शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

चोरांना पकडण्यासाठी मानपाडा गावातील तरुणांची रात्रीची गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:51 IST

वाढत्या चोरींचा बिमोड करण्यासाठी मानपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन रात्रीची गस्त सुरु केली आहे. मागील चार दिवसापासून ही गस्त सुरु असून, जो पर्यंत चोर पकडला जात नाही, तो पर्यंत ही गस्त सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देपोलीसांची गस्त सुरुमुख्य प्रवेशद्वावरही विशेष लक्ष

ठाणे - मागील आठवड्यात दोन दिवसाआड घोडबंदर भागातील मानपाडा, आझादनगर भागात घरफोडींच्या घटना वाढल्या आहेत. या घटनानंतर अद्याप पोलिसांच्या हाती चोर सापडलेले नाहीत. त्यामुळे या चोरांना पकडण्यासाठी आता स्थानिकांनीच मानवी साखळी तयार केली असून रात्रीची गस्त सुरु केली आहे. तसेच पोलिसांनी सुध्दा या भागात रात्रीची गस्त वाढविली आहे.                           मागील आठवड्यात घोडबंदर भागातील मानपाडा भागात पहाटेच्या सुमारास सहाच्या आसपास चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांनंतर येथील रहिवाशांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे. या चोरींच्या घटनांमध्ये चोरट्यांनी महापौरांच्या बहिणीच्या घरावर सुध्दा डल्ला मारला होता. या घटनांमुळे हा परिसर हादरा असतांनाच दोन दिवसांनी पुन्हा या भागात चोरीच्या दोन घटनासमोर आल्या. यामध्ये एका बेरीवाल्याचे दुकान फोडण्यात आले आहे. तर दुसऱ्या घटनेतही घरातून ऐवज लंपास झाला आहे. वाढत्या या चोरींच्या घटनांनी मानपाडा, आझादनगर, मनोरमा नगर, शिवाजी नगर या भागांंना टारगेट केले आहे. त्यामुळे पोलिसांपुढे सुध्दा या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. परंतु आता या चोरांना पडकण्यासाठी स्थानिकांनीसुध्दा पुढाकार घेतला आहे. ४० ते ५० स्थानिक तरुण मंडळी मागील तीन ते चार दिवसापासून मानपाडा, मनोरमा नगर, शिवाजी नगर, आझादनगर भागात रात्रीच्या गस्तीवर फीरु लागले आहेत.या तरुणांच्या हाती बॅटरी, स्टॅम्प किंवा काठी ठेवली जात आहे. जेणे करुन एखाद्याने हल्ला केला तर किमान त्याला प्रतिक्रार करणे सोपे जाईल या उद्देशाने हे साहित्य हाती ठेवण्यात आले आहे. या ठिकाणाच्या मुख्य प्रवेशद्वारांजवळ दोन ते तीन मुले थांबत असून एखादा अनोळखी इसम दिसल्यास त्याचा मोबाइल नंबर घरचा पत्ता विचारला जात आहे. शिवाय घरपर्यंतसुध्दा जात आहेत. तसेच काही छोट्या गल्यांमध्ये वीजेची व्यवस्था नसल्याने तेथील रहिवाशांना घराबाहेरील लाईट सुरु ठेवण्यासाठी सांगितले जात आहे. तसेच घराचा दरवाजा व्यवस्थीत बंद ठेवावा असेही सांगितले जात आहेत. पोलीससुध्दा या तरुणांच्या मदतीला गस्त देत आहेत.मागील आठवड्यात चोरीच्या घटना वाढल्याने ही रात्रीची गस्त सुरु केली आहे. लोकांची सुरक्षा ही खुप महत्वाची आहे. त्यामुळेच चोर सापडे पर्यंत ही गस्त सुरु राहणार आहे.(राजेंद्र शिंदे - शिवसेना, उपविभाग प्रमुख, घोडबंदर) 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाCrime Newsगुन्हेगारी