शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

डोंबिवलीतील नागरिक वायू प्रदूषणामुळे हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शहरात दोन दिवसांपासून सायंकाळच्या वेळेला पुन्हा रसायनाचा उग्र दर्प येत आहे. यामुळे खंबाळपाडा, ९० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : शहरात दोन दिवसांपासून सायंकाळच्या वेळेला पुन्हा रसायनाचा उग्र दर्प येत आहे. यामुळे खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता, पेंडसेनगर, सुनीलनगर, नांदिवली, डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानक परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. उग्र दर्पामुळे आबालवृद्धांना त्रास झाला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

डोंबिवलीतील प्रदूषणाच्या समस्येबाबत शिवसेनेने प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पक्षाचे राजेश कदम व काही जण एमआयडीसी परिसरात उग्र दर्प कुठून येत आहे, याचा शोध घेत होते. मात्र, एमआयडीसीत तो संदिग्ध दर्प येत नव्हता. कदाचित रासायनिक टाकाऊ पदार्थाचा, द्रव असलेला टँकर कल्याण दिशेला खाडीत किंवा फेज १ जवळच्या नाल्यात रिता केल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, असे कदम म्हणाले.

जर कोणास काही संशयास्पद अथवा दर्प जाणवल्यास जवळच्या शिवसेना शाखेत त्वरित संपर्क साधावा, असे ते म्हणाले. पुढील दोन दिवस शिवसेनेचे एक पथक एमआयडीसी परिसरात प्रदूषण करणाऱ्या प्रवृत्तींचा शोध घेणार आहे. अशावेळी कोणी आढळल्यास त्याला शिवसेना आपल्या परीने न्याय देईल. तसेच प्रदूषण व इतर बाबींबाबत शहर शाखेतर्फे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, डोंबिवली ॲक्शन कमिटी फॉर सिव्हिक ॲण्ड सोशल होप्सतर्फे (दक्ष) सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. त्याचबरोबर प्रदूषण मंडळाकडे नागरिकांनी तक्रारी कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले. या उग्र दर्पाची जाहीर चौकशी करण्याची मागणी अनेकांनी केली.

कोट

डोंबिवली, कल्याण, ठाकुर्ली, २७ गावे येथेही उग्र दर्प येत होता. मागील ३० वर्षांतील सर्वात उग्र दर्प शुक्रवारी जाणवत होता. याबाबत काही जागरूक नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या. सुदैवाने यात कोणतीही गंभीर घटना घडली नाही. रात्री अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत उग्र वासाचे प्रदूषण कमी झाली होती. शुक्रवार हा एमआयडीसीमधील साप्ताहिक सुट्टीचा वार आहे. तरीही रासायनिक प्रदूषण कसे पसरले, याचाही तपास यंत्रणेने करावा. शासनाने तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी.

- राजू नलावडे, सचिव, डोंबिवली वेलफेअर असोसिएशन