शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

३७ हजार विद्यार्थ्यांना विमा सुरक्षा , माध्यान्ह आहार योजनेसाठी मध्यवर्ती स्वयंपाक केंद्रही उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:01 IST

ठाणे महापालिका शाळांमधील तब्बल ३७ हजार ४१ विद्यार्थ्यांना आता विमा सुरक्षा कवच मिळाले आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्यातून पालिकेने विद्यार्थ्यांचा हा अपघात विमा काढला आहे.

ठाणे : ठाणे महापालिका शाळांमधील तब्बल ३७ हजार ४१ विद्यार्थ्यांना आता विमा सुरक्षा कवच मिळाले आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्यातून पालिकेने विद्यार्थ्यांचा हा अपघात विमा काढला आहे. त्यामुळे अपघाती मृत्यू झाल्यास संबंधितांना दीड लाखांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे. तर पाच हजार विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह आहार योजनेसाठी मध्यवर्ती स्वयंपाक केंद्रही पवारनगर भागात सुरु करण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी प्रतिनिधिक स्वरुपात अपघाती विम्याची कागदपत्रे पालिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. देशातच नव्हे तर जगभरात प्रथमच महापालिका शाळांमधील पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे. शहरातील आर्थिकदृष्टया दुर्बल, डोंगराळ तसेच खाडीकिनारी वास्तव्यास असलेल्या पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २४ तास हे सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने ही अपघातविमा योजना राबविणार असल्याची माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. याअंतर्गत ५५ बालवाड्या, १२५ मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यंमाच्या प्राथमिक शाळा, १६ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.या योजनेतंर्गत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू ओढवल्यास तसेच कायमचे अपंगत्व आल्यास दीड लाख रुपये तर अपघातामुळे एखादा अवयव निकामी झाल्यास ७५ हजार, अपघातामुळे उद्भवलेल्या वैद्यकीय खर्चासाठी ३५ हजार इतके अर्थसहाय्य पालकांना दिले जाणार आहे. या विमा कवचामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्यांचा चांगला फायदा होणार आहे.महापालिका आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे लेकसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षयपात्र फाउंडेशन आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पवारनगर येथे महापालिकेच्या २६ शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन आहार योजनेतून मध्यवर्ती स्वयंपाक केद्र सुरु केले आहे. त्याचेही उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी बुधवारी केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका