शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
3
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
4
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
5
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
6
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
7
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
9
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
10
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
11
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
12
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
13
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
14
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
15
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
16
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
17
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
18
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
19
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
20
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!

बालविकास केंद्रे पुन्हा सुरू

By admin | Updated: February 3, 2016 02:07 IST

कुपोषित बालकांसाठी असलेली व शासनाने निधीचे कारण सांगून बंद केलेली ग्राम बाल विकास केंद्रे सुरू करावीत यासाठी श्रमजिवीने केलेल्या सर्व आंदोलनांना यश आले

सुनील घरत,  पारोळकुपोषित बालकांसाठी असलेली व शासनाने निधीचे कारण सांगून बंद केलेली ग्राम बाल विकास केंद्रे सुरू करावीत यासाठी श्रमजिवीने केलेल्या सर्व आंदोलनांना यश आले असून राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी नुकतेच आदिवासी विकास विभागाच्या निधीद्वारे ग्राम बाल विकास केंद्रे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. केंद्र शासनाने ग्राम बाल विकास केंद्रांचा निधी बंद केल्याचे कारण सांगून राज्य सरकारने गेल्या आॅगस्ट-२०१५ पासून राज्यातील कुपोषित बालकांसाठी चालविण्यात येणारी व्ही.सी.डी.सी योजना म्हणजेच ग्राम बाल विकास योजनेची केंद्रे बंद केली होती. पालघर जिल्हयात हजारोंच्या संख्येने अतितीव्र आणि तीव्र कुपोषित बालके मृत्यूशी झुंज देत असृताना महाराष्ट्र शासनाने ग्राम बाल विकास केंद्रे बंद केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने पालघर जिल्ह्यात तसेच मुंबईही सलग विविध साखळी आंदोलने केली.पालघरच्या जिल्हा नियोजन बैठकी दरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून कुपोषणाच्या प्रश्नाकडे पालकमंत्री आणि शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर संघटनेचे संस्थापक नेते विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या शिष्टमंडळामधे ग्राम बाल विकास केंद्रे (व्ही.सी.डी.सी)सरकार लवकरच सुरू करणार असल्याचे आश्वासन मान मुख्यमंत्र्यानी दिले होते. मात्र ते बराच काळ अंमलात न आणता, मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलात कुपोषण निर्मूलनाविषयीची पंचतारांकीत परिषद मात्र सरकारने आयोजित केली असता ती लढवय्या श्रमजीवी कार्यकर्त्यांनी उधळून लावली होती .> कुपोषित बालकांवरील उपचारासाठी आवाहनमधल्या काळात श्रमजीवी संघटनेच्या पुढाकारातून जव्हार येथील पतंगशहा कुटिर रुग्णालयात विठु माऊली ट्रस्ट आणि विधायक संसद या संस्थांच्या सहयोगाने कुपोषित बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबिरही आयोजण्यात आले. २०१६ च्या नवीन वर्ष आरंभीच संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी गंभीर कुपोषित बालकांवरील उपचारासाठी समाजातील सामान्य जनतेला व दात्यांना आवाहन करून जव्हारमध्ये बालसंजीवन छावणी सुरू केली.आदिवासी बालकांना जीवदान मिळविण्यासाठी एवढी सगळी आंदोलने आणि विधायक प्रयत्न होत आसताना शासनाच्या पातळीवर मात्र कुपोषित बालकांसाठी हालचाली होत नसल्याचे पाहून संघटनेने २६ जानेवारी २०१६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला दि. २५ जानेवारी २०१६ रोजी पालघर, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यात शासनाच्या उदासीन धोरणाबद्द्ल जोरदार आंदोलने केली होती.