शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

चातुर्मास म्हणजे श्रवण, चिंतन आणि ध्यानाद्वारे स्वतःला जाणून घेण्याची अनोखी संधी- राज्यपाल रमेश बैस

By सुरेश लोखंडे | Updated: August 26, 2023 20:36 IST

ठाणे नंदनवन येथे तेरा पंथ प्रोफेशनल फोरमच्या १६ वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले.

ठाणे: आचार्य श्री महाश्रमणजी यांनी त्यांच्या चातुर्मासासाठी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल मी विशेषतः त्यांचे आभार मानतो. चातुर्मास म्हणजे श्रवण, चिंतन आणि ध्यानाद्वारे स्वतःला जाणून घेण्याची, स्वतःची जाणीव करण्याची अनोखी संधी आहे. आचार्य महाश्रमणजी आज आपल्यामध्ये आहेत,  यासाठी आपण सर्व भाग्यवान आहोत. हे एका धार्मिक संस्थेचे आचार्य असूनही त्यांचे विचार उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष आहेत. त्यांनी जनतेचे प्रबोधन करण्यासाठी तीन देश आणि २३ राज्यांचा पायी प्रवास केला आहे, असे राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी ठाणे येथील तेरा पंथ प्रोफेशनल फोरमच्या १६ व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये स्पष्ट केले.

ठाणे नंदनवन येथे तेरा पंथ प्रोफेशनल फोरमच्या १६ वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. त्यास खास उपस्थिती राहून राज्यपाल यांनी कौतुकोद्गार काडले. ते पुढे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात जैन समाजाने आपल्या दानधर्माने देशातील लाखो लोकांना मदत केली. तेरा पंथ प्रोफेशनल फोरम या संस्थेचे शिक्षण, वैद्यकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील कार्य आदर्शवत आहे,असेही राज्यपाल यांनी यावेळी सांगितले. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मिरा-भाईंदर आयुक्त  संजय काटकर,‌‌आचार्य श्री  महाश्रमणजी, साध्वी प्रमुखा श्री विश्रुत विभाजी, मुनिवर महावीर कुमारजी, साध्वी वरिया संबुद्ध यशाजी, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज ओस्तवाल, तेरापंथ व्यावसायिक मंच मुख्य विश्वस्त चंद्रेश बाफना, गजराज पगारिया, सुशील अग्रवाल, व्यावसायिक नेते, सनदी लेखापाल, कंपनी सेक्रेटरी, व्यापारी, उद्योजक, आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल पुढे म्हणाले की, ही संस्था  'अहिंसा यात्रे'च्या माध्यमातून व्यसनमुक्ती, नैतिकता आणि सद्भावना यांना प्रेरणा देते, जे एक अद्वितीय राष्ट्रीय काम आहे. संस्थेच्या कष्टाला, तपश्चर्येला माझा सलाम आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, चांगले शिक्षण, चांगला व्यवसाय आणि यश मिळाल्यावर लोक धार्मिक कार्याकडे पाठ फिरवतात, असे सर्वसाधारणपणे दिसून येते. त्यांना वाटते, मी आयुष्यात जे काही मिळवले आहे, ते मी माझ्या बळावर मिळवले आहे. मात्र तसे नसून आयुष्यात कर्माला अध्यात्माचीही जोड महत्वाची आहे, असे प्रतिपादन ही राज्यपाल यांनी यावेळी केले. या कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या संख्येने तरुण व्यावसायिकांना उपस्थित असल्याचे पाहून व आचार्य महाश्रमणजींच्या पवित्र उपस्थितीत हा परिसंवाद आयोजित केल्याबद्दल राज्यपाल बैस यांनी 'तेरा पंथ व्यावसायिक मंच' चे विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले, भगवान महावीरांच्या अध्यात्मिक शिकवणीचे पालन करून आचार्य तुलसी यांनी अनुव्रत चळवळीच्या झेंड्याखाली स्त्री अत्याचार, हुंडा प्रथा, विधवांचा छळ, अस्पृश्यता आणि महिलांचा बुरखा यांसारख्या सामाजिक वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठवला.व्यसनमुक्तीसाठी त्यांनी सामाजिक मोहीम सुरू केली. आचार्यजींच्या प्रेरणेने हजारो लोक यात सहभागी झाले आहेत. व्यसनमुक्ती यशस्वी झाली आहे, असे ही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. राज्यपाल पुढे म्हणाले, भारत देश म्हणजे समृद्ध संस्कृती, तत्वज्ञान आणि अध्यात्म असलेली एक महान सभ्यता आहे. महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी आहे. आपल्या देशातील ज्ञानदानाच्या महान परंपरेत भगवान महावीरांना महत्त्वाचे स्थान आहे. अहिंसा, अनेकांत आणि अपरिग्रह या आध्यात्मिक शिकवणींद्वारे लोकांची आध्यात्मिक उन्नती हे त्यांचे ध्येय होते. आपण सर्वांनी लहान संकल्पांच्या माध्यमातून स्वयंविकास, सामाजिक विकास आणि राष्ट्र विकासात योगदान देणे आवश्यक आहे, असे आवाहनही  करून राज्यपालांनी यावेळी केले.

महोदय पुढे म्हणाले की, आपले सर्व धर्मग्रंथ आणि पुराण आपल्याला सांगतात, मानवी जीवन ही आपल्याला ईश्वराची सर्वोत्तम देणगी आहे. फक्त एक माणूस बनून तुम्ही इतरांना, गरीब, असहाय आणि गरजू, असहाय आणि उपेक्षितांना मदत करू शकता. जमिनीवर पडलेल्या लोकांना मदत करू शकतो. आपण अनेकदा पाहतो की, झाडावरच्या मांज्यात पक्षी अडकला की, त्याच्याभोवती जमलेले अनेक पक्षी जोरजोरात ओरडू लागतात. अडकलेल्या पक्ष्याला सापळ्यातून सोडवण्याची क्षमता यापैकी कोणाकडेही नाही. पण एक सामान्य माणूस आपल्या समंजसपणाने आणि क्षमतेने झाडावर अडकलेल्या पक्ष्याची तात्काळ सुटका करतो. दुसऱ्यांना मदत करा, हे करण्याची क्षमता देवाने फक्त मानवालाच दिली आहे.

ते पुढे म्हणाले, एक यशस्वी व्यावसायिक असल्याने, तुमच्यापैकी प्रत्येकाकडे आपल्या ग्रामीण गरीब, आदिवासी,  अपंग, अनाथ आणि तुरुंगातील कैदी, बेबंद लोकांना मदत करण्याची शक्ती आणि क्षमता आहे. तुमच्यात असलेली करुणा जागृत करण्याची गरज आहे. आचार्य महाप्रज्ञा जी यांच्या सल्ल्याने सुरू झालेल्या आचार्य महाप्रज्ञा ज्ञान केंद्राद्वारे आयएएस कोचिंग आणि बोर्डिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे, हे जाणून आनंद झाला असल्याचे सांगून राज्यपाल श्री. बैस यांनी सर्व समुदायातील विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी इतरही शहरे आणि गावांमध्ये अशी केंद्रे उघडण्याचा विचार करावा, असे सूचित केले.  

 

टॅग्स :thaneठाणेRamesh Baisरमेश बैस