शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

चिमुकल्यांनी पथनाट्यातून दिला बालमजूरी विरोधी संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 20:06 IST

चिरंजीवी संघटनेच्या मुलांनी बालमजुरी थांबली पाहिजे असा संदेश देत पथनाटय सादर क रून नागरिकांमध्ये जनजागृती केली. मुलांनी बालमजुरी विरोधी दिनाचे औचित्य साधून मंगळवारी कल्याणमधील काही परिसरात पथनाटय सादर केले.

कल्याण: चिरंजीवी संघटनेच्या मुलांनी बालमजुरी थांबली पाहिजे असा संदेश देत पथनाटय सादर क रून नागरिकांमध्ये जनजागृती केली.मुलांनी बालमजुरी विरोधी दिनाचे औचित्य साधून मंगळवारी कल्याणमधील काही परिसरात पथनाटय सादर केले. चिरंजीवी संघटना लहान मुलांच्या विविध प्रश्नांवर काम करीत असते. पथनाट्याच्या माध्यमातून लहान मुलांच्या प्रश्नांविषयी समाजात जनजागृती करीत असते. मुलांना समुपदेशन क रणे, त्यांच्यातील कलागुणांची ओळख व्हावी म्हणून विविध प्रकारचे गेम घेणे अशी कामे संस्थेच्या माध्यमातून केली जातात. ही संस्था महाराष्ट्रभर कार्यरत आहे. संस्थेत कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, अंधेरी या परिसरातील सुमारे १२० हून अधिक मुलांचा समावेश आहे. एका पथनाटयात १० ते १२ मुलांचा सहभाग असतो. प्रत्येक पथनाटय सादरीकरण करताना नव्या मुलांना संधी दिली जाते. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. समाजात जनजागृती करण्यासाठी लहान मुले हे प्रभावी माध्यम आहे. एखादी गोष्ट लहान मुलांनी सांगितल्यास समाज त्यांचे लवकर अनुकरण करतो. यापूर्वी संस्थेने फटाकेमुक्त दिवाळी, सरकारी योजनापासून दुर्लक्षित राहणारी मुले, लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आढळणारी कुपोषणाची समस्या आदी विषयावर पथनाटय बसविली आहेत. आता संघटनेतर्फे बालमजूरी विरोधी पथनाटय बसविले होते. कल्याणमधील सिध्दार्थनगर, आनंदवाडी आणि मिंलिदनगर या तीन ठिकाणी हे पथनाटय सादर करण्यात आले. हे पथनाटय संदीप बनसोडे, सुजल जठार, वैष्णवी जठार, सक्षम पवार, हर्ष तेलुरे, ऐश्वर्या तोडकरी, सुमित तायडे, अंजली वाघ, राहुल भाट, हर्षद चौधरी या लहान मुलांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सादर केले.पथनाटयाच्या माध्यमातून बालपण वाचवा, देश वाचवा तसेच बालमजुरी पूर्णत: बंद झाली पाहिजे. व त्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी जर कोणाला कोठेही बालमजूर काम करताना आढळला तर त्याठिकाणी जाऊन ते थांबविण्याचा प्रयत्न आपल्यापासून झाला पाहिजे, असे आवाहान संघटनेच्या राज्यध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी केले आहे. 

टॅग्स :thaneठाणे