शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

चिखलोली रेल्वेस्थानकाला अखेर मिळाला मुहूर्त; दोन वर्षांत स्थानक होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:56 IST

८ सप्टेंबरपासून होणार जमीनमोजणी, मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्यांना घरे घेणे शक्य होत नाही. त्यात मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे.

ठाणे : मध्य रेल्वेमार्गावरील प्रस्तावित चिखलोली रेल्वेस्थानकाच्या उभारणीसाठी सुमारे साडेआठ एकर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून या जागेची मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे ८ सप्टेंबरपासून मोजणी करणार आहेत. या कामासाठी जिल्हा प्रशासनानेजमीनमालकांना नोटिसाही पाठवल्या आहेत. तसेच येत्या दोन वर्षांत हे स्थानक उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्यांना घरे घेणे शक्य होत नाही. त्यात मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. त्यात बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांकडे सर्वसामान्य नागरिकांचा ओढा वाढत आहे. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ रेल्वेस्थानकापासून बदलापूर रेल्वेस्थानक सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहेत. या दोन्ही रेल्वेस्थानकांदरम्यान असलेल्या आजूबाजूच्या छोट्या गावांचेही मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. त्यामुळे या दोन स्थानकांच्या मध्ये असलेल्या गावांमधील नागरिकांना उपगनगरीय लोकल पकडण्यासाठी अंबरनाथ किंवा बदलापूर रेल्वेस्थानकात यावे लागते.

त्यामुळे सकाळी-संध्याकाळी रेल्वेस्थानकांमध्ये प्रचंड गर्दी असते. ती कमी करण्यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकांच्या दरम्यान असलेल्या चिखलोली परिसरात नवे रेल्वेस्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात येत होती. मध्य रेल्वे प्रशासनाने चिखलोली रेल्वेस्थानक उभारण्यासाठी मागील वर्षी मंजुरी दिली होती. ते उभारण्याचे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला देण्यात आले. या कॉर्पोरेशनच्या संकल्पनेनुसार यासाठी सुमारे साडेआठ एकर जागेची आवश्यकता आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी केल्यामुळे मागील काही दिवसांपासून चिखलोली रेल्वेस्थानकाच्या भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. मात्र, येत्या ८ सप्टेंबरला स्थानकाच्या जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जागामालकांना नोटिसाही पाठवल्या आहेत.- जगतसिंग गिरासे, उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर

टॅग्स :railwayरेल्वे