शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पानखंडाला पाणी देण्यास केंद्राची मंजुरी हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:43 IST

तहानलेल्या पाड्यांबाबत ‘लोकमत’ने वृत्ते दिली तेव्हा कुठलीही प्रतिक्रिया न देणाऱ्या वन खात्याने ठाणे महापालिकेने पाणीपुरवठ्याची लगबग सुरू करताच प्रलंबित न्यायालयीन दाव्याचे कारण सांगून आपली जबाबदारी झटकली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : घोडबंदर भागातील पानखंडा, देवाचा पाडा, बमनाली पाड्यावरील तहानलेल्या आदिवासींना त्यांचे वास्तव्य खासगी वनक्षेत्रात असल्याने मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेमुळे पाणीपुरवठा करता येणार नाही. आदिवासींना पाणी देण्याकरिता येथे काम करायचे, तर केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असा दावा वन खात्याने केला.

तहानलेल्या पाड्यांबाबत ‘लोकमत’ने वृत्ते दिली तेव्हा कुठलीही प्रतिक्रिया न देणाऱ्या वन खात्याने ठाणे महापालिकेने पाणीपुरवठ्याची लगबग सुरू करताच प्रलंबित न्यायालयीन दाव्याचे कारण सांगून आपली जबाबदारी झटकली आहे. 

वन विभागाने न्यायालयाच्या आदेशाची कल्पना दिली होती. येथील कोणत्या भागांना पाणीपुरवठा करणे शक्य आहे, त्यानुसार काम केले जाईल. ज्या भागांना पाणी देता येणार नाही, त्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल.- अतुल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठाणे महापालिका

प्रकरण न्यायप्रविष्ठघोडबंदर भागातील पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांवरील पाण्याच्या समस्येला ‘लोकमत’ने वाचा फोडली. येऊरचा वन विभाग येथील कामासाठी परवानगी देत नसल्याचा आरोप ठाणे महापालिकेने केला. आता वन विभागाने म्हटले आहे की, पानखंडा आदिवासी पाडा हा नियतक्षेत्र ओवळा राखीव वन सर्व्हे क्रमांक २९१ (संपादित खाजगी वन असून, त्यास राखीव वनाचा दर्जा आहे.) या क्षेत्राबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल असून, ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

प्रस्ताव अद्याप सादर नाहीवनक्षेत्रातील अतिक्रमणधारकास नव्या सुविधा पुरविल्यास उच्च न्यायालयाने पारित केलेल्या आदेशांची अवमान होण्याची शक्यता आहे, तसेच कोणतेही वनेतर काम करण्यासाठी परवानगी देण्याचा अधिकार आमच्या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात नाही. यासाठी केंद्र शासनाची पूर्वपरवानगी बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याची माहिती महापालिकेच्या संबंधित विभागाला दिल्याचे येऊर वन विभागाने स्पष्ट केले. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्यास त्यांना सांगितल्याचे वन विभागाने सांगितले; परंतु महापालिकेने तसा प्रस्ताव अद्याप तयार करून केंद्राकडे सादर केला नसल्याची माहिती दिली.