शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

बालविकास केंद्रे पुन्हा सुरू

By admin | Updated: February 3, 2016 02:07 IST

कुपोषित बालकांसाठी असलेली व शासनाने निधीचे कारण सांगून बंद केलेली ग्राम बाल विकास केंद्रे सुरू करावीत यासाठी श्रमजिवीने केलेल्या सर्व आंदोलनांना यश आले

सुनील घरत,  पारोळकुपोषित बालकांसाठी असलेली व शासनाने निधीचे कारण सांगून बंद केलेली ग्राम बाल विकास केंद्रे सुरू करावीत यासाठी श्रमजिवीने केलेल्या सर्व आंदोलनांना यश आले असून राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी नुकतेच आदिवासी विकास विभागाच्या निधीद्वारे ग्राम बाल विकास केंद्रे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. केंद्र शासनाने ग्राम बाल विकास केंद्रांचा निधी बंद केल्याचे कारण सांगून राज्य सरकारने गेल्या आॅगस्ट-२०१५ पासून राज्यातील कुपोषित बालकांसाठी चालविण्यात येणारी व्ही.सी.डी.सी योजना म्हणजेच ग्राम बाल विकास योजनेची केंद्रे बंद केली होती. पालघर जिल्हयात हजारोंच्या संख्येने अतितीव्र आणि तीव्र कुपोषित बालके मृत्यूशी झुंज देत असृताना महाराष्ट्र शासनाने ग्राम बाल विकास केंद्रे बंद केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने पालघर जिल्ह्यात तसेच मुंबईही सलग विविध साखळी आंदोलने केली.पालघरच्या जिल्हा नियोजन बैठकी दरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून कुपोषणाच्या प्रश्नाकडे पालकमंत्री आणि शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर संघटनेचे संस्थापक नेते विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या शिष्टमंडळामधे ग्राम बाल विकास केंद्रे (व्ही.सी.डी.सी)सरकार लवकरच सुरू करणार असल्याचे आश्वासन मान मुख्यमंत्र्यानी दिले होते. मात्र ते बराच काळ अंमलात न आणता, मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलात कुपोषण निर्मूलनाविषयीची पंचतारांकीत परिषद मात्र सरकारने आयोजित केली असता ती लढवय्या श्रमजीवी कार्यकर्त्यांनी उधळून लावली होती .> कुपोषित बालकांवरील उपचारासाठी आवाहनमधल्या काळात श्रमजीवी संघटनेच्या पुढाकारातून जव्हार येथील पतंगशहा कुटिर रुग्णालयात विठु माऊली ट्रस्ट आणि विधायक संसद या संस्थांच्या सहयोगाने कुपोषित बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबिरही आयोजण्यात आले. २०१६ च्या नवीन वर्ष आरंभीच संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी गंभीर कुपोषित बालकांवरील उपचारासाठी समाजातील सामान्य जनतेला व दात्यांना आवाहन करून जव्हारमध्ये बालसंजीवन छावणी सुरू केली.आदिवासी बालकांना जीवदान मिळविण्यासाठी एवढी सगळी आंदोलने आणि विधायक प्रयत्न होत आसताना शासनाच्या पातळीवर मात्र कुपोषित बालकांसाठी हालचाली होत नसल्याचे पाहून संघटनेने २६ जानेवारी २०१६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला दि. २५ जानेवारी २०१६ रोजी पालघर, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यात शासनाच्या उदासीन धोरणाबद्द्ल जोरदार आंदोलने केली होती.