शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दिवसाला बारावीचा एकच पेपर तपासणार

By admin | Updated: February 19, 2016 02:27 IST

बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून ठाणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

ठाणे : बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून ठाणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन दिवसाला एकच पेपर तपासण्याची तयारी दर्शविली आहे. जिल्ह्यातील दोन हजार शिक्षकांनी हा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेने दिली आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये आॅनलाइन संचमान्यता त्रुटी दूर कराव्यात, आयटी शिक्षकांना वेतन मिळावे, ४२ दिवसांच्या संपकालीन रजा पूर्ववत कराव्यात, पायाभूत पदांच्या वेतनाचा प्रश्न अशा विविध प्रकारच्या २५ मागण्या असून त्या १५ आॅगस्ट २०१५ पूर्वी मान्य करून संघटनेचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र, अद्याप त्या मागण्यांची पूर्तता न झाल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटनेने असहकार आंदोलन पुकारले आहे. शासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र्र करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रेय चितळे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)