शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेअर बाजाराकडे बघण्याची दृष्टी बदला - चंद्रशेखर टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 02:41 IST

शेअर बाजार सतत बदलणारे क्षेत्र आहे. सध्या जे बाजारात सुरू आहे त्याचे स्वरूप, त्याचे प्रमाण आणि त्याची कारणमीमांसा ही आधीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

डोंबिवली - शेअर बाजार सतत बदलणारे क्षेत्र आहे. सध्या जे बाजारात सुरू आहे त्याचे स्वरूप, त्याचे प्रमाण आणि त्याची कारणमीमांसा ही आधीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे शेअर बाजाराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आणि त्यात सहभागी होताना आपण अवलंबण्याची कार्यपद्धती बदलण्याची नितांत आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले.फे्रण्ड्स कट्टा आणि पै फ्रेण्ड्स लायब्ररी यांनी ‘बदलत्या बाजारात आम्ही’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी टिळक बोलत होते. शास्त्री सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. टिळक म्हणाले, मोदी आणि आधीची सरकारे यांच्या अर्थनीतीमुळे आपल्या शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर आहेत. आधीच्या अनेक दशकांच्या तुलनेत हे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. हा बदल सर्वांनीच आवर्जून लक्षात घेतला पाहिजे.बदलत्या शेअर बाजाराचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे निर्देशांक विक्रमी पातळीवर असताना अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती त्यांच्या वर्षभरातील सगळ्यात खालच्या पातळीवर आहेत. हा मुद्दा स्पष्ट करताना टिळकांनी अनेक कंपन्यांच्या नुकत्याच जाहीर झालेल्या वार्षिक कामगिरीचे मार्मिक विश्लेषण केले. भांडवलवृद्धी आणि तरलता यांचे बदलते कोष्टक हे बदलत्या बाजाराचे अजून एक वैशिष्ट्य आहे.बाजारातील तेजीचे श्रेय विदेशी वित्तसंस्थांच्या खरेदीला देण्याचा प्रघात होता. त्याच न्यायाने मंदीचे खापर अशा वित्तसंस्थांनी केलेल्या विक्रीवर फोडले गेले आहे. काही महिन्यांत विदेशी वित्तसंस्थांनी ६००० कोटी रुपयांहून जास्त किमतीचे शेअर्स विकले आहेत.उभरत्या बाजारातून बाहेर पडण्याचा न्याय, अशा संस्था आपल्या देशालाही लावत आहेत. तरीही शेअर बाजाराचा निर्देशांक विक्रमी पातळीवर आहे, हे बाजाराचे वैशिष्ट्य आहे. मोदी सरकारच्या यशस्वी विदेशी नीतीचा घोष करताना या गोष्टीचा विसर पडणे परवडणारे नाही, याकडे टिळक यांनी लक्ष वेधले.अनेक देशांतर्गत आणि जागतिक घटना, तेलाच्या किमती, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी अवलंबलेले धोरण, मोदी सरकारच्या धोरणाचे झालेले आणि संभाव्य फलित आणि त्यांचे दूरगामी परिणाम यांची त्यांनी सोदाहरण चर्चा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आतिश कुलकर्णी यांनी केले.

टॅग्स :Stock Marketशेअर बाजारnewsबातम्या