शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

यंदाच्या अर्थसंकल्पात जीएसटीमुळे ‘आर्थिक वर्ष’ बदलले जाण्याची शक्यता - चंद्रशेखर टिळक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 17:28 IST

आपल्या अर्थ संकल्पाची आर्थिक बाजू पाहता यंदाच्या वर्षी कदाचित जीएसटी लागू केल्यामुळे आपल्या देशाचे ‘आर्थिक वर्ष’ बदलले जाण्याची महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता सुप्रसिध्द अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी येथे व्यक्त केली.

डोंबिवली- आपल्या अर्थ संकल्पाची आर्थिक बाजू पाहता यंदाच्या वर्षी कदाचित जीएसटी लागू केल्यामुळे आपल्या देशाचे ‘आर्थिक वर्ष’ बदलले जाण्याची महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता सुप्रसिध्द अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी येथे व्यक्त केली. ब्राह्मण सभा डोंबिवली आणि कौटिल्य नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन ब्राह्मण सभा सभागृहात शनिवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी टिळक यांनी उपरोक्त शक्यता व्यक्त केली.ते म्हणाले की, जीएसटी देखील जुलैमध्ये आणण्याचे कारण अर्थ संकल्पीय वर्ष बदलणार हे डोळ्यांसमोर ठेवूनच आणला गेला आहे. जीएसटीमुळे पाच वर्षांत नुकसान झाल्यास भरपाई दिली जाईल असे सांगण्यात आले आहे. जीएसटी जुलैमध्ये आल्यामुळे वर्ष तर पूर्ण पकडले जाईल. पण नुकसानभरपाई केवळ पाच महिन्यांची द्यावी लागेल. त्यात काही गैर ही नाही. आपले नवीन आर्थिक वर्ष १ जानेवारी ते ३१ डिसेंबर असेल. नवीन आर्थिक वर्ष १ जानेवारीला सुरू होणार असेल तर अर्थसंकल्प सप्टेंबर महिन्यात येईल. ग्राहक अपेक्षा व्यक्त करीत असतो. ग्राहकाला खूप काही हवं असते. परंतु आपली काही पंतप्रधान नरेंद्र मोदीशी घसट नाही. त्यामुळे आपल्याला हवे ते मिळेलच असे नाही. ग्राहक म्हणून किंमती कमी असाव्यात ही आपली अपेक्षा असते. दुसरीकडे ग्राहकांना चार लाख ते पाच लाखांच्या उत्पन्नावर कर सवलती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली, तरी ती देताना सरकाराला महसूलाची बांधाबांध करावी लागते. जीएसटीचे सातत्याने उत्पन्न मिळत नाही तोपर्यंत करात सवलत दिली जाणार नाही. आजचे व्याख्यान म्हणजे पतंगबाजी सारखे आहे. कोण कोणाचा पतंग छाटेल हे समजणार नाही. घटत्या व्याजदराबाबत काय कल असेल याचे अपेक्षित उत्तर दिले जाऊ शकत नाही. येत्या काळात कोणत्याही परिस्थितीत व्याजदर वाढण्याची शक्यता नाही.बॅक ही संकल्पना सरकारला अपेक्षित नाही. त्यादिशेने सध्या सरकारची वाटचाल सुरू आहे. आज बॅका जेवढ्या संख्येने आहेत तेवढ्या सरकारला अपेक्षित नाहीत. अल्प बचतीचे व्याजदर कमी होत आहे. व्याजदर एकदम कमी केले तर ते लोकांच्या लक्षात येते. त्यामुळेच अल्पबचतीच्या दरात घट केली जाते. किसान विकास पत्रांचा दर ५८ टक्क्यांनी कमी झाला आहे. पूर्वी पाच वर्षात पैसे दुप्पट होत होते. आता त्याला ९ वर्ष इतका कालवधी लागतो. सगळ्या गोष्टी या आधार लिंक होणार आहेत. त्यामुळे एखाद्या दलालांनी फसविले तरी आधार लिंक मुळे त्यांचे रेकार्ड तयार झालेले असणार आहे. बॅक सिक्युरिटी निर्माण करतील त्यांची सुरूवात येत्या अर्थ संकल्पातून होईल, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणे