शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

महागात पडणारे ‘स्वस्त चायनीज’

By admin | Updated: May 25, 2014 00:14 IST

ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या पोटाचा आसरा ठरलेल्या वडा-पाव या आवडत्या मेनूची जागा हळुहळू चायनीज खाद्यपदार्थांनी घ्यायला सुरूवात केली आहे.

हितेन नाईक, पालघर - ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या पोटाचा आसरा ठरलेल्या वडा-पाव या आवडत्या मेनूची जागा हळुहळू चायनीज खाद्यपदार्थांनी घ्यायला सुरूवात केली आहे. अत्यंत स्वस्त दरात उदरभरणाची सोय या चायनीज खाद्यपदार्थामुळे होत असली तरी ज्या गलीच्छ व अनारोग्य पसरविणार्‍या वातावरणात या खाद्यपदार्थांची निर्मीती होते त्यामुळे उद्भवणार्‍या आजारामुळे खाणार्‍याना मोठी किंमत मोजावी लागू शकते याची कल्पना खाणार्‍यांना नसावी असे दिसून येत आहे. चायनामेड वस्तू व चायनीज खाद्यपदार्थांना अल्पावधीतच तुफान लोकप्रियता लाभल्याने सध्या ठाणे-मुंबई या शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात नाक्यानाक्यावर दिसणार्‍या वडापावच्या जागेत चायनीजची दुकाने दिसू लागली आहेत. छोटे गाळे, मोडके तोडके मंडपात लाल रंगाने रंगवलेली हातगाडी अथवा टेबल्सच्या बाजुला कळकट-मळकट तुटलेल्या प्लॅस्टीक खुर्च्या, बाजुला अखंड वहाणारी गटारे, अशी अनारोग्य पसरवणारी व्यवस्था सध्या पालघर, शिरगाव, सातपाटी इ. भागातील चायनीज सेंटर परिसरात दिसून येत आहे. यावेळी फ्राईडराईससाठी मोठमोठ्या कढईत भात शिजवून ठेवला जातो. यात सॉस, नुडल्स, भाज्या, भात, चिकन, रंग इ. वस्तुच्या दर्जा विषयी कुठलीही शाश्वती नसल्याचे दिसून येते. तरीही संध्याकाळ झाली की जिभेचे चोचले पुरविण्यासाठी चायनीज सेंटर भोवती गर्दी जमायला सुरूवात होते ती रात्रभर वाढतच जाते. अगदी २०-२५ रुपयात चांगले चमचमीत खायला मिळत असल्याने शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कामगार वर्गाची मोठी गर्दी चायनीज सेंटरकडे वळू लागली आहे.