शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या हृदयात बसवा - बाबूराव कानडे यांचे ठाण्यात प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 15:53 IST

व्यास क्रिएशन्सतर्फे तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी बाबुराव कानडे उपस्थित होते.

ठळक मुद्देछत्रपती शिवराय ही आपली प्रेरणा आहे, शक्ती आहे - बाबूराव कानडे शिक्केकट्यारी, स्वराज्यसाक्षी, श्रीमहाभारत या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी केले प्रास्ताविक

ठाणे : महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. छत्रपती शिवराय ही आपली प्रेरणा आहे, शक्ती आहे. म्हणून शिवाजी महाराजांना आपल्या हृदयात बसवा. इतिहास वाचण्यापेक्षा तो अभ्यासणं आणि जाणून घेणं हे अधिक महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीत वाढलेले आणि राजमाता जिजाऊंच्या संस्कारात वाढलेेले  छत्रपती संभाजी यांचं शौर्यतेज प्रकट होत गेलं. त्यांच्याविषयीचा खोटा इतिहास प्रसारीत झाला हे आपलं दुर्देवं म्हणावं लागेल. म्हणून संपूर्ण मराठ्यांचा इतिहास जाणून घेताना या व्यक्तीरेखांना भावनिक पातळीवर समजून घ्या. हे जाणण्यासाठी महेश गुप्ते लिखित स्वराज्यसाक्षी आणि शिक्केकट्यारी ही पुस्तके दीपस्तंभ ठरतील, असे वक्तव्य ज्येष्ठ व्याख्याते ह.भ.प. यशवंत उर्फ बाबूराव कानडे यांनी केले.

व्यास क्रिएशन्स्तर्फे महेश गुप्ते लिखित शिक्केकट्यारी आणि स्वराज्यसाक्षी तसेच ज्येष्ठ समीक्षक श्रीराम बोरकर लिखित श्रीमहाभारत या पुस्तकांच्या ऐतिहासिक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ लेखक आणि नाटककार अशोक समेळ, संत साहित्याचे गाढे अभ्यासक वामनराव देशपांडे, व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक श्री. वा. नेर्लेकर, व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वामनराव देशपांडे म्हणाले, महर्षी व्यासरचित श्रीमहाभारत हे महाकाव्य हा एक विश्वचमत्कार आहे. या महाकाव्याला आता पाच हजार वर्षे उलटून गेली. पण त्याची अलौकीकता जराही कमी झाली नाही. जगभरातल्या विद्वानांना या महाकाव्याच्या अभ्यासाची भुरळ पडली. ही सूड कथा नाही,तत्त्वज्ञानाला मोहिनी घालेल अशी भगवद्गीता यात प्रकट झाली आहे. मानवी आयुष्यावर चांदणं बरसवणार्‍या महाभारताला पर्याय नाही. आजच्या पिढीसाठी श्रीराम बोरकर यांनी नव्यानं दालन उघडलं आहे याचा वाचकांनी नक्की लाभ घ्यावा. ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ यांनी आपल्या प्रभावी शैलीत आपण लेखक ते नाटककार कसे झालो याचा प्रवास मांडला. एक साधी गोष्ट पण साहित्यात कसा इतिहास घडवून जाते याचे उदाहरणांसह केलेल्या मांडणीमुळे  रसिक मंत्रमुग्ध झाले. श्रीमहाभारत पुस्तक प्रकाशनासाठी बालगणेशाचे आगमन, शिक्केकट्यारी आणि स्वराज्यसाक्षी पुस्तकांच्या प्रकाशनासाठी तडफदार मावळे आणि मराठ्यांच्या सम्राज्ञी यांचा प्रवेश अशा आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे रसिकांनी व्यास क्रिएशन्स्चे विशेष कौतुक केले. व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर आणि समीर गुप्ते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. लेखक महेश गुप्ते आणि श्रीराम बोरकर यांनी पुस्तकनिर्मितीबद्दल मनोगत व्यक्त केले. व्यास क्रिएशन्सचे मुद्रक सुबोध पटवर्धन, चित्रकार अनिल दाभाडे, सुधीर मुणगेकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. हर्षदा बोरकर यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई