शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर पुर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या भुयारी वाहतुक मार्गाचे अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 11:39 IST

भार्इंदर पुर्व-पश्चिमेला जोडणारा व एकमेव उड्डाणपुलाला पर्याय ठरणारा बहुप्रतिक्षित भुयारी वाहतूक मार्गाचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

भार्इंदर- भार्इंदर पुर्व-पश्चिमेला जोडणारा व एकमेव उड्डाणपुलाला पर्याय ठरणारा बहुप्रतिक्षित भुयारी वाहतूक मार्गाचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मीरारोड रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभिकरण प्रकल्पाचे त्यांच्याच हस्ते भूमीपुजन करण्यात आले. 

त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हि भार्इंदरकरांना दिवाळीची भेट असल्याचे सांगितले. भुयारी मार्गासाठी पालिकेने अनेकदा निविदा काढुनही अखेरच्या ८ व्या निविदाकाराला काम देण्यात आले. हा मार्ग किती आवश्यक होता, हे ऐन दिवाळीतही मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांमुळे हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. या मार्गाचे लोकार्पण झाल्याचे जाहिर करुन त्यांनी मीरारोड रेल्वे स्थानक परिसराच्या भूमीपुजनही केले. 

मीरारोड रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणात त्याच्या दर्शनीभागाचे काम पुर्ण झाले असुन चारमजली एलिव्हेटेड पार्कींगच्या इमारतीचे काम अपुर्णावस्थेत आहे. त्या प्रस्तावाला पालिकेतील आघाडी सत्ताधाऱ्यांच्या  काळात मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी एकुण २२ कोटींचा खर्च गृहित धरण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्याचे भूमीपुजन काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या हस्ते २०१४ मध्येच करण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याच प्रकल्पाचे दुसऱ्यांदा भूमीपुजन केल्याने तो राजकीय वर्तळात चर्चेचा विषय बनला.