शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मराठीला ठरवले कामचलाऊ, श्रीपाद जोशींचा सरकारवर चाबूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:45 IST

आठवीपर्यंत मराठी भाषेची सक्ती पुरेशी असून मराठी वाचण्या लिहिण्यापुरती येणे पुरेसे आहे, हे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे विधान म्हणजे नफा कमावण्याच्या उद्देशाने इंग्रजी भाषेला वाव देऊन मराठी भाषेला कामचालू समजण्यासारखे आहे

जान्हवी मोर्येडोंबिवली : आठवीपर्यंत मराठी भाषेची सक्ती पुरेशी असून मराठी वाचण्या लिहिण्यापुरती येणे पुरेसे आहे, हे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे विधान म्हणजे नफा कमावण्याच्या उद्देशाने इंग्रजी भाषेला वाव देऊन मराठी भाषेला कामचालू समजण्यासारखे आहे. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनीच अशी भूमिका घेणे, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची खंत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केली आहे.खाजगी कंपन्यांना इंग्रजी शाळा उघडण्याची परवानगी देणाºया विधेयकाचे समर्थन करताना तावडे यांनी वरील वक्तव्य केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्याचा संदर्भ देत जोशी म्हणाले की, सरकारचे मराठीविषयीचे धोरण हे अत्यंत चुकीचे आणि मराठी भाषेवर अन्याय करणारे आहे. मराठी केवळ वाचता, लिहिता येण्यापुरती आली तरी चालेल, असे तावडे यांच्या वक्तव्यातून प्रतीत होत आहे. मराठीऐवजी इंग्रजी ही ज्ञान भाषा जनमानसात प्रस्थापित व्हावी, यासाठी सरकारकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याने सरकारचे धोरण हे इंग्रजीधार्जिणे व मराठीद्वेष्टे आहे. मराठी ही भाषा सर्वाधिक गरजेची भाषा आहे. तिला कामचालू करून इंग्रजीचा पुरस्कार करणे योग्य नाही. इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांना अधिकाधिक परवानगी देणे, हे मराठी भाषेला मारक आहे. तसा इशारा भाषातज्ज्ञांनी देणे गरजेचे होते. तसा इशारा त्यांच्याकडून दिला गेला नाही. मराठी ही मराठी भाषकांची विचार करण्याची, अभिव्यक्त होण्याची भाषा आहे. ती कामचालू भाषा नाही. मराठी हा विषय पदवीपर्यंतच्या ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध असणे गरजेचे आहे. जोशी म्हणाले की, इंग्रजी शाळांचा बाजार मांडून त्यातून सरकारला नफा कमवायचा आहे. मराठीची गळचेपी सुरू करायची आहे. मुक्त नफा व मुक्त स्वातंत्र्य देणारे, हे सरकारचे धोरण भारतीय भाषांना ज्ञानभाषा होण्यापासून रोखणारे आहे.मराठीच्या साहित्य उत्सव जागराला व मराठी संवर्धनाचे काम करणाºया संस्थांना मदतीचा हात न देता मराठी विरोधी धोरणात्मक निर्णय घेऊन मराठी संप्वण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याची टीकाही जोशी यांनी केली. सरकारचे मराठीविषयीचे धोरण हे अत्यंत चुकीचे आणि मराठी भाषेवर अन्याय करणारे आहे, असेही ते म्हणाले.