शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

कांदाचोरी रोखण्यासाठी व्यापाऱ्यांनी लावले सीसीटीव्ही कॅमेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 06:04 IST

चोरांचा घेतला धसका; ठाण्यातील महात्मा फुले मंडईतील प्रकार

ठाणे : एकीकडे कांद्याने गृहिणींच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. तर, दुसरीकडे व्यापारीवर्गही कांद्यामुळे दहशतीखाली आला आहे. ठाण्याची मुख्य भाजीमंडई असलेल्या महात्मा फुले मंडईत कांद्याची चोरी वाढली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथील २० ते २५ विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांची निगराणी २४ तास केली जात आहे. त्यामुळे कांद्याला आता किती महत्त्व आले आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे.

सध्या कांद्याचे भाव १२० ते १६० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मागील आठवड्यात ठाण्यातील मार्केटमधून रात्रीच्या सुमारास ६० किलो कांद्याची गोणी चोरीला गेली होती. तसेच वारंवार अशा प्रकारे कांदाचोरीचे प्रकार या मार्केटमध्ये होत होते. जसा हा कांदा सर्वसामान्यांना रडवडत आहे. तसाच तो व्यापाऱ्यांनाही आता रडण्यास भाग पाडत असल्याचे दिसत आहे. अवकाळी पावसामुळे ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. यामुळे भाजीमंडईमध्ये आता चौकीदार ठेवण्याची वेळ आली आहे.

विशेष म्हणजे कांद्याची चोरी होऊ नये म्हणून ठाण्यातील भाजीमंडईचे व्यापारी हे रात्रीसुद्धा स्वत: गस्त घालत आहेत. एकीकडे भाज्यांच्या भावाने शंभरी गाठली आहे आणि त्यात कांदा १२० ते १६० रु पये किलो झाला आहे. सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर होत असलेल्या कांद्यावर चोरांची नजर पडत आहे. यामुळे आता व्यापारी धास्तावले असून कांद्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांनी वर्गणी काढून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

महागाईमुळे मागणी झाली कमी

महात्मा जोतिबा फुले मंडईमध्ये २० ते २५ कांदा व्यापारी आहेत. रोज येथे शेकडो किलो कांद्यांच्या खरेदीविक्र ीचा व्यवहार होतो. पण, अवकाळी पावसामुळे कांद्याचे दोन हंगाम वाया गेले. त्यामुळे कांद्याची आवक घटली असून किरकोळ बाजारात कांद्याने १६० रु पयांपर्यंत मजल मारली आहे. एक कांदा २० ते ३० रु पये दराने मिळत असल्याने जिथे किलोकिलोने कांदे विकत घेतले जात होते, तेथे आता ग्राहक पाव किलो कांद्याचीही मागणी करताना दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्याच नव्हे तर व्यापाºयांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे. व्यापाºयांनी केवळ कॅमेरेच बसवले नाहीत, तर त्याच्यासाठी २४ तास आॅपरेटरची व्यवस्थाही केली आहे. एवढे असूनसुद्धा कांद्याच्या व्यवसायात नफा फार कमी मिळतो, असा त्यांचा दावा आहे.

टॅग्स :onionकांदाcctvसीसीटीव्ही