शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शहरे महापालिका नव्हे बिल्डर लॉबी चालवते; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:11 IST

ठाण्यातील आझाद नगर सर्कल येथे देवीच्या दर्शनासाठी ते आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकांमध्ये लोकप्रतिनिधींची गरज असते. त्यांच्या माध्यमातूनच सभागृहात आवाज उठवला जातो. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणे गरजेचे असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ज्या सोयीसुविधा महापालिकेने देणे अपेक्षित असते, त्या सुविधा विकासक देतात आणि पैसे कमावतात. त्यामुळे शहर हे महापालिका नाही तर बिल्डर लॉबी चालवत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

ठाण्यातील आझाद नगर सर्कल येथे देवीच्या दर्शनासाठी ते आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी राज यांनी शहरातील वाहतूक समस्या ते पॅनल पध्दतीने होत असलेल्या निवडणुकांबाबत चर्चा केली. मुळात पॅनल पध्दतीने निवडणुका ही काही राजकीय पक्षांची सोय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजप यांनी ही पॅनल पध्दतीने निवडणुका घेण्याचे का ठरवले हा प्रश्न आहे. यापूर्वी निवडणुका होत नव्हत्या का, असा प्रश्न त्यांनी केला. या पॅनल पध्दतीत एकाच पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्येच एकमत नसते. मग नागरिकांच्या समस्या कशा सुटतील असेही ते म्हणाले. परंतु केवळ आपल्या फायद्यासाठी ही पॅनल पध्दती आणली गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

वाहतूक समस्या सोडवायची असेल तर... वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ठोस नियमावली हवी. एका व्यक्तीकडे किती वाहने हवी यालाही मर्यादा हव्यात, मुळात आपल्या येथील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सवय लागणे गरजेचे आहे.  मेट्रोसारखे प्रकल्प तरच यशस्वी होऊ शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महत्त्वाचे म्हणजे ज्या सोयीसुविधा महापालिका प्रशासनाने देणे गरजेचे आहे. त्या सुविधा बिल्डर पुरवितात.  त्यामुळे शहरे ही महापालिका नव्हे तर बिल्डर चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला.  शहर सुधारायचे असेल तर त्यासाठी काय पर्याय असू शकतो, असा सवाल त्यांना केला व लागलीच मीच शहर सुधारू शकतो, असे उत्तर दिले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे