शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाने ५०० ग्राम वजनाच्या मुलाला दिले जीवदान

By सदानंद नाईक | Updated: September 29, 2023 16:15 IST

उल्हासनगर शेजारील अंबरनाथ जुना गायकवाड पाडा येथील ममता निकम नावाच्या गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने, ती उपचार करण्यासाठी ३ महिन्यांपूर्वी मध्यवर्ती रुग्णालयात आली.

उल्हासनगर - मध्यवर्ती रुग्णालयात ममता निकम या महिलेची कमी दिवसात प्रसूती होऊन ५०० ग्राम वजनाच्या बाळाला जन्म दिला. डॉक्टर व नर्सनी नवजात शिशुकक्षात बाळावर तीन महिने यशस्वी उपचार केल्याने, बुधवारी बाळाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यावेळीं बाळाचे वजन २ किलो व तब्येत सुदृढ झाल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.

उल्हासनगर शेजारील अंबरनाथ जुना गायकवाड पाडा येथील ममता निकम नावाच्या गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने, ती उपचार करण्यासाठी ३ महिन्यांपूर्वी मध्यवर्ती रुग्णालयात आली. ६ महिन्याची गर्भवती असणाऱ्या ममता निकम हिने उपचारा दरम्यान कमी दिवसाच्या बाळाला जन्म दिला. त्यावेळी बाळाचे वजन अवघे ५०० ग्राम असल्याने, बाळाच्या तब्येतीबाबत कुटुंबासह डॉक्टर्स व नर्स यांच्या समोर यक्षप्रश्न उभा ठाकला होता. मात्र आईला मुला विषयी असलेले प्रेम व लळा बघून नवजात शिशु कक्षातील डॉक्टर वसंतराव मोरे, डॉ वैशाली पवार, डॉ किरण बनसोडे, डॉ आझम खान, डॉ पूजा यादव, नर्स जयश्री शिंदे, गौरी केलसिकर आदींनी सतत ३ महिने मेहनत घेऊन बाळाला पुनर्जन्म दिला. यादरम्यान बाळाच्या डोळ्याला संसर्ग झाल्याने, त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी होत असून वर्षाला ६ हजार पेक्षा जास्त बाळांचा जन्म होतो. २०२ बेडची क्षमाता असलेल्या रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. तर नवजात शिशु कक्षाची क्षमता १० बालकांची असतांना सरासरी १५ पेक्षा जास्त मुलांवर उपचार होत असल्याची माहिती जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली.

असुविधेवर मात मध्यवर्ती रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाची क्षमता १० बालकांची असून व्हेंटिलेटरची सुविधा नाही. आदी अपुऱ्या सुविधेवर डॉक्टरांनी मात करून बाळाची तब्येत ठणठणीत करून घरी सुखरूप पाठविले आहे.

आईच्या जिद्दीला सलाम ममता निकम या महिलेची ६ महिण्यात प्रसूती होऊन अवघ्या ५०० ग्राम बाळाला जन्म दिल्याने, कुटुंबानी बाळाच्या जगण्याची आशा सोडली होती. मात्र आईच्या जिद्दीला डॉक्टर व नर्सनी सलाम ठोकून उपचार केले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर