शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नोटबंदी नव्या पर्वाची सुरुवात

By admin | Updated: November 14, 2016 04:15 IST

देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या २५ टक्के काळी अर्थव्यवस्था आहे. एकूण नोटांपैकी १५ टक्के नोटा खोट्या आहेत. काळी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली

ठाणे : देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या २५ टक्के काळी अर्थव्यवस्था आहे. एकूण नोटांपैकी १५ टक्के नोटा खोट्या आहेत. काळी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि खोट्या नोटा हद्दपार झाल्यावर येत्या काळात लोकांनी मोठ्या नोटांचा वापर टाळून ई-व्यवहार वाढवावे. परिणामी, व्यवहार अधिकाधिक सुसह्य आणि पारदर्शी होतील, हाच नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामागील हेतू आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजित फडणीस यांनी केले. सध्या सुट्या पैशांची चणचण जाणवत असली तरी लोकांनी आपले पैसे धोक्यात आहेत, असे समजू नये. गोंधळून जाऊ नये. ही नव्या पर्वाची सुरुवात आहे, असेही ते म्हणाले.‘विचार व्यासपीठ’च्या वतीने ‘आर्थिक सर्जिकल स्ट्राइक’ या विषयावर सहयोग मंदिर सभागृहात डॉ. फडणीस यांचे व्याख्यान आयोजित केले होते. ते म्हणाले की, ५०० आणि हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय झाल्यावर गेल्या चार दिवसांत सर्वाधिक फरफट सर्वसामान्य माणसांची झाली आहे. सर्वसामान्य माणसांच्या आणि बँक कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेला नमस्कार करावा लागेल. परंतु, त्रासाचा हा टप्पा थोड्या दिवसांचा आहे. या काळात आपण सर्व व्यवहार रोखीने करण्याची गरज नाही. आपल्या घरात रोख रक्कम असावी, ही सर्वसामान्य माणसाची मानसिकता योग्य नाही. अधिकाधिक लोकांनी ई-व्यवहार करावे. ज्येष्ठाांनीही तरुणांकडून मोबाइल, कॉम्प्युटरच्या माध्यमातून घरबसल्या कसे व्यवहार करायचे, हे शिकून घ्यावे. अर्थसाक्षरता वाढवण्याची गरज आहे, असेही फडणीस म्हणाले. कष्टाचे पैसे असलेल्यांनी चढ्या दराने सोने विकत घेऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.सध्या आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल दमदार आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक लोक कर भरतील. त्यामुळे कराचे दरही कमी होतील. काळ्या पैशांमुळे वस्तूचे वाढलेले दर कमी होऊन स्वस्ताई येईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. या वेळी व्यासपीठावर संजीव ब्रह्मे, मकरंद मुळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)