शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

भातसाजवळील खैरपाड्यातील नागरिकांची टँकरवरच मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:00 IST

विहिरीची अवस्था बिकट : शिडी टाकून काढावे लागते पाणी, जानेवारीपर्यंतच असतो साठा

जनार्दन भेरे/वसंत पानसरेभातसानगर : शहापूर तालुक्यातील डोंगरदऱ्यांवर तसेच दूर अंतरावर असलेल्या गावपाड्यांवर तर पाणीटंचाईचे सावट आहेच. पण, भातसा धरणाच्या खालीच असलेल्या पाड्यावरही टंचाईची समस्या निर्माण झाल्याचे दिसते आहे. भातसा धरणाच्या खाली आणि नदीच्या पात्रापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेला पाडा म्हणजे खैरपाडा. या पाड्यात केवळ १६ घरे असली, तरी पाड्याची लोकसंख्या १५० च्या जवळपास आहे. या पाड्यातील घरांची संख्या २७ आहे. १६ घरे असणाºया या खैरपाड्यात मात्र, नागरिक पाण्यासाठी टँकरच्या येण्याकडे डोळे लावून बसतात. या गावाला दररोज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या नागरिकांसाठी पाण्यासाठीचा इतर कोणताच सोर्स नसल्याने त्यांची सारी मदार टँकरवरच आहे. या पाड्यातील एकमेव विहीर ही शेताच्या बांधाच्या बाजूला आहे. या विहिरीत पाणी झिरपण्यास कोणत्याही झºयाचा स्रोत नसल्याने ही विहीर केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. हे पाणी जानेवारीपर्यंत पुरते. त्यानंतर मात्र, गावकऱ्यांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.

विहिरीतील पाणी कमी झाले की, विहिरीत शिडी टाकून पाणी काढून घेतले जाते. गावाला विहिरीची गरज असून जर गावाच्या आजूबाजूला आणखी विहिरी असल्या तर पाण्याच्या टंचाईवर बºयापैकी मात करता येईल, असे मत सरलांबे ग्रामपंचायतीचे सदस्य भास्कर सोमा रेरा यांनी सांगितले.

पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने टँकर कधी येतो, याची वाट पाहावी लागते. सध्या गावाच्या बाजूला टाक्या ठेवून त्यामध्ये टँकरने पाणी टाकले जाते. - गुरु नाथ शिडू रेरा, ग्रामस्थ

तानसा धरणाखालील सावरदेव आदिवासीपाड्याला भीषण टंचाईकिन्हवली : मुंबई, ठाण्यासह उपनगरांची तहान भागवणाºया शहापूर तालुक्यातील धरणांच्या उशाशी असणाºया गावपाड्यांमध्ये भयंकर पाणीटंचाई असून तालुक्यातील तानसा धरणाखाली असणाºया सावरदेव या २०० आदिवासी लोकवस्तीच्या पाड्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. समोर पाणी दिसत असूनही घसा कोरडाच असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आदिवासी महिला व्यक्त करत आहेत.

तानसा अभयारण्याच्या कुशीत आणि तानसा तलावाला लागून असलेल्या या आदिवासीपाड्यात ४० ते ५० घरे आहेत. जेमतेम २०० लोकसंख्या असूनही या महिलांना हंडाभर पाण्यासाठी तासन्तास ताटकळावे लागते.अघई ग्रामपंचायत हद्दीत असणाºया या पाड्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याबरोबरच पाण्यासाठी अनेकदा पहाटेपहाटे तळ गाठलेल्या विहिरीवर महिलांना जावे लागते.

या आदिवासीपाड्यामध्ये शासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात का होईना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आम्ही पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. - भानुदास भोईर, ग्रामस्थ

सावरदेव गावातील पाणी आटल्याने त्यांना टंचाई जाणवते आहे. सुरुवातीला ग्रामस्थांनी टँकरचा पाणी घ्यायला नकार दिला होता. येथील लोकसंख्या १८० असून त्यांना टँकरने १२ हजार लीटर पाणी दिवसाआड देण्यास नुकतीच सुरुवात केली आहे. - एम. आव्हाड, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग, पं. समिती, शहापूर

टॅग्स :ambernathअंबरनाथwater shortageपाणीटंचाई