शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिकेच्या कोविड केअर आणि अलगीकरण कक्षात नागरिकांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 19:14 IST

मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील कोरोनाचा संसर्ग पाहता भाईंदरच्या क्रिडा संकुला जवळील इमारतीं मध्ये अलगीकरण केंद्र सुरु केले होते. रुग्णांची वाढती संख्या पाहुन लक्षणं नसलेल्यांसाठी रामदेव पार्क जवळील इमारतीत कोविड केअर सुरु करण्यात आले.

लोकमत न्युज नेटवर्कमीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भोंगळ आणि गैरकारभाराची लक्तरे खुद्द कोविड केअर व अलगीकरण कक्षात ठेवलेल्या नागरिकां कडुनच नियमीतपणो वेशीवर टांगली जात आहेत. निकृष्ट जेवण व नाश्ता आणि तो देखील वेळेवर न मिळणो, पिण्यास व आंघोळीस गरम पाणी नाही, साफसफाई नाही यातुनच लहानु मुलांचे व वृध्दांचे होणारे अतोनात हाल यावरुन लोकं संतप्त होऊन खाली उतरुन हल्लाबोल करत आहेत. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला घरी सोडा, वाटल्यास घरा बाहेर टाळे मारुन आम्हाला आत ठेवा चालेल असा उद्वेग लोकांचा चालला आहे. त्यामुळे एरव्ही करदात्या जनतेची उधळपट्टी करणारे नगरसेवक, राजकारणी आणि अधिकारी जनतेच्या तोंडाला मात्र पाने पुसत असल्याचे निषेध व्यक्त होत आहे.मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील कोरोनाचा संसर्ग पाहता भाईंदरच्या क्रिडा संकुला जवळील इमारतीं मध्ये अलगीकरण केंद्र सुरु केले होते. रुग्णांची वाढती संख्या पाहुन लक्षणं नसलेल्यांसाठी रामदेव पार्क जवळील इमारतीत कोविड केअर सुरु करण्यात आले. अलगीकरण केंद्रात कोरोना नसलेले पण संशयीत तर कोविड केअर मध्ये कोरोना रुग्णांना पालिका ठेवत आहे. महापालिकेने सदर दोन्ही ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या नागरिकांना नाश्ता, चहा व जेवण पुरवण्यासाठी ठेकेदार नेमला आहे.परंतु सदर जेवणा बाबत मोठय़ा संख्येने लोकांच्या तक्रारी असुन कच्च्या चपात्या, बेचव जेवण, कधी आंबुस तर कधी भातात अळ्या वा केस सापडणे या सारख्या लोकांच्या तक्रारी आहेत. नाश्ता बद्दल देखील तक्रारी असुन जेवण - नाश्ता वेळेत मिळत नाही जेणे करुन अन्य आजाराची औषधे घेणारे वा ज्येष्ठांचे हाल होत आहेत. लहान मुलं तर सोडा मोठे देखील कसेबसे जेवण जेवतात.गरम पाणी पिण्यास वेळेवर मिळत नाही. उन्हाळा होता तेव्हा ठिक होते पण पावसाळा सुरु झाल्याने थंड पाण्याने आंघोळ लहानु मुलं - मोठय़ांनी कशी करायची ? असा प्रश्न लोकं करत आहेत. थंडपाण्याने  आंघोळ केल्याने ताप, सर्दी आदी आजार होण्याची भिती वाटत आहे. पालिकेने येथे साफसफाईसाठी देखील ठेका दिला असला तरी स्वच्छतेची बोंबच आहे. सफाई नियमीत नसल्याने घाणीत रहावे लागत असुन महिलांनी तर आम्हालाच फिनाईल, झाडु आदी द्या आम्हीच खोली साफ करु असे प्रशासनास सुनावले.  पालिका कोरोना रुग्ण व संशयीतांना अलगीकरणात ठेवण्यासाठी आणते पण निदान चांगले जेवण, नाश्ता , दूध वेळेवर नाही. स्वच्छता सफाई नाही ? मग आम्हाला आणताच कशाला असा संताप लोकांनी बोलुन दाखवला. आम्ही घरी राहु , इकडे राहिलो तर आजारी पडुन मरुन जाऊ असे वाटायला लागल्याचे लोकांनी सांगीतले. लोकं नेहमीच खाली उतरुन संताप व्यक्त करत असुन यातुन गोंधळ होऊन सोशल डिस्टंसिंग देखील राहिलेले नाही.नगरसेवक, राजकारणी व अधिकारी महापालिकेतील स्वता:च्या आलिशान दालनं, खान-पान , कार्यक्रम व पर्यटन दौरायांवर जनतेच्या पैशांतुन उधळपट्टी करतात. त्यासाठी त्यांना जेवण चमचमीत दर्जेदार व सर्व सुविधा पंचतारांकित लागतात पण येथे शहरातील कोरोना ग्रस्त नागरिकांच्या माथी मात्र निकृष्ट आणि गैरसोयीचा डोंगर मारला आहे. टेंडर आणि अवास्तव कामांसाठी पैशांची समिकरणे जुळवले जातात पण नागरिकांच्या वैद्यकिय सुविधेसाठी देखील यांची वाटमारी चालते असा संताप लोकांनी बोलुन दाखवला. नगरसेवक, नेते व अधिकारायांनी देखील पालिकेच्या कोविड केअर आणि अलगीकरण कक्षात राहुन दाखवावे असे आवाहन नागरिकां मधुन केले जात आहे.