शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भिवंडीतील पडघा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात साखळी उपोषण

By नितीन पंडित | Updated: July 2, 2024 16:11 IST

या आंदोलनात उपाध्यक्ष डॉ. पवन महाजन, अशफाक शेख, सचिव जयेश जाधव, खजिनदार मनोज गुंजाळ आदी सहभागी झाले होते.

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या पडघा ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध समस्यांविरोधात ग्रामविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पडघा ग्रामपंचायत कार्यालया बाहेर लाक्षणिक साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात उपाध्यक्ष डॉ. पवन महाजन, अशफाक शेख, सचिव जयेश जाधव, खजिनदार मनोज गुंजाळ आदी सहभागी झाले होते.

ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय गुरुचरण जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश असताना सुद्धा ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत कोणतीही कारवाई करत नाही. ग्रामपंचायत हद्दीत जमा होणारा बाजार कर मागील पाच वर्षे शासकीय नियमाप्रमाणे ग्रामपंचायत बँक खात्यात नियमित भरणा न करता त्या मध्ये लाखोंचा भ्रष्टाचार केल्याने संबंधितांवर आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे नोंदविण्यात यावेत. जल जिवन मिशन योजनेत १४ कोटी रुपये खर्च करून नागरिकांनी पाणी मिळालेले नाही, यासाठी जबाबदार अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 

पाणी योजनेअंतर्गत दोन पाण्याच्या टाकी फिल्टर प्लांट कार्यान्वयेत असल्याची खोटी माहिती ग्रामपंचायतने कोर्टात दिलेली आहे त्याबद्दल कायदेशीर गुन्हा नोंदवावा, ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग व्यक्तींचा २०१८ ते २०२२ पर्यंतचा निधी देण्यात आलेला नाही, त्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना दिव्यांगणा प्रलंबित निधी मिळावा अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असून जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहील अशी भूमिका ग्रामविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी