शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भातसाजवळील खैरपाड्यातील नागरिकांची टँकरवरच मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:00 IST

विहिरीची अवस्था बिकट : शिडी टाकून काढावे लागते पाणी, जानेवारीपर्यंतच असतो साठा

जनार्दन भेरे/वसंत पानसरेभातसानगर : शहापूर तालुक्यातील डोंगरदऱ्यांवर तसेच दूर अंतरावर असलेल्या गावपाड्यांवर तर पाणीटंचाईचे सावट आहेच. पण, भातसा धरणाच्या खालीच असलेल्या पाड्यावरही टंचाईची समस्या निर्माण झाल्याचे दिसते आहे. भातसा धरणाच्या खाली आणि नदीच्या पात्रापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेला पाडा म्हणजे खैरपाडा. या पाड्यात केवळ १६ घरे असली, तरी पाड्याची लोकसंख्या १५० च्या जवळपास आहे. या पाड्यातील घरांची संख्या २७ आहे. १६ घरे असणाºया या खैरपाड्यात मात्र, नागरिक पाण्यासाठी टँकरच्या येण्याकडे डोळे लावून बसतात. या गावाला दररोज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या नागरिकांसाठी पाण्यासाठीचा इतर कोणताच सोर्स नसल्याने त्यांची सारी मदार टँकरवरच आहे. या पाड्यातील एकमेव विहीर ही शेताच्या बांधाच्या बाजूला आहे. या विहिरीत पाणी झिरपण्यास कोणत्याही झºयाचा स्रोत नसल्याने ही विहीर केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. हे पाणी जानेवारीपर्यंत पुरते. त्यानंतर मात्र, गावकऱ्यांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.

विहिरीतील पाणी कमी झाले की, विहिरीत शिडी टाकून पाणी काढून घेतले जाते. गावाला विहिरीची गरज असून जर गावाच्या आजूबाजूला आणखी विहिरी असल्या तर पाण्याच्या टंचाईवर बºयापैकी मात करता येईल, असे मत सरलांबे ग्रामपंचायतीचे सदस्य भास्कर सोमा रेरा यांनी सांगितले.

पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने टँकर कधी येतो, याची वाट पाहावी लागते. सध्या गावाच्या बाजूला टाक्या ठेवून त्यामध्ये टँकरने पाणी टाकले जाते. - गुरु नाथ शिडू रेरा, ग्रामस्थ

तानसा धरणाखालील सावरदेव आदिवासीपाड्याला भीषण टंचाईकिन्हवली : मुंबई, ठाण्यासह उपनगरांची तहान भागवणाºया शहापूर तालुक्यातील धरणांच्या उशाशी असणाºया गावपाड्यांमध्ये भयंकर पाणीटंचाई असून तालुक्यातील तानसा धरणाखाली असणाºया सावरदेव या २०० आदिवासी लोकवस्तीच्या पाड्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. समोर पाणी दिसत असूनही घसा कोरडाच असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आदिवासी महिला व्यक्त करत आहेत.

तानसा अभयारण्याच्या कुशीत आणि तानसा तलावाला लागून असलेल्या या आदिवासीपाड्यात ४० ते ५० घरे आहेत. जेमतेम २०० लोकसंख्या असूनही या महिलांना हंडाभर पाण्यासाठी तासन्तास ताटकळावे लागते.अघई ग्रामपंचायत हद्दीत असणाºया या पाड्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याबरोबरच पाण्यासाठी अनेकदा पहाटेपहाटे तळ गाठलेल्या विहिरीवर महिलांना जावे लागते.

या आदिवासीपाड्यामध्ये शासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात का होईना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आम्ही पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. - भानुदास भोईर, ग्रामस्थ

सावरदेव गावातील पाणी आटल्याने त्यांना टंचाई जाणवते आहे. सुरुवातीला ग्रामस्थांनी टँकरचा पाणी घ्यायला नकार दिला होता. येथील लोकसंख्या १८० असून त्यांना टँकरने १२ हजार लीटर पाणी दिवसाआड देण्यास नुकतीच सुरुवात केली आहे. - एम. आव्हाड, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग, पं. समिती, शहापूर

टॅग्स :ambernathअंबरनाथwater shortageपाणीटंचाई