शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

नोटबंदी नव्या पर्वाची सुरुवात

By admin | Updated: November 14, 2016 04:15 IST

देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या २५ टक्के काळी अर्थव्यवस्था आहे. एकूण नोटांपैकी १५ टक्के नोटा खोट्या आहेत. काळी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली

ठाणे : देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या २५ टक्के काळी अर्थव्यवस्था आहे. एकूण नोटांपैकी १५ टक्के नोटा खोट्या आहेत. काळी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि खोट्या नोटा हद्दपार झाल्यावर येत्या काळात लोकांनी मोठ्या नोटांचा वापर टाळून ई-व्यवहार वाढवावे. परिणामी, व्यवहार अधिकाधिक सुसह्य आणि पारदर्शी होतील, हाच नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामागील हेतू आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजित फडणीस यांनी केले. सध्या सुट्या पैशांची चणचण जाणवत असली तरी लोकांनी आपले पैसे धोक्यात आहेत, असे समजू नये. गोंधळून जाऊ नये. ही नव्या पर्वाची सुरुवात आहे, असेही ते म्हणाले.‘विचार व्यासपीठ’च्या वतीने ‘आर्थिक सर्जिकल स्ट्राइक’ या विषयावर सहयोग मंदिर सभागृहात डॉ. फडणीस यांचे व्याख्यान आयोजित केले होते. ते म्हणाले की, ५०० आणि हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय झाल्यावर गेल्या चार दिवसांत सर्वाधिक फरफट सर्वसामान्य माणसांची झाली आहे. सर्वसामान्य माणसांच्या आणि बँक कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेला नमस्कार करावा लागेल. परंतु, त्रासाचा हा टप्पा थोड्या दिवसांचा आहे. या काळात आपण सर्व व्यवहार रोखीने करण्याची गरज नाही. आपल्या घरात रोख रक्कम असावी, ही सर्वसामान्य माणसाची मानसिकता योग्य नाही. अधिकाधिक लोकांनी ई-व्यवहार करावे. ज्येष्ठाांनीही तरुणांकडून मोबाइल, कॉम्प्युटरच्या माध्यमातून घरबसल्या कसे व्यवहार करायचे, हे शिकून घ्यावे. अर्थसाक्षरता वाढवण्याची गरज आहे, असेही फडणीस म्हणाले. कष्टाचे पैसे असलेल्यांनी चढ्या दराने सोने विकत घेऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.सध्या आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल दमदार आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक लोक कर भरतील. त्यामुळे कराचे दरही कमी होतील. काळ्या पैशांमुळे वस्तूचे वाढलेले दर कमी होऊन स्वस्ताई येईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. या वेळी व्यासपीठावर संजीव ब्रह्मे, मकरंद मुळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)