शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

ठाण्यातील कॅडबरी ते उपवनच्या ३५ कोटींच्या रस्त्यावर खड्डा : मनसेने दिली ४८ तासांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 22:36 IST

ठाण्यातील कॅडबरी कंपनी ते उपवन दरम्यान अनेक अतिक्रमणे हटवून पालिकेने वर्षभरापूर्वीच करोडो रुपये खर्चून रस्ता तयार केला. मात्र, या रस्त्यावर मोठा खड्डा तयार झाला आहे.

ठळक मुद्दे३५ कोटींचा रस्ता तरीही खड्डामनसेने फलक लावून लक्ष वेधलेरस्ता दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

ठाणे : ठाणे महापालिकेने उपवन ते कॅडबरीदरम्यानच्या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी ३५ कोटींचा खर्च करूनही त्या मार्गावर मोठा खड्डा पडला आहे. यावर पालिकेने ४८ तासांमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने पालिका प्रशासनाकडे केली आहे. ही दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.वर्षभरापूर्वीच ३५ कोटींच्या खर्चातून कॅडबरी कंपनी ते उपवनपर्यंतचा रस्ता ठाणे महापालिकेने तयार केला. यासाठी या मार्गावरील अनेक अतिक्रमणेही पालिकेने हटवली. या मार्गावरील बहुतांश रस्ता हा सिमेंटचा केला आहे. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणा-या वाहिनीवरील पुलाच्या मार्गावरच मोठा खड्डा पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वर्तकनगरनाका येथे लोकमान्य लंच होम हॉटेलसमोर गेल्या १० ते १५ दिवसांपासून पडलेल्या या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या ठाणे विधानसभा (सांस्कृतिक विभाग) अध्यक्ष प्रसाद भांदिगरे आणि वर्तकनगर शाखाध्यक्ष संतोष निकम यांनी व्यक्त करून तो तातडीने दुरुस्त करण्याची मागणी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. भविष्यात या ठिकाणी अपघात घडून कोणतीही दुर्घटना झाल्यास त्यास वर्तकनगर प्रभाग समितीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच संबंधित अधिकारी हे जबाबदार असतील. त्यामुळे हा खड्डा ४८ तासांमध्ये बुजवला गेला नाही, तर मनसे हा खड्डा बुजवण्याचे काम करेल, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.दरम्यान, जुन्या पुलाचा भाग खचल्याने हा खड्डा पडल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले असून रस्त्याच्या दुरुस्तीची कार्यवाही सुरू केल्याचे पत्रही मनसेला १२ जानेवारी रोजी वर्तकनगर प्रभाग समितीने दिले आहे.

प्रत्यक्षात या ठिकाणी पालिकेने केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा फलक लावला असून कामाला कोणतीही सुरुवात केली नसल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. रेमण्ड कंपनीजवळ वृक्षवल्ली कार्यक्रम तसेच उपवन परिसरातही आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. अशा वेळी या खड्ड्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले जात असून पालिका प्रशासनाची यात नाचक्की होत असल्याचेही मनसेने म्हटले आहे.