शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन सोडून, शहर अभियंता रजेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:31 IST

कल्याण-डोंबिवली शहरांतील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा मृत्यू तसेच ते जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा मृत्यू तसेच ते जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीतही भर पडत असल्याने महापालिका प्रशासन टीकेचे लक्ष्य होत आहे. असे असतानाही प्रशासनाने खड्डे भरण्याचे योग्य नियोजनच केले नाही. जनसामान्यांसाठी महत्त्वाचे असलेले नियोजन वाऱ्यावर सोडून शहर अभियंत्या सपना कोळी-देवनपल्ली या गणेशोत्सवात आयुक्त गोविंद बोडके यांच्या परवानगीविनाच रजेवर गेल्याची बाब उघडकीस आली आहे.खड्डे भरण्यावर महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. खड्डे भरण्याचे नियोजन फेब्रुवारीत होणे अपेक्षित आहे. मात्र, यंदा ते झाले नाही. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या कामात महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी जुंपले गेले. आचारसंहितेमुळे खड्डे भरण्याचे विषय मंजूर होण्यास विलंब झाला. आचारसंहितेच्या कचाट्यातून खड्डे भरण्यासारखे महत्त्वाचे विषय वगळावेत, अशी विनंती महापालिका प्रशासनातर्फे आयुक्तांनी निवडणूक आयोगाला केली होती. आयोगाने त्याला सूट दिल्यावर त्यानंतर झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत खड्डे भरण्याच्या विषयाला मंजुरी मिळाली. त्यानंतर पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविले जाणे अपेक्षित होते. आयुक्तांनी तसे आदेशही दिले होते. मात्र, प्रशासनाने ते गांभीर्याने घेतले नाहीत.२६ जुलै, ४ आॅगस्ट, ४ सप्टेंबर या तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची दैना झाली. अनेक रस्ते वाहून गेले. तर, अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हे खड्डे नागरिक व वाहनचालकांच्या जीवावर बेतले आहेत. आधीच कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची पूलकोंडी झालेली असताना त्यात खड्ड्यांची भर पडली.कल्याण शहरात मागील वर्षीही खड्ड्यांमुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पालकमंत्र्यांनी तत्कालीन शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. कुलकर्णी निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी सरकारने सपना कोळी-देवनपल्ली यांची नियुक्ती केली.शहरात गणेशाचे आगमन व विसर्जन खड्डेमय रस्त्यांतूनच झाले. या कालावधीत कोळी-देवनपल्ली यांनी शहरात असणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी गणेशोत्सवात रजेचा अर्ज बोडके यांच्याकडे सादर केला होता. मात्र, त्यावर आयुक्तांनी सही केली नाही. चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असा शेरा आयुक्तांनी अर्जावर मारला होता. तरीही, कोळी-देवनपल्ली यांनी आयुक्तांना केवळ रजेचा अर्ज माहितीसाठी असल्याचे कळवत रजेवर जाणे पसंत केले. आयुक्तांनी त्यांच्या रजेचा अर्ज मंजूर केलेला नसतानाही त्या रजेवर गेल्या. आयुक्त व शहर अभियंता हे पद समकक्ष असल्याचे कारण देत त्यांनी ही कृती केली आहे. यासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.>प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आयुक्तांना जुमानत नाहीत. यापूर्वी मुख्य लेखा व वित्त अधिकारी का.बा. गर्जे यांच्यातील वाद नगरविकास खात्यापर्यंत पोहोचला होता. तोच कित्ता कोळी-देवनपल्ली गिरवत आहेत. उपायुक्त धनाजी तोरसकर हे देखील न सांगताच रजेवर गेले होते.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका