शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

चल बाला, भरणार ‘आगरी शाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:35 IST

बोलीचा वापर वाढवण्याचा प्रयत्न : दहा दिवसांच्या प्रशिक्षणवर्गात उलगडणार भाषेचे पैलूू

ठाणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत आगरी बोली भाषा शिकविणारी ‘आगरी शाला’ भिवंडीजवळ कशेळी गावात भरणार आहे. त्यात दहा दिवसांचे प्रशिक्षणवर्ग होतील. तुम्ही आगरी असा वा नसा किंवा तुम्हाला आगरी येवो किंवा नाही; परंतु आगरी बोली, तिची गोडी, साहित्य जाणण्यासाठी, आगरी भाषेवर प्रेम करणाऱ्यांसाठी हा नवा उपक्रम सुरू झाला आहे.मुंबई, ठाणे, रायगडच्या स्थानिकांची बोली म्हणजे आगरी. अनेकांना या भाषेचे नेमके पैलू माहीत नाहीत. इंग्रजी-हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे आगरी बोलीचा वापर कमी होत चालला आहे. ती बोलणाºया वर्गाला भाषेचा विसर पडत आहे. यावर उपाय म्हणून ज्यांना आगरी बोली शिकायची आहे वा तिच्याबद्दल अधिक माहिती मिळवायची आहे त्यांच्यासाठी युवा साहित्यिक सर्वेश रवींद्र तरे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वर्ग घेण्याचे ठरविले आहे. तरे हे स्वत: बोलीभाषा अभ्यासक असून साहित्य संमेलनात बोलीभाषा समितीचे सदस्य होते. या ‘आगरी शाला’ प्रयोगात काही तज्ज्ञ-मार्गदर्शकांचाही सहभाग असेल. त्यात आगरी शब्दकोशाचे निर्माते प्रा.सदानंद पाटील, आगरी बोली आणि संस्कृतीचे अभ्यासक मोरेश्वर पाटील, आगरी कवी-साहित्यिक गजानन पाटील, साहित्य संमेलनाच्या बोलीभाषा कट्ट्याचे अध्यक्ष डॉ. अनील रत्नाकर, कवी-साहित्यिक प्रकाश पाटील तसेच गीतकार-संगीतकार दया नाईक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या प्रयोगात सहभागी आगरी शाळेच्या विद्यार्थ्यांना लघु पाठ्यक्रम असलेले पुस्तकही मिळणार आहे. ज्यात आगरी बोलीतील पद्य आणि गद्याचा समावेश असेल. याचे संपादन मोरेश्वर पाटील आणि तरे यांनी केले आहे. या प्रशिक्षणात सर्व वयोगटातील जास्तीत जास्त आगरी भाषाप्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन तरे यांनी केले. २ं१५८ं३ं१ी@ॅें्र’.ूङ्मे वर इछुकांनी माहिती पाठवावी. या आगरी प्रयोगानंतर इतरही बोलींमध्ये असे प्रयोग करण्याचा विचार करीत असल्याचे डॉ. रत्नाकर यांनी सांगीतले. ‘आगरी शाला’ या उपक्र माअंतर्गत आगरी भाषेचे अनेक पैलू उलगडणार असल्याचे तरे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे