शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

उल्हासनगरचा ७१ वा स्थापना दिवसा केक कापून साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 16:46 IST

देशाच्या फाळणी वेळी विस्थापित झालेल्या बहुसंख्य सिंधी बांधवांना कल्याण शहारा जवळील ब्रिटिश कालीन लष्करी छावणीच्या बॅरेक व खुल्या जागेत वसविण्यात आले.

उल्हासनगर : शहराचा ७१ वा स्थापना दिवसनिमित्त तरण तलाव येथील ऐतिहासिक शिलालेखाला पुष्पहार अर्पण करून आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती राजेश वधारीया, विविध पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते.

देशाच्या फाळणी वेळी विस्थापित झालेल्या बहुसंख्य सिंधी बांधवांना कल्याण शहारा जवळील ब्रिटिश कालीन लष्करी छावणीच्या बॅरेक व खुल्या जागेत वसविण्यात आले. ८ आॅगस्ट १९४९ साली देशाचे पहिले गव्हर्नर सी. गोपालचारी यांनी विस्थापित वस्तीच्या बाजूने वाहणाऱ्या उल्हास नदी वरून विस्थापित वस्तीला उल्हासनगर नाव देण्यात आले.

शहर नामकरणाच्या ऐतिहासिक शिलालेख महापालिका मुख्यालयात मागील तरण तलाव येथे ठेवण्यात आला असून शहराच्या वर्धापन दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने नामांतर शिलालेखाला पुष्पहार अर्पण करून विविध पक्षाच्या नेत्यांनी केक कापून शहराचा वर्धापन दिवस साजरा केला.

सिंधी समाजाने शून्यातून विश्व निर्माण केले असून सर्वच क्षेत्रात सिंधी बांधवांनी स्व: कर्तुत्वावर शहराचे नाव राज्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध केले. देशातील सर्वाधिक घनतेच्या शहरात कोणीही उपासी झोपत नाही. अशी ख्याती आहे. व्यापाऱ्यांचे हब असलेल्या शहरात कोट्यवधीची उलाढाल होते. मात्र शहराचा विस्तार, शासन सवलती, महापालिका आयुक्त, रिक्त जागा न भरणे आदी कामे झाल्यास शहराला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त होणार आहे.

आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते तरण तलाव येथील शहराच्या शिलालेखातचे पूजन करून केक कापण्यात आला. यावेळी उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती राजेश वाढारिया, विविध पक्षाचे नगरसेवक, मनसेचे व वालधूनी बिरदरीचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर