शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पावसामुळे मध्य रेल्वेचा वेग मंदावला : ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 16:49 IST

शनिवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पहाटे कसा-याच्या दिशेने धावणा-या कसारा गाडीसह उपनगरिय लोकल पहाटेपासूनच बाधित झाल्या. काही लोकल ठाणे स्थानकात रद्द केल्यानेही प्रवाशांचे हाल झाले. या गोंधळामुळे वेळापत्रक ४० मिनिटे विलंबाने धावले, पण लोकल सेवा र्पूर्णपणे बंद न झाल्याचे प्रवाशांमध्ये समाधान होते.

ठळक मुद्देलोकल रद्द केल्याने प्रवासी हैराण गोंधळामुळे वेळापत्रक ४० मिनिटे विलंबाने धावले,

डोंबिवली: शनिवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पहाटे कसा-याच्या दिशेने धावणा-या कसारा गाडीसह उपनगरिय लोकल पहाटेपासूनच बाधित झाल्या. काही लोकल ठाणे स्थानकात रद्द केल्यानेही प्रवाशांचे हाल झाले. या गोंधळामुळे वेळापत्रक ४० मिनिटे विलंबाने धावले, पण लोकल सेवा र्पूर्णपणे बंद न झाल्याचे प्रवाशांमध्ये समाधान होते.मुंबईमध्ये पावसाची जोर कायम होता, त्यामुळे कुर्ला-सायन भागात रेल्वे रूळांमध्ये पाणी साठल्याने त्याचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील लोकल सेवेवर झाला. ठाणे, दिवा मार्गावर लोकलचे बंचिंग( एकामागोमाग रांग) झाले होते. त्यामुळे सकाळपासून मुंबईला जाणा-या चाकरमान्यांचे हाल झाले. कल्याण-ठाणे प्रवासाला ऐरव्ही २५ मिनिटे धीम्या तर १८ मिनिटे जलद मार्गावरील अप-डाऊन लोकल प्रवासाठी लागतात, पण शनिवारच्या गोंधळामुळे सकाळच्या पहिल्या सत्रात अर्धा ते पाऊण तास लागला. वेळापत्रक कोलमडल्याने ठाणे स्थानकात काही लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ठाणे, दिवा, डोंबिवली कल्याण, अंबरनाथ, बदलापूर तसेच टिटवाळा, आसनगाव स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती.हीच स्थिती दुपारी, संध्याकाळ चार पर्यंत उद्भवली. सायन-कुर्ला मार्गावर पाणी साठल्याने मुंबई-दादरहून निघालेल्या लोकल डाऊनमार्गे कासवगतीने धावल्या, घाटकोपर-ठाण्यापर्यंत गाड्यांचा वेग मंदावलेला होता. ठाणे स्थानकात दुपारी ३ ते ४ या वेळेत केवळ धीम्या मार्गावरील फलाट क्रमांक ४ वरुनच मुंबईच्या दिशेने धावल्या, तर फलाट १ वरुन मुंबईसाठी लोकल सोडल्याच नाहीत अशी माहिती प्रत्यक्षदर्शी जितेंद्र विशे या प्रवाशाने दिली. लोकल गाड्या रद्द होणे, वेग मंदावणे यामुळे दुपारनंतर घरी परतणा-या चाकरमान्यांमुळे गाड्यांना प्रचंड गर्दी झाली होती. मुंबईच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेत प्रवाशांनी दुपारनंतर तातडीने घरी परतण्याचा निर्णय घेतला, त्यामुळेही दुपारच्या वेळेत गर्दी झाली होती. सकाळी मुंबईला काही लोकल न पोहोचल्याचा परिणाम संध्याकाळच्या वेळापत्रकावर झाला. रात्रीपर्यंत दोन्ही मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा वेळेनूसार धावत होती. या गोंधळामुळे लांबपल्याला जाणा-या गाड्यांच्या वेळापत्रक फारसे प्रभावित झाले नाही. अप-डाऊन मार्गावर गाड्या शनिवारी वेळेत धावल्याने त्या गाड्यांनी जाणा-या प्रवाशांना दिलासा मिळाला.* मुंबईत होणा-या पावसासंदर्भात नागरिकांना आधीपासूनच कल्पना होती, त्यातच दुसरा शनिवार असल्याने लोकल प्रवाशांची सकाळपासूनच गर्दी कमी होती. लोकलचा वेग मंदावलेला असला तरी लोकल सुरु होत्या. - माणिक साठे, पोलीस निरिक्षक-कल्याण

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली