तरतूद करावी लागेल. अर्थात हा सगळाच निधी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या कामावरच खर्च केला जाणार नाही. पण या निधीची तरतूद करावी लागेल. तेच अर्थकरण यामागे दडले आहे, असा गौप्यस्फोट अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी केला.यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषेसाठी केवळ १७ कोटींची तरतूद आहे. म्हणजे प्रति व्यक्ती एक रुपयाही सरकार देऊ शकत नाही. म्हणजे सरकार किती करंटे आहे. आपण केवळ अंधारात चाचपडत आहोत. सरकारकडे पैसे नाही. त्यामुळे केवळ ही कोंडी आहे. महाराष्ट्राच्या एकूण अर्थसंकल्पातील तरतुदीपैकी केवळ ४३ टक्केच रक्कम खर्ची होते. मग उर्वरित ५७ टक्के रक्कमेचे काय होते? विविध प्रकरणांत दिला जाणारा निधी खर्चच केला जात नाही. तो परत सरकारकडे पाठवला जातो. ही गंभीर बाब आहे. केंद्राच्या धोरणाप्रमाणे ग्रंथ विकासावर व ग्रंथालयावर प्रत्येक वर्षी प्रतिव्यक्ती केवळ ६० पैसे खर्च होतात. भाषाही दुय्यम प्राधान्याची झाली आहे. लेखक, साहित्यिक, कलावंत यांच्या मागे सरकार उभे राहत नाही. मराठी ही ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे, असे पाहिल्यांदाच निसंदिग्धपणे मुख्यमंत्री संमेलनाच्या व्यासपीठावर बोलले होते. एवढाच दबाव आपण तयार करू शकलो आहोत, असे ते म्हणाले.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेले नाही. ज्ञानभाषा न झाल्यामुळे मराठीची पीछेहाट होत आहे. राज्य सरकार त्यासाठी कोणतेही ठोस पवित्रा घेताना दिसत नाही. त्यामुळे राज्यभरातील मराठीसाठी काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्यव्यापी चळवळ उभारली जावी, यासाठी पहिली बैठक साहित्य संमेलनाच्या कार्यालयात पार पडली. मराठी भाषा संरक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शांताराम दातार यांनी, महामंडळाने मराठी भाषेसाठी राज्यव्यापी चळवळ उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. बैठकीला संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे, स्वागताध्यक्ष गुलाब वझे, मसापच्या पुणे शाखेचे प्रकाश पायगुडे, शांताराम दातार आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)