शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

भार्इंदर पुर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या भुयारी वाहतुक मार्गाचे अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 11:39 IST

भार्इंदर पुर्व-पश्चिमेला जोडणारा व एकमेव उड्डाणपुलाला पर्याय ठरणारा बहुप्रतिक्षित भुयारी वाहतूक मार्गाचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

भार्इंदर- भार्इंदर पुर्व-पश्चिमेला जोडणारा व एकमेव उड्डाणपुलाला पर्याय ठरणारा बहुप्रतिक्षित भुयारी वाहतूक मार्गाचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मीरारोड रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभिकरण प्रकल्पाचे त्यांच्याच हस्ते भूमीपुजन करण्यात आले. 

त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हि भार्इंदरकरांना दिवाळीची भेट असल्याचे सांगितले. भुयारी मार्गासाठी पालिकेने अनेकदा निविदा काढुनही अखेरच्या ८ व्या निविदाकाराला काम देण्यात आले. हा मार्ग किती आवश्यक होता, हे ऐन दिवाळीतही मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांमुळे हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. या मार्गाचे लोकार्पण झाल्याचे जाहिर करुन त्यांनी मीरारोड रेल्वे स्थानक परिसराच्या भूमीपुजनही केले. 

मीरारोड रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणात त्याच्या दर्शनीभागाचे काम पुर्ण झाले असुन चारमजली एलिव्हेटेड पार्कींगच्या इमारतीचे काम अपुर्णावस्थेत आहे. त्या प्रस्तावाला पालिकेतील आघाडी सत्ताधाऱ्यांच्या  काळात मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी एकुण २२ कोटींचा खर्च गृहित धरण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्याचे भूमीपुजन काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या हस्ते २०१४ मध्येच करण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याच प्रकल्पाचे दुसऱ्यांदा भूमीपुजन केल्याने तो राजकीय वर्तळात चर्चेचा विषय बनला.