शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शहरे महापालिका नव्हे बिल्डर लॉबी चालवते; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:11 IST

ठाण्यातील आझाद नगर सर्कल येथे देवीच्या दर्शनासाठी ते आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकांमध्ये लोकप्रतिनिधींची गरज असते. त्यांच्या माध्यमातूनच सभागृहात आवाज उठवला जातो. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणे गरजेचे असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ज्या सोयीसुविधा महापालिकेने देणे अपेक्षित असते, त्या सुविधा विकासक देतात आणि पैसे कमावतात. त्यामुळे शहर हे महापालिका नाही तर बिल्डर लॉबी चालवत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

ठाण्यातील आझाद नगर सर्कल येथे देवीच्या दर्शनासाठी ते आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी राज यांनी शहरातील वाहतूक समस्या ते पॅनल पध्दतीने होत असलेल्या निवडणुकांबाबत चर्चा केली. मुळात पॅनल पध्दतीने निवडणुका ही काही राजकीय पक्षांची सोय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजप यांनी ही पॅनल पध्दतीने निवडणुका घेण्याचे का ठरवले हा प्रश्न आहे. यापूर्वी निवडणुका होत नव्हत्या का, असा प्रश्न त्यांनी केला. या पॅनल पध्दतीत एकाच पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्येच एकमत नसते. मग नागरिकांच्या समस्या कशा सुटतील असेही ते म्हणाले. परंतु केवळ आपल्या फायद्यासाठी ही पॅनल पध्दती आणली गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

वाहतूक समस्या सोडवायची असेल तर... वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ठोस नियमावली हवी. एका व्यक्तीकडे किती वाहने हवी यालाही मर्यादा हव्यात, मुळात आपल्या येथील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सवय लागणे गरजेचे आहे.  मेट्रोसारखे प्रकल्प तरच यशस्वी होऊ शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महत्त्वाचे म्हणजे ज्या सोयीसुविधा महापालिका प्रशासनाने देणे गरजेचे आहे. त्या सुविधा बिल्डर पुरवितात.  त्यामुळे शहरे ही महापालिका नव्हे तर बिल्डर चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला.  शहर सुधारायचे असेल तर त्यासाठी काय पर्याय असू शकतो, असा सवाल त्यांना केला व लागलीच मीच शहर सुधारू शकतो, असे उत्तर दिले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे