शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

ग्रॅच्युइटीस नकार देणाऱ्या आयुक्तांचे उपटले कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:05 IST

भाईंदर : मीरा- भार्इंदर शहरांची स्वच्छता करणाऱ्या सोळाशे कंत्राटी सफाई कामगारांना ग्रॅच्युइटी देण्यास नकार देणारे पालिका आयुक्त बालाजी खतगावकर ...

भाईंदर : मीरा- भार्इंदर शहरांची स्वच्छता करणाऱ्या सोळाशे कंत्राटी सफाई कामगारांना ग्रॅच्युइटी देण्यास नकार देणारे पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांचे कान कामगार आयुक्तांनीच उपटले आहेत. निविदा प्रक्रिया राबवताना ग्रॅच्युइटीचा विचार केला नसला तरी कामगार कायद्याने ५ वर्षे वा त्यापेक्षा जास्त काम करणाऱ्यांना ते देणे बंधनकारक असल्याचे खतगावकरांना ठणकावून सांगितले. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे याप्रकरणी आयुक्तांची तक्रार केली आहे.

दैनंदिन कचरा व गटारसफाईबरोबरच कचरा वाहतुकीसाठी महापालिकेने २४ एप्रिल २०१२ रोजीग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट सेल या कंत्राटदारास ५ वर्षांसाठी कंत्राट दिले होते. १ हजार ५९९ कंत्राटी सफाई कामगारांना कामावर घेण्यात आले होते. कंत्राटदाराची मुदत १ मे २०१७ रोजीच संपुष्टात आल्यानंतर तेव्हापासून मुदतवाढीवरच सफाईकाम चालले आहे.

कामगार कायद्यानुसार ५ वर्षे वा त्यापेक्षा जास्त सेवा बजावणाºया कामगारांना ग्रॅच्युइटी देणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने कंत्राटी सफाई कामगारांना देण्याची मागणी पंडित यांनी महापालिकेपासून सरकारकडे केली होती. कामगार उपायुक्तांनीही एका पत्रानुसार ग्रॅच्युइटी देणे बंधनकारक असल्याचे कळवले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंडित यांच्या निवेदनावर पालिकेस नवीन निविदा काढण्यास स्थगिती दिली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनीच आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्रानंतर स्थगिती उठवली. निविदा प्रक्रिया अजूनही सुरूच असून नव्याने कंत्राटदार नियुक्त केलेला नाही. खतगावकर यांनी मात्र ग्रॅच्युइटीची रक्कमच देण्यास नकार दिला. २०१२ मध्ये निविदा काढताना ग्रॅच्युइटी लागू होत नसल्याने त्याची रक्कम निविदेत नमूद केली नव्हती. त्यामुळे कंत्राटदारास ग्रॅच्युइटीची रक्कम पालिकेने दिलेली नाही. कंत्राटदार मंजूर दरानेच काम करत असल्याने ग्रॅच्युइटीच्या फरकाची रक्कम अनुज्ञेय नसल्याचे आयुक्तांनी लेखी दिले होते.

सफाई कामगारांच्या थकीत ग्रॅच्युइटीची रक्कम १० कोटींच्या घरात असून अनेक कामगार तर २० वर्षांपासून कामास आहेत. आयुक्तांनी ग्रॅच्युइटीस नकार दिल्याने पंडित यांनी राज्याच्या कामगार आयुक्तांकडे पालिकेची तक्रार केली होती. पंडित यांच्या तक्रारीवरून कामगार आयुक्तांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. पत्रात कामगार सलग ५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा केली असेल, तर तो ग्रॅच्युइटीस पात्र ठरतो. कामगाराची सेवा संपुष्टात आल्यानंतर आस्थापना मालकाने प्रत्येक सेवा वर्षाच्या सरासरी १५ दिवसांच्या वेतनाप्रमाणे ग्रॅच्युइटी देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी आयुक्त खतगावकरांशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.