शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

शेतकऱ्यांची जमीन बळकावल्या प्रकरणी २२ महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर ७११ हॉटेल्स कंपनीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 15:26 IST

भाईंदरमधील रकवी कुटूबियांची मीरारोडच्या कनकीया भागात ७११ क्लब जवळ मालकी हक्काची जमीन आहे .

मीरारोड - पोलीस व पालिकेस सतत तक्रारी केल्यावर  भाईंदरच्या स्थानिक भूमिपुत्र शेतकरी असलेल्या ६८ वर्षीय  ज्येष्ठ नागरिकाच्या फिर्यादी वरून अखेर तब्बल २२ महिन्यांनी मीरारोड पोलिसांनी सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनी , संचालक व इतरांवर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. 

भाईंदरमधील रकवी कुटूबियांची मीरारोडच्या कनकीया भागात ७११ क्लब जवळ मालकी हक्काची जमीन आहे . सदर जमिनीवर सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीने बळजबरी कुंपण घालून आत मध्ये काही झोपड्या उभारल्या होत्या . सदर प्रकार समजल्यावर मे २०१९ पासून रकवी कुटूंबियांनी मीरारोड पोलीस ठाणे आणि महापालिके कडे सतत तक्रारी चालवल्या होत्या . परंतु पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते . 

तर दुसरीकडे अमोल व गजेंद्र रकवी यांनी पोलिस व पालिकेत तक्रारी चालवल्या होत्या .  कंपनीचे मुख्य भागधारक माजी आमदार नरेंद्र मेहतांसह संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती . रकवी कुटुंबीय त्यांची जमिनी कब्जा करणाऱ्यां विरोधात उभे ठाकले . २४ नोव्हेम्बर २०२० रोजी मीरारोड पोलिसांनी ६८ वर्षीय अमोल रकवी यांचा जबाब नोंदवून घेतला होता . दरम्यान पोलिसांनी कंपनीचे संचालक संजय सुर्वे यांना बोलावून जागेस घातलेले कुंपण व अतिक्रमण हटवण्यास सांगितले होते . परंतु कंपनीने काहीच केले नाही . 

परंतु अमोल सह गजेंद्र रकवी, सचिन पाटील ,  महेश राऊत आदींनी पाठपुरावा सुरु ठेवला .  पोलीस आयुक्तांना भेटून त्यांच्या कडे तक्रार केली . सततच्या पाठपुराव्या नंतर पोलिसांनी त्यांच्या विधी अधिकारी यांच्या कडून अभिप्राय मागवला असता त्यांनी सुद्धा गुन्हा दाखल करण्याचा अभिप्राय दिला . 

तब्बल २२ महिन्यांनी पोलिसांनी अमोल रकवी यांची फिर्याद शुक्रवारी घेतली . घुसखोरी करून कुंपण घालणे , बेकायदा कब्जा करून तेथे ७ - ८ कच्चे बांधकाम करणे आदी प्रकरणी पोलिसांनी सेव्हन इलेव्हन हॉटेल्स संस्थेने , संचालक संजय सुर्वे व इतर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . 

६८ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक असलेले तक्रारदार अमोल रकवी म्हणाले कि , भूमिपुत्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांच्या जमिनी बळकावणाऱ्या माफियां विरुद्ध कारवाई साठी पोलीस व पालिके कडून अशी वर्ष नु वर्ष लावली जातात ह्याला कायद्याचे राज्य म्हणावे कि माफियांचे ? असा मला प्रश्न पडला आहे . पोलीस आता तरी मेहतांसह कंपनीचे त्यांचे अन्य भागधारक , संचालक आणि संबंधित लोकांवर कठोर कारवाई करून कायद्याची जाणीव करून देतील अशी अपेक्षा आहे .  

या आधी देखील मेहतांच्या कंपनीने  आमच्या मालकी जागेचा टीडीआर लाटण्याचा प्रयत्न केला होता तो आम्ही हाणून पडला होता . तर आणखी एका भूमिपुत्राच्या सुमारे ३७ जमिनी देखील बनावट स्वाक्षरी व बनावट मुखत्यारपत्र द्वारे विकल्याचे तक्रार सुद्धा गंभीर असल्याचे रकवी म्हणाले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर