शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

बुलेट ट्रेनमुळे विकास होणार सुसाट; २७ गावांच्या विकासाला मिळणार चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:40 IST

बुलेट ट्रेनच्या मुद्यावरून सध्या विविध मतप्रवाह निर्माण होत असतानाच बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील एकमेव स्थानक असलेले म्हातार्डी हे ठिकाण ठाणे व कल्याण, डोंबिवलीशी प्रशस्त रस्त्यांची जोडले जावे, यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या प्रकल्पांना एमएमआरडीएने तत्त्वत: मंजुरी दिली आहे.

ठाणे : बुलेट ट्रेनच्या मुद्यावरून सध्या विविध मतप्रवाह निर्माण होत असतानाच बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील एकमेव स्थानक असलेले म्हातार्डी हे ठिकाण ठाणे व कल्याण, डोंबिवलीशी प्रशस्त रस्त्यांची जोडले जावे, यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या प्रकल्पांना एमएमआरडीएने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या भागांचाही विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हातार्डी ते आगासन आणि पुढे आगासन ते कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांपर्यंत ६० मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जाणार असून त्यामुळे या भागात भविष्यात वाढणारी लोकवस्ती लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने यापूर्वीच रस्त्यांच्या उभारणीसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे.एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत गुरुवारी झालेल्या बैठकीत महापालिका हद्दीपलीकडे २७ गावे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्याचे रु ंदीकरण आणि त्यांची उभारणी करण्यावरही एकमत झाल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. त्यामुळे आता २७ गावांचा विकास सुसाट होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुंबई-अहमदाबाद ही बुलेट रेल्वे ठाणे जिल्ह्यातून जाणार आहे. ठाणे खाडीखालून नवी मुंबईमार्गे, भुयारीमार्गे जाणारी ही रेल्वे महापे-शीळ रस्तामार्गे दिवा-म्हातार्र्डी येथून पुढे जाणार आहे. म्हातार्डी येथे ठाणे जिल्ह्यातील एकमेव स्थानक असणार आहे. तसेच दिवा-पनवेल अशी रेल्वेसेवाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या नियोजन विभागाने गेल्या काही महिन्यांपासून दिवा, आगासन, म्हातार्र्डी तसेच आसपासच्या विभागांतील रस्त्यांची बांधणी आणि विकासावर लक्ष केंद्रित केले असून यासंबंधीचा सविस्तर आराखडा गुरु वारी एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांच्यापुढे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सादर केला. यानुसार, म्हातार्र्डी ते आगासनपर्यंतच्या दीड किलोमीटर रस्त्याचे ६० मीटरपर्यंत रु ंदीकरण करण्यात येणार असून आगासन ते कल्याण-शीळपर्यंतच्या अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचा विकास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने करावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. कल्याणफाटा-डोंबिवलीवरून दिवा परिसराकडे येणारा सद्य:स्थितीतील रस्ता हा सहा मीटर रु ंदीचा असून त्याची रु ंदी कमी असल्याने या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.रुंदीकरणावर १०० कोटींचा खर्च- ठाणे महापालिकेने आखलेल्या या आराखड्यानुसार ६० मीटर रुंदीचा रस्ता म्हातार्र्डी ते आगासन आणि आगासन-कल्याण-शीळ रस्त्यास जोडला जाणार आहे. त्यामुळे दिवा विभाग कल्याण-शीळ रस्त्याला जोडला जाईल. यामुळे कल्याणफाटा तसेच शीळफाटा जंक्शनवरील रहदारीचा ताण कमी होईल, असा कयास पालिकेने लावला आहे.- या रस्त्याचे सर्वेक्षण आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच सल्लागाराची नियुक्ती केली आहे. असे असताना आता या रस्त्याची हद्द कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत २७ गावांपर्यंत वाढवावी, अशी मागणी महापालिकेने एमएमआरडीएकडे केली आहे. दरम्यान, रस्त्यांच्या या कामांसाठी १०० कोटींचा खर्च अपेक्षित असून २७ गावांमधील रस्त्यांची कामे एमएमआरडीएने केल्यास या भागातील नियोजनालाही हातभार लागणार आहे. त्यानुसार, रस्त्याचा प्रकल्प अहवाल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी एमएमआरडीएकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर, याला मंजुरी मिळाल्यास २७ गावांचाही विकास सुसाट होणार आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन