शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

फेरीवाला धोरण अद्याप कागदावरच; हक्काची जागा मिळणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 23:57 IST

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष

कल्याण : केडीएमसीकडून २०१४ मध्ये झालेल्या सर्वेक्षणयादीत असलेल्या फेरीवाल्यांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने लवकरच फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले होते; पण अद्याप त्याला मुहूर्त मिळालेला नाही. एकीकडे व्यवसाय न करण्यासाठी परिक्षेत्राची मर्यादा घालून दिली असताना त्याच्याबाहेरही फेरीवाल्यांना मज्जाव केला जात असल्याने आम्हाला हक्काची जागा मिळणार तरी कधी, असा सवाल फेरीवाले करत आहेत.

केडीएमसीकडून २०१४ मध्ये झालेल्या सर्वेक्षणयादीत असलेल्या फेरीवाल्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वेक्षणानुसार महापालिका हद्दीत नऊ हजार ५३१ फेरीवाले आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिका त्यांना ओळखपत्रे तसेच व्यवसायासाठी जागा ठरवून देणार आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाले याप्रमाणे काही ठिकाणी पांढरे पट्टेही मारण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फेरीवाल्यांना रेल्वेस्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. धार्मिक स्थळे, महाविद्यालये, शाळा, सरकारी कार्यालयांपासून १०० मीटर अंतरापर्यंतही व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई केली आहे. पण, केडीएमसीने याची ठोस अंमलबजावणी केलेली नाही.

फेरीवाल्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. एकीकडे रेल्वेस्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्रात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला असला, तरी न्यायालयाच्या आदेशाची ऐशीतैशी झाल्याची प्रचीती कल्याण आणि डोंबिवलीमधील स्कायवॉकवरील वास्तव पाहता येते. फेरीवालाविरोधी पथकांच्या कृपाशीर्वादाने स्कायवॉकवर काही फेरीवाल्यांनी ठाण मांडले असताना मनाई क्षेत्राच्या बाहेर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

विशेषकरून दुकानदारांकडून तसेच वाहन पार्क करणाऱ्यांकडून त्यांना विरोध होत आहे. त्यामुळे १५० मीटरच्या परिक्षेत्राबाहेर व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांचा रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. फेरीवाल्यांना बसू दिले जात नसल्याने वादविवादाचे प्रसंग सातत्याने घडत आहेत. डोंबिवलीतील फडके रोडवर मध्यंतरी फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करणारे बेकायदा फलकही लावले गेले होते. त्यामुळे लवकरात लवकर पुनर्वसन व्हावे आणि आम्हाला आमची हक्काची जागा मिळावी, अशी मागणी फेरीवाले करत आहेत.निर्णयाची अंमलबजावणी होणार की नाही?

आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या कार्यकाळात शहर फेरीवाला समिती स्थापन झाली होती. त्यानंतर, आयुक्त म्हणून आलेले आयुक्त ई. रवींद्रन यांनी फेरीवाल्यांच्या विषयात सकारात्मक दखल घेतली होती. तर, आपणही शहरातील फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाल्यांना ओळखपत्रे आणि नव्याने जागा देण्याचा निर्णय बैठकीत घेतला होता. त्यानंतर, हे सर्व विषय कागदावरच राहिले असल्याकडे येथील भाजीपाला- फळे-फुले फेरीवाला कल्याणकारी या फेरीवाला संघटनेने आयुक्त गोविंद बोडके यांचे लक्ष वेधले आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रशांत माळी यांनी नुकतेच बोडके यांना पत्र दिले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका