शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

भरमसाट वाढवलेली पाणीपट्टी रद्द करा; भाईंदर आयुक्तांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:58 IST

मीरा-भाईंदर महापालिकेने यंदा व्यावसायिक पाणीपट्टीचा दर तब्बल दीडशे टक्क्यांनी वाढवला असून तो डबघाईला आलेल्या स्टील उद्योगांसह लहान उद्योगांना परवडणारा नाही.

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेने यंदा व्यावसायिक पाणीपट्टीचा दर तब्बल दीडशे टक्क्यांनी वाढवला असून तो डबघाईला आलेल्या स्टील उद्योगांसह लहान उद्योगांना परवडणारा नाही. त्यामुळे शहरात उरल्यासुरल्या उद्योगांचे स्थलांतर होण्याची शक्यता असल्याने ते रोखण्यासाठी प्रशासनाने ते दर त्वरित रद्द करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टील उद्योग असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश पांडे यांनी पलिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे केली आहे.शहरातील स्टील उद्योग एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठा उद्योग मानला जात होता. यातील अनेक व्यापाऱ्यांनी जकात, स्थानिक संस्था करासह पालिकेच्या विविध वसुलीला कंटाळून शहरातून स्थलांतर केले. उर्वरीत उद्योग आजही सुरू असुन त्यातील रोजगारामुळे शहरातील अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या उद्योगांत सुमारे १० हजारांहून अधिक लोक काम करतात. कारखानदारांना यंदाच्या महागाईच्या काळात उद्योग चालविणे कठीण झाले आहे. वाढत्या महागाईमुळे कामगारांचे वेतन वाढले असून उद्योग चालवण्याचे संकट उभे असताना पालिकेने वाढवलेल्या व्यावसायिक पाणीपट्टीचा दरही भरमसाठ असल्याचा दावा शैलेश यांनी केला आहे. पालिकेने तत्कालीन महासभेत पाणीपट्टीच्या दरवाढीचा सादर केलेल्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपाने मान्यता दिल्याचा आरोप शैलेश यांनी केला आहे.पूर्वीच्या २० रुपये प्रती १ हजार लीटर व्यावसायिक पाणीपुरवठ्याचा दर तब्बल १५० टक्के वाढून तो थेट ५० रुपये प्रती १ हजार लीटर करण्यात आल्याने व्यापाºयांना भरमसाठ पाणीपट्टीची बिले वितरीत करण्यात आली आहेत. ही दरवाढ जाचक असून त्वरीत रद्द करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक