शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वंचितांच्या रंगमंचामुळे मुलांना पुस्तकांबरोबरच माणसं वाचायला मिळत आहेत - मुक्ता बर्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 15:07 IST

रत्नाकर मतकरी स्मृतिमाला कार्यक्रमात त्यांना मानवंदना देण्यात आली.

ठळक मुद्देवंचितांच्या रंगमंचामुळे मुलांना पुस्तकांबरोबरच माणसं वाचायला मिळत आहेत - मुक्ता बर्वेरत्नाकर मतकरींना मानवंदना देताना मुक्ता बर्वे यांचं प्रतिपादन चित्रकलेच्या अविष्कारात वंचित मुलांचा आणि चित्रकारांचाही उत्साही सहभाग

ठाणे : ‘रत्नाकर मतकरींची नाटकं, कथालेखन, दिग्दर्शन चित्रकला आदी सर्वच कला क्षेत्रातील झेप फार उत्तुंग होती. त्यांनी संकल्पित केलेला वंचितांचा रंगमंच म्हणजे एक मोहिमच आहे, ज्यात लोक वस्तीतील मुलांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी त्यांचं स्वतःचं व्यासपीठ उपलब्ध केलं आणि या मुलांना त्यात मुक्तपणे विहरण्याची संधी दिली,’ असे सुप्रसिद्ध नाट्य – चित्रकर्मी मुक्ता बर्वे यांनी ‘मतकरी स्मृती माला’ या कार्यक्रमात संगितले. ठाण्यातील ‘समता विचार प्रसारक संस्थेतर्फे वंचितांच्या रंगमंचाचे प्रणेते दिवंगत जेष्ठ नाटककार, साहित्यिक रत्नाकर मतकरींना मानवंदना देण्यासाठी ‘मतकरी स्मृती माला’ कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमामध्ये मतकरींच्या विविध अंगी स्पर्श करणार्‍या कलागुणांवर प्रत्येक महिन्यात एक, असा वर्षभर चालणारा आदरांजली कार्यक्रम वंचितांचा रंगमंचावर सादर होणार आहे. त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या या मुलांना पुस्तकं बरोबर माणसं वाचायची संधी मिळते आहे, ही त्यांच्यासाठी फार मोलाची बाब आहे. 

यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व जन आंदोलनांच्या नेत्या मेधा पाटकर मतकरींच्या सामाजिक बांधिलकीबद्दल बोलताना म्हणाल्या, मतकरींनी त्यांना अवगत अशा कलेच्या सर्व माध्यमांचा उपयोग सामाजिक कार्यासाठी केला. त्यांनी नर्मदेच्या दर्‍या , खोर्‍यात आदिवासी वस्तीत राहून त्यांच्या खडतर जीवनाचा, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन, तो त्यांच्या तैलचित्रात अतिशय जिवंतपणे मांडला. त्यांची ही तैलचित्रे इतकी बोलकी आहेत की नर्मेदेच्या खोर्‍यात चालू असलेल्या आदिवासींच्या आंदोलनाची संपूर्ण वस्तुस्थिती नुसत्या चित्रातून व्यक्त होते. या बरोबरच त्यांनी या आंदोलनामागची भूमिका आणि आदिवासींची विषण्ण करणारी वास्तविकता आपल्या अभिवाचनातून अनेक शहरात, महाविद्यालयात जावून स्वतः मांडली. ही त्यांची समाजातील वंचितांबद्दलची संवेदनशीलता आणि साहित्यिक बांधिलकी यांच्या संयोगातून वंचितांच्या रंगमंचाच्या चळवळीची निर्मिती झाली आणि वंचित मुलांच्या मुक्त अभिव्यक्तीची वाट मोकळी झाली. ही चळवळ फक्त ठाण्यात सिमीत न राहता अनेक शहरातील वस्त्यात तसेच खेड्यापाड्यात, आदिवासी वस्तीत पसरवण्याचे काम आता कार्यकर्त्यांनी हाती घेण्याची गरज आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के म्हणाले, वंचितांचा रंगमंच ठाण्यातील वस्तीतील मुलांना चांगले संस्कार, चांगले विचार आणि त्यांच्या कलांना वाव देण्याचे स्तुत्य काम करीत आहे. मतकरींनी नाटक हे रंगमंचावरून वस्तीत आणण्याचे आणि वस्तीतील मुलांना रंगमंचावर नेण्याचे काम या चळवळीतून केले आहे. ही या चळवळीची उपयुक्तता व यश आहे. मतकरींच्या स्वप्नातील नाट्य - चित्र ठाण्यात उभी करून साऱ्या राज्याचे लक्ष आपण वेधून घेऊया, असे ते शेवटी म्हणाले. समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ यांनी स्वागत केले तर एकलव्य कार्यकर्ता अनुजा लोहार हिने प्रास्ताविक केले.  

-----------------------------------------------------------------------------

चित्रकलेच्या अविष्कारात वंचित मुलांचा आणि चित्रकारांचाही उत्साही सहभागी

 मतकरी सरांनी त्यांच्या चित्रकलेतील नैपुण्याचा समाजातील वस्तुस्थिती दाखवण्यासाठी योग्य वापर केला. याच पासून प्रेरणा घेऊन ‘मतकरी स्मृती माला’ उपक्रमाच्या प्रथम पुष्पासाठी साठी ‘चित्रकला’ ही कला निवडली आणि वस्तीतील मुलांना भविष्यातील माझी वस्ती, निसर्ग व तंत्रज्ञान या पैकी विषयावर चित्रे काढून सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत केले. मुलांनी भरभरून प्रतिसाद देऊन, या लॉकडाउनच्या काळातही मर्यादित साधने आणि बिकट आर्थिक परिस्थितीतही विविध लोक वस्तीतील वेग वेगळ्या वयोगटातील ७२ मुली - मुलांनी सहभाग घेतला. या चित्रांतून मुलांच्या विलक्षण कल्पनाशक्तीचा आणि त्यांच्या प्रभावी चित्राविष्काराचा प्रत्यय आला. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रकार सुप्रिया मतकरी विनोद आणि जगप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांनी सिद्धू वाघमारे, आयुषी घाणेकर, प्रतिमा भागवणे, सई मोहिते, दीपेश दळवी आदी ११ विद्यार्थ्यांची वेधक आणि वैशिष्ठ्यपूर्ण चित्रे निवडून त्या मुलांशी कार्यक्रमात संवाद साधला. विजयराज बोधनकर म्हणाले, या चित्रांतून मुलांचा डोळसपणा आणि त्यांच्या विचारांची व कल्पनांची व्याप्ती किती मोठी असते आणि त्यांची सर्जनशीलता आपल्या सर्व चौकटींना पार करून पुढे जाणारी असते हे समजते. त्यांच्या कल्पनांना मुक्तपणे बहरू दिलं तरच असामान्य कलाकृती निर्माण होवू शकते. प्रसिद्ध चित्रकार आणि रंगकर्मी सुप्रिया विनोद म्हणाल्या, माझ्या बाबांना परिस्थिती समोर हारणं माहीत नव्हतं, हाच गुण वंचितांच्या रंगमंचातील मुलांमध्ये रुजवण्यात हा उपक्रम यशस्वी झाला आहे हे आज या मुलांनी कठीण परिस्थितीतही दाखवलेल्या उत्साहाने सिद्ध झाले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध चित्रकार आणि रायगड अॅक्टिविस्टाचे क्युरेटर राजू सुतार यांनी रत्नाकर मतकरी यांनी ‘नर्मदा बचाव आंदोलनावर’ काढलेली चित्रे दाखवून त्यातून सूचित होणार्‍या अर्थावर विवेचन केलं. ते म्हणाले, ’अॅक्टिविस्ट आणि आर्टिस्ट याचं सुरेख मिश्रण मतकरींच्या या चित्रात आहे. त्यांची चित्रे ही एका हेतूने काढलेली आहे आणि तो हेतु या चित्रांतून स्पष्ट समजतो आहे. ही चित्रे म्हणजे त्यांनी या आंदोलनावर केलेले अतिशय प्रभावी भाष्य आहे. कोणताही कलाकार हा आधी माणूस आणि मग चित्रकार किंवा कलाकार असतो हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. झूम या ऑनलाइन व्यासपीठावर पार पाडलेल्या या कार्यक्रमाच्या तंत्रज्ञानाच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळणार्‍या प्रकेत ठाकुर यांनी काढलेली रत्नाकर मतकरी यांची अप्रतिम डिजिटल चित्रे या वेळी सर्वांची प्रशंसा मिळवून गेली. यावेळी, प्रकाश आंबेगावकर, सुनंदा परब, सौरभ करंदीकर, समीर परांजपे, मकरंद तोरसकर, विजू माने, प्रकेत ठाकुर, नीलिमा कढे, सुरेन्द्र दिघे असे अनेक चित्रकार, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर मतकरीना मानवंदना द्यायला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन ‘नाट्यजल्लोष’ च्या संयोजकी हर्षदा बोरकर यांनी केलं. आभार प्रदर्शन मीनल उत्तुरकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यास संस्थेच्या सचिव हर्षलता कदम, विश्वस्त जगदीश खैरालिया, अजय भोसले, सुनील दिवेकर, शैलेश मोहिले, दुर्गा माळी, दीपक वाडेकर आदी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून या कार्यक्रमाचा लाभ पाच हजाराहून अधिक रसिकांनी घेतल्याचे संजय निवंगुणे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMukta Barveमुक्ता बर्वेMedha Patkarमेधा पाटकर