शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चिमुकल्यांनी पथनाट्यातून दिला बालमजूरी विरोधी संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 20:06 IST

चिरंजीवी संघटनेच्या मुलांनी बालमजुरी थांबली पाहिजे असा संदेश देत पथनाटय सादर क रून नागरिकांमध्ये जनजागृती केली. मुलांनी बालमजुरी विरोधी दिनाचे औचित्य साधून मंगळवारी कल्याणमधील काही परिसरात पथनाटय सादर केले.

कल्याण: चिरंजीवी संघटनेच्या मुलांनी बालमजुरी थांबली पाहिजे असा संदेश देत पथनाटय सादर क रून नागरिकांमध्ये जनजागृती केली.मुलांनी बालमजुरी विरोधी दिनाचे औचित्य साधून मंगळवारी कल्याणमधील काही परिसरात पथनाटय सादर केले. चिरंजीवी संघटना लहान मुलांच्या विविध प्रश्नांवर काम करीत असते. पथनाट्याच्या माध्यमातून लहान मुलांच्या प्रश्नांविषयी समाजात जनजागृती करीत असते. मुलांना समुपदेशन क रणे, त्यांच्यातील कलागुणांची ओळख व्हावी म्हणून विविध प्रकारचे गेम घेणे अशी कामे संस्थेच्या माध्यमातून केली जातात. ही संस्था महाराष्ट्रभर कार्यरत आहे. संस्थेत कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, अंधेरी या परिसरातील सुमारे १२० हून अधिक मुलांचा समावेश आहे. एका पथनाटयात १० ते १२ मुलांचा सहभाग असतो. प्रत्येक पथनाटय सादरीकरण करताना नव्या मुलांना संधी दिली जाते. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. समाजात जनजागृती करण्यासाठी लहान मुले हे प्रभावी माध्यम आहे. एखादी गोष्ट लहान मुलांनी सांगितल्यास समाज त्यांचे लवकर अनुकरण करतो. यापूर्वी संस्थेने फटाकेमुक्त दिवाळी, सरकारी योजनापासून दुर्लक्षित राहणारी मुले, लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आढळणारी कुपोषणाची समस्या आदी विषयावर पथनाटय बसविली आहेत. आता संघटनेतर्फे बालमजूरी विरोधी पथनाटय बसविले होते. कल्याणमधील सिध्दार्थनगर, आनंदवाडी आणि मिंलिदनगर या तीन ठिकाणी हे पथनाटय सादर करण्यात आले. हे पथनाटय संदीप बनसोडे, सुजल जठार, वैष्णवी जठार, सक्षम पवार, हर्ष तेलुरे, ऐश्वर्या तोडकरी, सुमित तायडे, अंजली वाघ, राहुल भाट, हर्षद चौधरी या लहान मुलांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सादर केले.पथनाटयाच्या माध्यमातून बालपण वाचवा, देश वाचवा तसेच बालमजुरी पूर्णत: बंद झाली पाहिजे. व त्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी जर कोणाला कोठेही बालमजूर काम करताना आढळला तर त्याठिकाणी जाऊन ते थांबविण्याचा प्रयत्न आपल्यापासून झाला पाहिजे, असे आवाहान संघटनेच्या राज्यध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी केले आहे. 

टॅग्स :thaneठाणे