शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

चोरांना पकडण्यासाठी मानपाडा गावातील तरुणांची रात्रीची गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:51 IST

वाढत्या चोरींचा बिमोड करण्यासाठी मानपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन रात्रीची गस्त सुरु केली आहे. मागील चार दिवसापासून ही गस्त सुरु असून, जो पर्यंत चोर पकडला जात नाही, तो पर्यंत ही गस्त सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देपोलीसांची गस्त सुरुमुख्य प्रवेशद्वावरही विशेष लक्ष

ठाणे - मागील आठवड्यात दोन दिवसाआड घोडबंदर भागातील मानपाडा, आझादनगर भागात घरफोडींच्या घटना वाढल्या आहेत. या घटनानंतर अद्याप पोलिसांच्या हाती चोर सापडलेले नाहीत. त्यामुळे या चोरांना पकडण्यासाठी आता स्थानिकांनीच मानवी साखळी तयार केली असून रात्रीची गस्त सुरु केली आहे. तसेच पोलिसांनी सुध्दा या भागात रात्रीची गस्त वाढविली आहे.                           मागील आठवड्यात घोडबंदर भागातील मानपाडा भागात पहाटेच्या सुमारास सहाच्या आसपास चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांनंतर येथील रहिवाशांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे. या चोरींच्या घटनांमध्ये चोरट्यांनी महापौरांच्या बहिणीच्या घरावर सुध्दा डल्ला मारला होता. या घटनांमुळे हा परिसर हादरा असतांनाच दोन दिवसांनी पुन्हा या भागात चोरीच्या दोन घटनासमोर आल्या. यामध्ये एका बेरीवाल्याचे दुकान फोडण्यात आले आहे. तर दुसऱ्या घटनेतही घरातून ऐवज लंपास झाला आहे. वाढत्या या चोरींच्या घटनांनी मानपाडा, आझादनगर, मनोरमा नगर, शिवाजी नगर या भागांंना टारगेट केले आहे. त्यामुळे पोलिसांपुढे सुध्दा या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. परंतु आता या चोरांना पडकण्यासाठी स्थानिकांनीसुध्दा पुढाकार घेतला आहे. ४० ते ५० स्थानिक तरुण मंडळी मागील तीन ते चार दिवसापासून मानपाडा, मनोरमा नगर, शिवाजी नगर, आझादनगर भागात रात्रीच्या गस्तीवर फीरु लागले आहेत.या तरुणांच्या हाती बॅटरी, स्टॅम्प किंवा काठी ठेवली जात आहे. जेणे करुन एखाद्याने हल्ला केला तर किमान त्याला प्रतिक्रार करणे सोपे जाईल या उद्देशाने हे साहित्य हाती ठेवण्यात आले आहे. या ठिकाणाच्या मुख्य प्रवेशद्वारांजवळ दोन ते तीन मुले थांबत असून एखादा अनोळखी इसम दिसल्यास त्याचा मोबाइल नंबर घरचा पत्ता विचारला जात आहे. शिवाय घरपर्यंतसुध्दा जात आहेत. तसेच काही छोट्या गल्यांमध्ये वीजेची व्यवस्था नसल्याने तेथील रहिवाशांना घराबाहेरील लाईट सुरु ठेवण्यासाठी सांगितले जात आहे. तसेच घराचा दरवाजा व्यवस्थीत बंद ठेवावा असेही सांगितले जात आहेत. पोलीससुध्दा या तरुणांच्या मदतीला गस्त देत आहेत.मागील आठवड्यात चोरीच्या घटना वाढल्याने ही रात्रीची गस्त सुरु केली आहे. लोकांची सुरक्षा ही खुप महत्वाची आहे. त्यामुळेच चोर सापडे पर्यंत ही गस्त सुरु राहणार आहे.(राजेंद्र शिंदे - शिवसेना, उपविभाग प्रमुख, घोडबंदर) 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाCrime Newsगुन्हेगारी