शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

लॉकडाऊन झाल्यास उद्योग परराज्यात जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : कोरोनाची वाढती संख्या ही चिंताजनक असली तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय योग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : कोरोनाची वाढती संख्या ही चिंताजनक असली तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय योग्य ठरणार नाही. गेल्यावर्षी केलेल्या लॉकडाऊनमध्ये जे नुकसान झाले आहे त्याचीच भरपाई अद्याप कारखानदारांची झालेली नाही. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाल्यास अंबरनाथचे नव्हे तर महाराष्ट्रातील उद्योग हे परराज्यात निघून जातील आणि महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात मागे पडेल असे मत अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी व्यक्त केले.

अंबरनाथमध्ये जे कारखानदार आहेत त्या कारखान्यात कामगार सर्व नियम आणि अटींचे पालन करीत आहेत. कारखान्यांमध्ये काम करत असताना कोरोनाचे लागण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातच कारखानदार आपल्या कारखान्यात सुरक्षेची यंत्रणा वापरात असल्याने आणि कामगारांची पूर्ण काळजी घेत असल्याने उद्योग किंवा कारखानदारी क्षेत्रात कोरोनाचा प्रसार होण्याचे प्रमाण अल्पच राहणार आहे. मात्र राज्यातील कोरोनाची वाढती संख्या पाहता राज्य सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याच्या भूमिकेत दिसत असल्याने ही भूमिका कारखानदारांनासाठी घातक ठरू शकेल, असे मत तायडे यांनी व्यक्त केले. गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अंबरनाथमधील उद्योग पूर्णपणे ठप्प झाले होते, असे असतानादेखील सरकारने कोणतीही मदत कारखानदारांना केली नाही. एवढेच नव्हे तर कारखानदारांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजही कमी केले नाही. त्यामुळे कारखानदारांना त्यांचा भुर्दंड सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर पाण्याचे आणि विजेच्या बिलांची थकबाकीही व्याजासह वसूल करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच कारखानदारांनमध्ये संतापाचे वातावरण असताना पुन्हा लॉकडाऊन करणे म्हणजे अंबरनाथला आणि सोबतच महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात मागे नेण्याचा प्रकार म्हणता येईल.

अंबरनाथमध्ये लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्याऐवजी कारखान्यात काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांना संघटनेच्या माध्यमातून लसीकरणाची मुभा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कोरोनाची लस संघटनेला पुरविल्यास संघटना स्वखर्चाने कामगारांना लस देऊन कोरोनाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करू शकते. थेट लॉकडाऊन करण्यापेक्षा लसीकरणाच्या मोहिमेवर भर देण्याची गरज आहे. लसीकरणाची क्षमता वाढविल्यास लॉकडाऊनची गरज पडणार नाही आणि कामगारही सुरक्षित राहील.