शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
4
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
5
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
6
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
7
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
8
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
9
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
10
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
11
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
12
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
13
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
14
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
15
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
16
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
17
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
18
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
19
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
20
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!

जागावापरात बदल न करताच रेल्वे स्थानकांच्या आवारात सिडको २५ हजार घरे बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 04:49 IST

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडको आपल्या कार्यक्षेत्रात जी ९० हजार घरे बांधणार आहे, त्यातील २५ हजार १०४ घरे सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि मानसरोवर या चार रेल्वे स्थानकांच्या आवारात बांधण्यात येणार आहेत.

- नारायण जाधव ठाणे : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडको आपल्या कार्यक्षेत्रात जी ९० हजार घरे बांधणार आहे, त्यातील २५ हजार १०४ घरे सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि मानसरोवर या चार रेल्वे स्थानकांच्या आवारात बांधण्यात येणार आहेत. जागेच्या वापरात बदल न करताच सिडकोने मनमानीपणे घेतलेल्या या निर्णयामुळे या स्थानकांच्या परिसराचा श्वास गुदमरणार असून, त्या परिसरातील पायाभूत सुविधांवरही मोठा ताण पडणार आहे. ही २५ हजार घरे बांधण्यासाठी सिडको ३,५७३ कोटी रुपये खर्च करणार असून, येत्या तीन वर्षांत ती बांधण्यात येणार आहेत.सिडकोने निविदा प्रक्रिया सुरू करूनही नवी मुंबई आणि पनवेल महापालिका अद्यापही साखरझोपेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.गेल्या वर्षी कल्याण येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अत्यंत घाईने सिडकोने या ९० हजार घरांचे आॅनलाइन भूमिपूजन केले. कोणतीही तयारी झालेली नसताना आणि जागानिश्चिती नसताना किंवा जागेच्या वापराबाबत हरकती व सूचना मागवून रीतसर प्रक्रिया न राबवताच, नगररचना कायद्यास वाशी खाडीत बुडवून सिडकोने या घरांचे भूमिपूजन केले होते.तेव्हा नवी मुंबईतील रेल्वे स्थानके, बसस्थानकांसह ट्रक टर्मिनल्सच्या जागेवर ही घरे बांधणार असल्याचे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी जाहीर केले होते.>अवजड वाहने कुठे उभी करणार?भूमिपूजनानंतर ही घरे उपरोक्त रेल्वे स्थानकांसह वाशीआणि कळंबोली ट्रक टर्मिनल, कळंबोली आणि पनवेल बसस्थानकांच्या जागेवर बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ट्रक टर्मिनलच्या जागांवर घरे बांधण्याचा निर्णय घेताना, शहरातील अवजड वाहने कुठे उभी करणार, हे मात्र सांगितले नाही. अजूनही हा प्रश्न अनुत्तरित आहे. कारण वाशी ट्रक टर्मिनलमध्ये एपीएमसी मार्केट आणि ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यात येणारी वाहने वाशी ट्रक टर्मिनल, तर कळंबोलीतील स्टील मार्केट, तळोजा एमआयडीसीत येणारी शेकडो अवजड वाहने कळंबोलीच्या ट्रक टर्मिनलमध्ये उभी करण्यात येत आहेत. मात्र, या दोन्हीही ट्रक टर्मिनलच्या जागी घरे बांधल्यावर ही हजारो वाहने कुठे उभी करणार, हा मोठा गहन प्रश्न निर्माण होणार असून, यामुळे पनवेल आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांतील संभाव्य वाहतूककोंडी कशी सोडविणार, याचे अद्याप काहीच उत्तर नाही. तसा पर्यायही सिडकोने दिलेला नाही.>नवी मुंंबई महापालिका एनओसी देणार का?सिडको जी २५ हजार घरे बांधणार आहे, ती सानपाडा, जुईनगर येथेही बांधण्यात येणार आहेत. मात्र, या भागाची नियोजन प्राधिकरण म्हणून नवी मुुंबई महापालिका काम पाहत असून, पालिकेची एनओसी न घेताच सिडकोने या ठिकाणी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, वॉटर-मीटर-गटरसह इतर पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम महापालिकेला करावे लागणार आहे. महापालिका क्षेत्रातील आपल्या जागा सिडको मनमानीपणे पालिकेला विचारात न घेताच विकत आहे. मात्र, पायाभूत सुविधा पुरविण्याचा ताण महापालिकेवर पडत असल्याने, महापालिकेचे विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांनी सिडकोच्या या भूमिकेस तीव्र विरोध केला आहे. परवानगी घेतल्याशिवाय सिडकोस महापालिका क्षेत्रातील कोणतेही भूखंड विकण्यास परवानगी देऊ नये, असे पत्रच त्यांनी नगरविकास खात्यास लिहिले आहे. मात्र, आताही सिडकोने मनमानीपणे पालिकेची संमती न घेताच आणि नगररचना कायदा १९६६ कलम ३७ अन्वये जागेच्या वापरात बदलासंदर्भात नागरिकांकडून हरकती व सूचना न मागविताच आणि नगररचना संचालकांची परवानगी न घेताच, सानपाडा आणि जुईनगरसह खांदेश्वर, मानसरोवर रेल्वे स्थानकांच्या आवारात २५ हजार १०४ घरे बांधण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, आता नवी मुंबई महापालिका या संदर्भात सिडकोच्या मनमानीस आळा घालण्यासाठी त्यांची सीसी/ओसी रोखते की, शासनाच्या दबावापुढे लोटांगण घालून एनओसी देते, याकडे लक्ष लागले आहे.