शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची वाट खड्ड्यांतूनच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 03:36 IST

कृषी दिनाचे औचित्य साधून रविवारी कल्याण तालुक्यातील वरपगाव येथे होणाऱ्या २२ हजार वृक्षांच्या लागवडीच्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्तेविकास व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.

कल्याण : कृषी दिनाचे औचित्य साधून रविवारी कल्याण तालुक्यातील वरपगाव येथे होणाऱ्या २२ हजार वृक्षांच्या लागवडीच्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्तेविकास व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. त्यांचा ताफा ठाणे-भिवंडी बायपासने कल्याणमध्ये येऊन वरपकडे रवाना होणार आहे. परंतु, या रस्त्यावरील कोनगाव येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यांचे दणके बसून मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवू नये, म्हणून शनिवारी रात्रीपर्यंत युद्धपातळीवर ते बुजवण्याचे काम सुरू होते. मात्र, रात्रीच्या अंधारात ते कितपत बुजले जातात, याबाबत साशंकता आहे.सध्या पावसाळ्यामुळे भिवंडी-कल्याण मार्गावरील कोनगाव येथील रस्ता नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. मुख्यमंत्र्यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर येथे शनिवारी खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. या कामामुळे कल्याण शहरात भिवंडीकडून येणारा मुख्य रस्ता, दुर्गाडी चौक ते आग्रा रोड, शिवाजी चौक, बैलबाजार, पत्रीपूल या भागांत मोठी कोंडी झाली होती. परिणामी, वाहनचालकांनी आपली वाहने अंतर्गत रस्त्याने वळवली. त्यामुळे मुख्य रस्त्यांना जोडणारे टिळक चौक, सहजानंद चौक, शंकरराव चौक, मोहम्मद अली चौक, संतोषीमाता मंदिर रोड हे देखील जॅम झाले. तेथे वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहनचालक चांगलेच संतापले होते. दरम्यान, या कोंडीचा सामना वाहनचालकांना मध्यरात्री १२ पर्यंत करावा लागण्याची शक्यता वाहतूक विभागानेच व्यक्त केली.आदिवासींनान्याय मिळेल का?टिटवाळा : वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आणि पाहुणचार वरप येथील राधास्वामी सत्संग येथे होणार आहे.या सत्संगच्या राजेश लुल्ला यांनी येथील रहिवासी असलेल्या आदिवासी-कातकरी समाजाच्या हक्काच्या जमिनीवरील वहिवाटीचा रस्ता बंद केला आहे, असे वरप येथील आदिवासींचे म्हणणे आहे.वरप शेजारीलडोंगर टेकडीवर पाच ते सहा आदिवासी वाड्या आहेत. गेली अनेक पिढ्या ते गावात ये-जा करण्यासाठी तसेच अंबरनाथला जाण्यासाठी रस्ता वापरतात. परंतु, ही जागा राधास्वामी सत्संग यांनी खरेदी केली. त्यानंतर तेथे संरक्षण भिंत बांधण्याची परवानगी घेऊन धाकदपटशाने वहिवाट बंद केली.कोनगाव हद्दीत खड्डे पडले आहेत. त्यामुळे कल्याण शहरात वाहतूककोंडी झाली आहे.- संभाजी जाधव, पोलीस निरीक्षक (वाहतूक)

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस