शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तनवासीयांची चक्क फसवणूक, जनआक्रोश आंदोलनात फूट पाडण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 03:15 IST

उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाच्याठिकाणी साचलेल्या १० लाख मेट्रिक टन कचऱ्याची बायो मायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ५६ कोटी २० लाख तर बायो मायनिंगसह घनकचरा प्रकल्पाच्या विविध बाबींसाठी एकूण ८३ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असताना सत्ताधारी भाजपाने अर्थसंकल्पात ८ कोटी रुपयांचीच तरतूद केली आहे.

मीरा रोड : उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाच्याठिकाणी साचलेल्या १० लाख मेट्रिक टन कचऱ्याची बायो मायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ५६ कोटी २० लाख तर बायो मायनिंगसह घनकचरा प्रकल्पाच्या विविध बाबींसाठी एकूण ८३ कोटी ८३ लाख रु पयांचा खर्च अपेक्षित असताना सत्ताधारी भाजपाने अर्थसंकल्पात ८ कोटी रुपयांचीच तरतूद केली आहे. तरतूदच नसताना बायो मायनिंग या नव्या गोंडस नावाखाली उत्तनवासीयांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप काँग्रेस व शिवसेनेने केला आहे. साचलेले कचºयाचे डोंगर पावसाळ्यात धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली आहे. शिवाय डम्पिंग विरोधात छेडले जाणारे कचरा बंद जनआक्रोश आंदोलनात फूट पाडून नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी भाजपा व प्रशासनाची ही खेळी असल्याचा आरोपसुद्धा केला आहे.उत्तनच्या धावगी डोंगरावर सरकारने मीरा- भार्इंदर पालिकेला घनकचरा प्रकल्पासाठी ३१.४६ हेक्टर सरकारी जागा विनामूल्य दिली होती. परंतु त्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली असून पालिका डोळेझाक करत आली आहे. तर घनकचरा प्रकल्पाच्या नावाखाली पालिकेने बेकायदा डम्पिंग तयार केले असून कच-याचे डोंगर झाले आहेत. येथील शेती नष्ट होऊन विहरीचे पाणी दूषित झाले आहे. दुर्गंधी, धूर यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. संघर्ष समितीने हरित लवादाकडे दाद मागितल्यावर लवादासह सर्वोच्च न्यायालयातही महापालिकेने साचलेल्या कचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रीया करून विल्हेवाट लावू असे प्रतिज्ञापत्र दिले होते.आयआयटीने पालिकेला बायो मायनिंग पद्धतीने साचलेल्या कचºयावर प्रक्रीया करण्यास सांगितले आहे. आयसीयूसी कंपनीला पालिकेने दैनंदिन कचरा व्यवस्थापन करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी सल्लागार म्हणून नेमले. या सल्लागाराने दिलेल्या अहवालानुसार उत्तन येथे १० लाख मेट्रिक टन इतका कचरा पूर्वीपासून साचलेला आहे. साचलेल्या कचºयावर बायो मायनिंग पद्धतीने प्रक्रि या करण्यासाठी तब्ब्ल ५६ कोटी २० लाख खर्च होणार आहे. तर हा खर्च व घनकचरा व्यवस्थापनाच्या अन्य बाबींसाठी होणारा खर्च मिळून एकूण ८३ कोटी ८३ लाख खर्चाचा अहवाल आहे. हा अहवाल पालिकेने तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवलेला आहे. तर प्रकल्प अहवालाचा सुधारित गोषवारा आयुक्त बळीराम पवार यांनी १८ एप्रिल रोजीच्या महासभेत सादर करणार आहे.ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नकाकचऱ्याचे साचलेले डोंगर व पावसाळ्यात हे डोंगर खचल्यास मोठा अनर्थ होईल. शिवाय कचºयाचे घातक असे दूषित पाणी शेती व गावात शिरण्याची भीती काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी व्यक्त केली आहे. भाजपाने तर ७ वर्षे हा प्रकल्प येथे कायम राहील असे कंत्राटदार नेमून स्पष्ट केले आहे. पण आता उत्तनवासियांचा अंत पाहू नये आणि प्रकल्प स्थलांतरित करण्याविषयी हालचाली करा अन्यथा आंदोलनातून प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सत्ताधारी व प्रशासनाची राहील असे सावंत म्हणाले.>पर्यावरणाचा -हास सहन करणार नाहीबायो मायनिंगसारखे प्रस्ताव आणून उत्तनवासियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी केला आहे. पर्यावरणाचा डोळ््यादेखत चाललेला ºहास आता उत्तनवासीय सहन करणार नाही असे बगाजी यांनी म्हटले आहे.>प्रकल्प हटवण्यासाठी ग्रामस्थ सज्ज१० वर्षांनी पालिकेला सविस्तर प्रकल्प तयार करण्याची बुद्धी सुचली. पण साचलेला कचरा हा १० लाख मेट्रिक टनपेक्षा अधिक असून आकडेवारी फसवी वाटत आहे. ग्रामस्थ हा कचरा प्रकल्प येथून हटवण्यासाठी सज्ज झाले आहेत असे विद्याधर रेवणकर म्हणाले .