शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

चिखलोली रेल्वेस्थानकाला अखेर मिळाला मुहूर्त; दोन वर्षांत स्थानक होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:56 IST

८ सप्टेंबरपासून होणार जमीनमोजणी, मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्यांना घरे घेणे शक्य होत नाही. त्यात मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे.

ठाणे : मध्य रेल्वेमार्गावरील प्रस्तावित चिखलोली रेल्वेस्थानकाच्या उभारणीसाठी सुमारे साडेआठ एकर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून या जागेची मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे ८ सप्टेंबरपासून मोजणी करणार आहेत. या कामासाठी जिल्हा प्रशासनानेजमीनमालकांना नोटिसाही पाठवल्या आहेत. तसेच येत्या दोन वर्षांत हे स्थानक उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्यांना घरे घेणे शक्य होत नाही. त्यात मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. त्यात बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांकडे सर्वसामान्य नागरिकांचा ओढा वाढत आहे. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ रेल्वेस्थानकापासून बदलापूर रेल्वेस्थानक सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहेत. या दोन्ही रेल्वेस्थानकांदरम्यान असलेल्या आजूबाजूच्या छोट्या गावांचेही मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. त्यामुळे या दोन स्थानकांच्या मध्ये असलेल्या गावांमधील नागरिकांना उपगनगरीय लोकल पकडण्यासाठी अंबरनाथ किंवा बदलापूर रेल्वेस्थानकात यावे लागते.

त्यामुळे सकाळी-संध्याकाळी रेल्वेस्थानकांमध्ये प्रचंड गर्दी असते. ती कमी करण्यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकांच्या दरम्यान असलेल्या चिखलोली परिसरात नवे रेल्वेस्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात येत होती. मध्य रेल्वे प्रशासनाने चिखलोली रेल्वेस्थानक उभारण्यासाठी मागील वर्षी मंजुरी दिली होती. ते उभारण्याचे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला देण्यात आले. या कॉर्पोरेशनच्या संकल्पनेनुसार यासाठी सुमारे साडेआठ एकर जागेची आवश्यकता आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी केल्यामुळे मागील काही दिवसांपासून चिखलोली रेल्वेस्थानकाच्या भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. मात्र, येत्या ८ सप्टेंबरला स्थानकाच्या जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जागामालकांना नोटिसाही पाठवल्या आहेत.- जगतसिंग गिरासे, उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर

टॅग्स :railwayरेल्वे