शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

शेतकऱ्यांची जमीन बळकावल्या प्रकरणी २२ महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर ७११ हॉटेल्स कंपनीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 15:26 IST

भाईंदरमधील रकवी कुटूबियांची मीरारोडच्या कनकीया भागात ७११ क्लब जवळ मालकी हक्काची जमीन आहे .

मीरारोड - पोलीस व पालिकेस सतत तक्रारी केल्यावर  भाईंदरच्या स्थानिक भूमिपुत्र शेतकरी असलेल्या ६८ वर्षीय  ज्येष्ठ नागरिकाच्या फिर्यादी वरून अखेर तब्बल २२ महिन्यांनी मीरारोड पोलिसांनी सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनी , संचालक व इतरांवर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. 

भाईंदरमधील रकवी कुटूबियांची मीरारोडच्या कनकीया भागात ७११ क्लब जवळ मालकी हक्काची जमीन आहे . सदर जमिनीवर सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीने बळजबरी कुंपण घालून आत मध्ये काही झोपड्या उभारल्या होत्या . सदर प्रकार समजल्यावर मे २०१९ पासून रकवी कुटूंबियांनी मीरारोड पोलीस ठाणे आणि महापालिके कडे सतत तक्रारी चालवल्या होत्या . परंतु पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते . 

तर दुसरीकडे अमोल व गजेंद्र रकवी यांनी पोलिस व पालिकेत तक्रारी चालवल्या होत्या .  कंपनीचे मुख्य भागधारक माजी आमदार नरेंद्र मेहतांसह संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती . रकवी कुटुंबीय त्यांची जमिनी कब्जा करणाऱ्यां विरोधात उभे ठाकले . २४ नोव्हेम्बर २०२० रोजी मीरारोड पोलिसांनी ६८ वर्षीय अमोल रकवी यांचा जबाब नोंदवून घेतला होता . दरम्यान पोलिसांनी कंपनीचे संचालक संजय सुर्वे यांना बोलावून जागेस घातलेले कुंपण व अतिक्रमण हटवण्यास सांगितले होते . परंतु कंपनीने काहीच केले नाही . 

परंतु अमोल सह गजेंद्र रकवी, सचिन पाटील ,  महेश राऊत आदींनी पाठपुरावा सुरु ठेवला .  पोलीस आयुक्तांना भेटून त्यांच्या कडे तक्रार केली . सततच्या पाठपुराव्या नंतर पोलिसांनी त्यांच्या विधी अधिकारी यांच्या कडून अभिप्राय मागवला असता त्यांनी सुद्धा गुन्हा दाखल करण्याचा अभिप्राय दिला . 

तब्बल २२ महिन्यांनी पोलिसांनी अमोल रकवी यांची फिर्याद शुक्रवारी घेतली . घुसखोरी करून कुंपण घालणे , बेकायदा कब्जा करून तेथे ७ - ८ कच्चे बांधकाम करणे आदी प्रकरणी पोलिसांनी सेव्हन इलेव्हन हॉटेल्स संस्थेने , संचालक संजय सुर्वे व इतर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . 

६८ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक असलेले तक्रारदार अमोल रकवी म्हणाले कि , भूमिपुत्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांच्या जमिनी बळकावणाऱ्या माफियां विरुद्ध कारवाई साठी पोलीस व पालिके कडून अशी वर्ष नु वर्ष लावली जातात ह्याला कायद्याचे राज्य म्हणावे कि माफियांचे ? असा मला प्रश्न पडला आहे . पोलीस आता तरी मेहतांसह कंपनीचे त्यांचे अन्य भागधारक , संचालक आणि संबंधित लोकांवर कठोर कारवाई करून कायद्याची जाणीव करून देतील अशी अपेक्षा आहे .  

या आधी देखील मेहतांच्या कंपनीने  आमच्या मालकी जागेचा टीडीआर लाटण्याचा प्रयत्न केला होता तो आम्ही हाणून पडला होता . तर आणखी एका भूमिपुत्राच्या सुमारे ३७ जमिनी देखील बनावट स्वाक्षरी व बनावट मुखत्यारपत्र द्वारे विकल्याचे तक्रार सुद्धा गंभीर असल्याचे रकवी म्हणाले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर