शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या हृदयात बसवा - बाबूराव कानडे यांचे ठाण्यात प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 15:53 IST

व्यास क्रिएशन्सतर्फे तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी बाबुराव कानडे उपस्थित होते.

ठळक मुद्देछत्रपती शिवराय ही आपली प्रेरणा आहे, शक्ती आहे - बाबूराव कानडे शिक्केकट्यारी, स्वराज्यसाक्षी, श्रीमहाभारत या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी केले प्रास्ताविक

ठाणे : महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. छत्रपती शिवराय ही आपली प्रेरणा आहे, शक्ती आहे. म्हणून शिवाजी महाराजांना आपल्या हृदयात बसवा. इतिहास वाचण्यापेक्षा तो अभ्यासणं आणि जाणून घेणं हे अधिक महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीत वाढलेले आणि राजमाता जिजाऊंच्या संस्कारात वाढलेेले  छत्रपती संभाजी यांचं शौर्यतेज प्रकट होत गेलं. त्यांच्याविषयीचा खोटा इतिहास प्रसारीत झाला हे आपलं दुर्देवं म्हणावं लागेल. म्हणून संपूर्ण मराठ्यांचा इतिहास जाणून घेताना या व्यक्तीरेखांना भावनिक पातळीवर समजून घ्या. हे जाणण्यासाठी महेश गुप्ते लिखित स्वराज्यसाक्षी आणि शिक्केकट्यारी ही पुस्तके दीपस्तंभ ठरतील, असे वक्तव्य ज्येष्ठ व्याख्याते ह.भ.प. यशवंत उर्फ बाबूराव कानडे यांनी केले.

व्यास क्रिएशन्स्तर्फे महेश गुप्ते लिखित शिक्केकट्यारी आणि स्वराज्यसाक्षी तसेच ज्येष्ठ समीक्षक श्रीराम बोरकर लिखित श्रीमहाभारत या पुस्तकांच्या ऐतिहासिक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ लेखक आणि नाटककार अशोक समेळ, संत साहित्याचे गाढे अभ्यासक वामनराव देशपांडे, व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक श्री. वा. नेर्लेकर, व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वामनराव देशपांडे म्हणाले, महर्षी व्यासरचित श्रीमहाभारत हे महाकाव्य हा एक विश्वचमत्कार आहे. या महाकाव्याला आता पाच हजार वर्षे उलटून गेली. पण त्याची अलौकीकता जराही कमी झाली नाही. जगभरातल्या विद्वानांना या महाकाव्याच्या अभ्यासाची भुरळ पडली. ही सूड कथा नाही,तत्त्वज्ञानाला मोहिनी घालेल अशी भगवद्गीता यात प्रकट झाली आहे. मानवी आयुष्यावर चांदणं बरसवणार्‍या महाभारताला पर्याय नाही. आजच्या पिढीसाठी श्रीराम बोरकर यांनी नव्यानं दालन उघडलं आहे याचा वाचकांनी नक्की लाभ घ्यावा. ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ यांनी आपल्या प्रभावी शैलीत आपण लेखक ते नाटककार कसे झालो याचा प्रवास मांडला. एक साधी गोष्ट पण साहित्यात कसा इतिहास घडवून जाते याचे उदाहरणांसह केलेल्या मांडणीमुळे  रसिक मंत्रमुग्ध झाले. श्रीमहाभारत पुस्तक प्रकाशनासाठी बालगणेशाचे आगमन, शिक्केकट्यारी आणि स्वराज्यसाक्षी पुस्तकांच्या प्रकाशनासाठी तडफदार मावळे आणि मराठ्यांच्या सम्राज्ञी यांचा प्रवेश अशा आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे रसिकांनी व्यास क्रिएशन्स्चे विशेष कौतुक केले. व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर आणि समीर गुप्ते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. लेखक महेश गुप्ते आणि श्रीराम बोरकर यांनी पुस्तकनिर्मितीबद्दल मनोगत व्यक्त केले. व्यास क्रिएशन्सचे मुद्रक सुबोध पटवर्धन, चित्रकार अनिल दाभाडे, सुधीर मुणगेकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. हर्षदा बोरकर यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई