शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

तीनही पक्षांचा विजयाचा दावा

By admin | Updated: February 15, 2016 02:53 IST

पालघर विधानसभेच्या काल झालेल्या निवडणुकी मध्ये ६५.२४ ला मतदान झाले. २०१४ साली झालेल्या निवडणुकी पेक्षा(६८ टक्के) ह्या पोटनिवडणुकी मध्ये मतदरांमध्ये उत्साह नसल्याने

पालघर : पालघर विधानसभेच्या काल झालेल्या निवडणुकी मध्ये ६५.२४ ला मतदान झाले. २०१४ साली झालेल्या निवडणुकी पेक्षा(६८ टक्के) ह्या पोटनिवडणुकी मध्ये मतदरांमध्ये उत्साह नसल्याने कमी मतदान झाल्याचे दिसून आले. वाढवण बंदराची मेक इन इंडिया कार्यक्रमात असलेली चर्चा, काही उमेदवारांना झालेली पक्षबाह्य मदत, आणि पाड्यापांड्यातून मतदारांना मतदानासाठी काढण्यात मिळालेले यश इ. कारणांमुळे तिन्ही प्रमुख उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. या मतदाना वेळी भाजपा व मित्र पक्षांनी आपल्याला किनारपट्टी वरील मतदारांनी साथ दिल्याचा दावा केला आहे. तर पालकमंत्र्यांनी विजय आमचाच असून दुसऱ्या क्रमांकासाठी काँंग्रेस आणि बहुजन विकास आघाडीत लढत झाली, अशी मल्लिनाथी केली आहे. पालघर विधानसभेचे आमदार कृष्णा घोडा यांचे अकस्मित निधन झाल्याने पालघरसाठी शनिवारी मतदान पार पडले. शिवसेनेकडून अमित घोडा, काँग्रेसकडून राजेंद्र गावित, बहुजन विकास आघाडीकडून मनिषा निमकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून जग्गनाथ वरठा तर बहुजन मुक्ती पार्टीकडून दिलीप धूमाँडा इ.उमेदवार रिंगणात होते. परंतु खरी लढत ही शिवसेना कांग्रेस आणि बहुजन विकास आघाडी या तीन पक्षात झाली. सेनेला भाजपा, रिपाईची साथ. काँग्रेसला राष्ट्रवादी,जनता दल,तर बहुजन विकास आघाडी ला दलित पैंथर सह अन्य संघटनांची साथ मिळाली होती.सन २०१४ साली झालेल्या विधान सभा निवडणुकीत एकूण २ लाख ४१ हजार ०४४ मतदान पैकी १लाख ६४ हजार १८९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला होता(६८.४टक्के) मतदान झाले होते. कल झालेल्या निवडणुकी साठी एकूण २लाख ४७ हजार ५९६ मतदार पैकी १लाख ६४ हजार १८९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवाला.त्यापैकी पुरुष ८५ हजार ६१७ , स्त्रिया ७५हजार ९०८ तर इतर १०मतदारांचा समावेश होता. त्यामुळे एकूण ६५-२४ मतदान झाले मतदरा मध्ये ६ हजार५५२ मतदारांची वाढ झाली असेल तरी मागच्या वेळा पेक्षा २.७६ टक्के मतदान कमी झाले. या प्रचारात वाढवण बंदर हा प्रमुख मुद्दा समोर आला होता. सेनेने मुख्यमंत्री, सेनाध्यक्ष यांच्या सह मंत्री, खासदार, पदाधिकारी यांना तर कांग्रेसने माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते , खासदार, आमदार यांना तर बविआची सारी सूत्रे अध्यक्ष व आमदार हितेन्द्र ठाकुर यांनी हाती ठेवली होती.