शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

मीरारोड मध्ये फेरीवाल्यांची गुंडगिरी; फेरीवाल्यांच्या म्होरक्यासह २५ ते ३० फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: October 23, 2023 21:03 IST

व्यापाऱ्यांचा बंद तर लोकांच्या संतापा नंतर महापालिकेला कारवाईची जाग

धीरज परब / मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मध्ये अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांच्या दादागिरी व गुंडगिरी ने रहिवाशी , दुकानदार त्रासले असताना रविवारी रात्री एका ६० वर्षीय दुकानदारास मारहाण केल्या प्रकरणी २५ ते ३० फेरीवाल्यांवर नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . या  घटनेने संतप्त दुकानदारांनी बंद पुकारला तर रहिवाश्यांनी तत्कालीन नगरसेवक आणि महापालिकेच्या हप्तेखोरीमुळे फेरीवाले प्रचंड वाढून गुंडगिरी होत असल्याचा आरोप केला . पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला तर पालिकेने फेरीवाल्यांचे शेड आदी तोडण्यास सुरवात केली. 

शांती नगर सेक्टर १ , इमारत क्र . ५९ मध्ये दुकान ५ व ६ मध्ये मायरी नावाचे गुमानसिंग राजपुरोहीत ( ६० ) यांचे दुकान आहे . दुकान समोर त्यांनी त्यांची दुचाकी उभी केली होती . रविवारी रात्री ११ च्या सुमारास एका फेरीवाल्याने त्याची दुचाकी काढताना राजपुरोहित यांच्या दुचाकीचे सीट कव्हर फाटल्याने त्यांनी हळू गाडी काढ असे फेरीवाल्यास सांगितले . त्याचा राग येऊन अशीच गाडी लावेन सांगून आरडाओरडा व शिवीगाळ सुरु केली . त्यासरशी अन्य फेरीवाले धावून आले . 

फेरीवाल्यांची राजपुरोहित व त्यांचा कर्मचारी करणसिंग ह्या दोघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . या घटनेने संतप्त दुकानदार, काही नागरिक पोलीस ठाण्यात दाखल झाले .  आमदार गीता जैन पहाटे २  च्या सुमारास पोहचल्या नंतर पोलिसांनी हल्लेखोर अजहर हैदर शेख, झोएब अल्ताफ शेख व अन्नान मोहमद सुतार, राजपुरोहित यांच्या दुकान समोर बाकडे लावणारे दोघे आणि इत्तर  २० ते २५ फेरीवाल्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला . 

सोमवारी घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी या  भागात पोलिसांसह एआरपीची तुकडी तैनात केली . परिसरात तणावपूर्ण शांतता होती . दुकानदारांनी बंद पाळून निषेध व्यक्त केला . आ . जैन यांनी पालिका आयुक्त संजय काटकर , उपायुक्त अतिक्रमण मारुती गायकवाड व पोलिसांसह शांती नगर मध्ये जाऊन रहिवाशी आणि दुकानदार यांचे म्हणणे ऐकले . 

यावेळी काही रहिवाशी आणि दुकानदारांनी महापालिका, पोलीस तसेच तत्कालीन अनेक नगरसेवकां बद्दल भ्रष्टाचाराचे आरोप करत यांच्या हप्तेखोरी मुळेच शांती नगर मध्ये फेरीवाल्यांनी रस्ते , पदपथ व मोकळ्या जागांवर बस्तान मांडले . सोसायटीचे प्रवेश द्वार सुद्धा सोडले नाहीत . 

गेल्या अनेक वर्षां पासून तक्रारी करून सुद्धा ठोस कारवाई हो नसल्याने फेरीवाले मुजोर होऊन त्यांची गुंडगिरी अनेक वर्षां पासून रहिवाशी सहन करत असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले . गुंडगिरी , चोऱ्या , महिला - मुलींची छेडछाड सारखे प्रकार होऊन सुद्धा कोणी गांभीर्याने घेतले नाही असे आरोप लोकांनी केले . 

या घटने नंतर महापालिकेने फेरीवाल्यांचे शेड , बाकडे आदी अतिक्रमणे जेसीबी व मजुरांच्या सहाय्याने काढण्यास सुरवात केली . परंतु हि कारवाई केवळ दिखाव्या पुरती नको.  पालिका पथक येणार याची माहिती फेरीवाल्यांना आधीच मिळते. पथक आले तर थातुरमातुर कारवाई करून निघून जाते असे लोकं म्हणाले .

टॅग्स :thaneठाणेmira roadमीरा रोडMumbaiमुंबई