शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

मुख्यमंत्र्यांच्या अभियानाला हवी साथ; ठाणेकर म्हणून आपला वाटा किती? 

By अजित मांडके | Updated: December 5, 2022 07:20 IST

आपण आता मुख्यमंत्री झाल्याने केवळ ठाण्याच्या हिताची काळजी वाहून चालणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताची काळजी वाहणार आहोत. त्यामुळे ठाण्याची काळजी ठाणेकरांनी वाहायची आहे.

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी पुढील सहा महिन्यांत ठाण्याचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असे आश्वासन ठाणेकरांना दिले. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करणे, शहर कचरामुक्त करणे, शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणे आणि वाहतूककोंडीतून ठाणेकरांची सुटका करणे, या चार गोष्टींना प्राधान्य दिले आहे. यासाठी कोट्यवधींचा निधी राज्य शासनाकडून देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची मनोकामना पूर्ण व्हावी, हीच सर्वसामान्य ठाणेकरांची अपेक्षा आहे.

ठाणेकरांना भेडसावणारी कचऱ्याची समस्या ही कायमची सुटायला हवी. रंगरंगोटी करून शहराचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली आहे; परंतु वाहतूककोंडीतून मुक्तता होईल का, हा खरा प्रश्न आहे. ठाणे आता बदलत असून, हे शहर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहर झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त जबाबदारी नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांवर सोपवली आहे. नवी मुंबईत असताना बांगर यांनी आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या असून, त्यामुळेच त्यांना ठाण्यात आणले, त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्याचे शिंदे म्हणाले. मात्र, मुख्यमंत्र्यांचे एक विधान खूप महत्त्वाचे आहे. 

आपण आता मुख्यमंत्री झाल्याने केवळ ठाण्याच्या हिताची काळजी वाहून चालणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताची काळजी वाहणार आहोत. त्यामुळे ठाण्याची काळजी ठाणेकरांनी वाहायची आहे. जोपर्यंत ठाणेकर सर्व जबाबदाऱ्या लोकप्रतिनिधी व नोकरशहा यांच्यावर सोपवून स्वस्थ बसतील, तोपर्यंत शिंदे यांचे स्वप्न पूर्ण होणे कठीण आहे. शहर कचरामुक्त करायचे तर ठाण्यातील जास्तीत जास्त सोसायट्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली पाहिजे. ठाणे शहरात यापूर्वीच्या आयुक्तांनीही सौंदर्यीकरणावर भर दिला. भिंती रंगवल्या व चौकांची सजावट केली. मात्र, ठाणेकरांमधील काहींना भिंत दिसताच पिचकाऱ्या मारण्याची खोड आहे. घरातील कचरा रस्त्यावर आणून टाकण्याची सवय जडलेली आहे. या सवयी ठाणेकरांना सोडाव्या लागतील. 

शिवाय जर कुणी शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा आणत असेल तर त्याचे कान धरले पाहिजेत. नाहीतर महापालिकेने रंगरंगोटी करायची व ठाणेकरांनी शहर विद्रुपीकरणाकडे डोळेझाक करायची हेच वर्षानुवर्षे सुरू राहील. केवळ एका व्यक्तीसाठी मोटार घेऊन घराबाहेर पडणे ठाणेकरांनी टाळले पाहिजे. एकाच कॉम्प्लेक्समधील चार-पाच जण थोड्याशा अंतराने मुंबईकडे आपापली वाहने घेऊन जात असतील तर त्यांनी थोडीशी तडजोड करून कारपुलिंग केला व दररोज पाच जणांपैकी एकाच्याच मोटारीतून मुंबई गाठायची पद्धत सुरू केली तरी कोंडी कमी होईल.  

कोथिंबिरीची जुडी आणायला गाडी अनेक ठाणेकर जिममध्ये जाऊन पोट कमी करण्याकरिता ट्रेडमिलवर चालतात; पण कोथिंबिरीची जुडी आणायला मोटार घेऊन बाहेर पडतात.ठाणेकरांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक वापरली तर वाहतूक कोंडी सुटेल.