शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

भिवंडीत गोदाम विकासकाच्या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांचे साखळी उपोषण 

By नितीन पंडित | Updated: February 2, 2024 17:45 IST

शेतकऱ्यांनी साखळी उपोषण मागील चार दिवसांपासून सुरू केले आहे.

भिवंडी : तालुक्यातील वाशेरे गावातील शेतकऱ्यांना विकासकाने मागील चार वर्षांपासून भाडे दिले नसून गोदामांचा ताबा ही देत नसल्याने हवालदिल झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी साखळी उपोषण मागील चार दिवसांपासून सुरू केले आहे.

पडघा कल्याण रस्त्यावरील वाशेरे आमणे या गावातील सुमारे दोनशे एकर जमीन रेनिसेंस इंडस इन्फ्रा प्रा.ली.या कंपनीने शेतकऱ्यां सोबत काही जमीन विकत घेत सुमारे दोनशे एकर शेतजमीन विकसित करण्याच्या करारावर २००७ ते २०१२ दरम्यान घेतली.जमिनीच्या शासकीय व्यवहारासाठी शेतकऱ्यांकडून कुलमुखत्यार पत्र बनवून घेतले .या कागदपत्रांच्या आधारे विकासक कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण ठेवून द डिझाईन इंडिया ग्रुप कडून कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले.परंतु त्यानंतर प्रोजेक्ट डबघाईस आल्याने कंपनी दिवाळखोरीत निघाली.त्यामुळे शेतकऱ्यांना मागील पाच वर्षां पासून त्यांच्या जमिनीचे भाडे देणे कंपनीने बंद केले.व जमिनीचा ताबा ही दिला जात नाही. कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने फेब्रुवारी २०२३ शेतकरी व कंपनी यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यातून शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही.अखेर हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी २९ जानेवारी पासून वाशेरे गावात रेनिसेंस इंडस इन्फ्रा प्रा.ली. या गोदाम संकुलाच्या प्रवेशद्वारा शेजारी साखळी उपोषणास सुरवात केली आहे.

शेतकऱ्यांवर गोदाम विकासकाने केलेल्या फसवणुकी मुळे भाडे मिळत नाही तर गोदामांचा ताबा ही दिला जात नाही यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले असून,शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी वरील गोदामात वाराई काम करू देण्यास मज्जाव केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे शासनाने वेळीच लक्ष देवून आमच्या जमिनी आमच्या ताब्यात मिळवून द्याव्यात अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिलीप केणे यांनी दिला आहे.या आंदोलना ठिकाणी भिवंडी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांची संबंधित गोदाम विकासक यांच्या सोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी