शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

बारावे डम्पिंगला नागरिकांचा विरोध

By admin | Updated: March 10, 2016 02:11 IST

शहरातील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करून बारावे येथे शास्त्रोक्त भरावभूमी विकसित करण्याच्या निविदेस कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

कल्याण : शहरातील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करून बारावे येथे शास्त्रोक्त भरावभूमी विकसित करण्याच्या निविदेस कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या भरावभूमीच्या विरोधात बुधवारी बारावे येथील नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.नगरसेविका रजनी मिरकुटे यांच्या नेतृत्वाखाली बारावे हिल रोड रेसिडेन्शीयल असोसिएशनतर्फे हा मोर्चा काढण्यात आला. त्यात भाजपाचे अर्जून भोईर, प्रेमनाथ म्हात्रे, असोसिएशनचे पदाधिकारी सुनील घेगडे, मनोज पाटील, सुभाष मिरकुटे व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भरावभूमीच्या प्रस्तावित जागेपासून लोकवस्तीपासून २०० मीटरवर आहे. तसेच या परिसरात वनी, पोतदार आणि ट्री हाऊस या शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होईल. त्यामुळे बारावे भरावभूमी विकसित करू नये, अशी मागणी नागरिाकंनी लावून धरली. महापालिका प्रवेशद्वाराजवळ त्यांनी महापालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ३५ वर्षांपासून सरू असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात आल्याने ते बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेस दिले. त्या आधारे महापालिकेने हे डम्पिंग शास्त्रोक्तपद्धतीने बंद करण्यासाठी २८ कोटी रुपयांची निविदी मंजूर केली आहे. आधारवाडी बंद केल्याने कचऱ्यासाठी शास्त्रोक्त भरावभूमी बारावे येथे विकसित करण्यासाठी १९ कोटी रुपयांच्या निविदेस स्थायी समितीने २२ फेब्रुवारीला मंजुरी दिली. परंतु, त्यास नागरिकांनी विरोध केल्याने या भरावीभूमीबाबचे भवितव्य अडचणीत आले आहे.सुरक्षारक्षकांकडून अडवणूकमहापालिकेच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांनी नागरिकांच्या शिष्टमंडळास पालिका मुख्यालयात सोडले नाही. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पत्रकार विशाल वैद्य यांना सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केली. शिवसेना पदाधिकारी व माजी परिवहन समिती सभापती रवींद्र कपोते यांनाही सुरक्षारक्षकांनी आडविल्याने ते प्रचंड संतप्त झाले. महापौर राजेंद्र देवळेकर आणि गनटेते रमेश जाधव यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर प्रकरण निवळले. महाालिकेचा सगळा कचरा बारावे भराव भूमीवर टाकला जाणार नाही. अन्य ठिकाणीही भरावभूमी विकसित केली जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बारावे विकसित करण्ो महापालिकेस बंधनकारक आहे. तरीही नागरिकांच्या मागणीचा विचार केला जाईल. - राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण डोंबिवली