शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

उल्हासनगरचा ७१ वा स्थापना दिवसा केक कापून साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 16:46 IST

देशाच्या फाळणी वेळी विस्थापित झालेल्या बहुसंख्य सिंधी बांधवांना कल्याण शहारा जवळील ब्रिटिश कालीन लष्करी छावणीच्या बॅरेक व खुल्या जागेत वसविण्यात आले.

उल्हासनगर : शहराचा ७१ वा स्थापना दिवसनिमित्त तरण तलाव येथील ऐतिहासिक शिलालेखाला पुष्पहार अर्पण करून आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती राजेश वधारीया, विविध पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते.

देशाच्या फाळणी वेळी विस्थापित झालेल्या बहुसंख्य सिंधी बांधवांना कल्याण शहारा जवळील ब्रिटिश कालीन लष्करी छावणीच्या बॅरेक व खुल्या जागेत वसविण्यात आले. ८ आॅगस्ट १९४९ साली देशाचे पहिले गव्हर्नर सी. गोपालचारी यांनी विस्थापित वस्तीच्या बाजूने वाहणाऱ्या उल्हास नदी वरून विस्थापित वस्तीला उल्हासनगर नाव देण्यात आले.

शहर नामकरणाच्या ऐतिहासिक शिलालेख महापालिका मुख्यालयात मागील तरण तलाव येथे ठेवण्यात आला असून शहराच्या वर्धापन दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने नामांतर शिलालेखाला पुष्पहार अर्पण करून विविध पक्षाच्या नेत्यांनी केक कापून शहराचा वर्धापन दिवस साजरा केला.

सिंधी समाजाने शून्यातून विश्व निर्माण केले असून सर्वच क्षेत्रात सिंधी बांधवांनी स्व: कर्तुत्वावर शहराचे नाव राज्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध केले. देशातील सर्वाधिक घनतेच्या शहरात कोणीही उपासी झोपत नाही. अशी ख्याती आहे. व्यापाऱ्यांचे हब असलेल्या शहरात कोट्यवधीची उलाढाल होते. मात्र शहराचा विस्तार, शासन सवलती, महापालिका आयुक्त, रिक्त जागा न भरणे आदी कामे झाल्यास शहराला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त होणार आहे.

आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते तरण तलाव येथील शहराच्या शिलालेखातचे पूजन करून केक कापण्यात आला. यावेळी उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती राजेश वाढारिया, विविध पक्षाचे नगरसेवक, मनसेचे व वालधूनी बिरदरीचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर