शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनमुळे विकास होणार सुसाट; २७ गावांच्या विकासाला मिळणार चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:40 IST

बुलेट ट्रेनच्या मुद्यावरून सध्या विविध मतप्रवाह निर्माण होत असतानाच बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील एकमेव स्थानक असलेले म्हातार्डी हे ठिकाण ठाणे व कल्याण, डोंबिवलीशी प्रशस्त रस्त्यांची जोडले जावे, यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या प्रकल्पांना एमएमआरडीएने तत्त्वत: मंजुरी दिली आहे.

ठाणे : बुलेट ट्रेनच्या मुद्यावरून सध्या विविध मतप्रवाह निर्माण होत असतानाच बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील एकमेव स्थानक असलेले म्हातार्डी हे ठिकाण ठाणे व कल्याण, डोंबिवलीशी प्रशस्त रस्त्यांची जोडले जावे, यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या प्रकल्पांना एमएमआरडीएने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या भागांचाही विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हातार्डी ते आगासन आणि पुढे आगासन ते कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांपर्यंत ६० मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जाणार असून त्यामुळे या भागात भविष्यात वाढणारी लोकवस्ती लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने यापूर्वीच रस्त्यांच्या उभारणीसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे.एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत गुरुवारी झालेल्या बैठकीत महापालिका हद्दीपलीकडे २७ गावे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्याचे रु ंदीकरण आणि त्यांची उभारणी करण्यावरही एकमत झाल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. त्यामुळे आता २७ गावांचा विकास सुसाट होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुंबई-अहमदाबाद ही बुलेट रेल्वे ठाणे जिल्ह्यातून जाणार आहे. ठाणे खाडीखालून नवी मुंबईमार्गे, भुयारीमार्गे जाणारी ही रेल्वे महापे-शीळ रस्तामार्गे दिवा-म्हातार्र्डी येथून पुढे जाणार आहे. म्हातार्डी येथे ठाणे जिल्ह्यातील एकमेव स्थानक असणार आहे. तसेच दिवा-पनवेल अशी रेल्वेसेवाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या नियोजन विभागाने गेल्या काही महिन्यांपासून दिवा, आगासन, म्हातार्र्डी तसेच आसपासच्या विभागांतील रस्त्यांची बांधणी आणि विकासावर लक्ष केंद्रित केले असून यासंबंधीचा सविस्तर आराखडा गुरु वारी एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांच्यापुढे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सादर केला. यानुसार, म्हातार्र्डी ते आगासनपर्यंतच्या दीड किलोमीटर रस्त्याचे ६० मीटरपर्यंत रु ंदीकरण करण्यात येणार असून आगासन ते कल्याण-शीळपर्यंतच्या अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचा विकास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने करावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. कल्याणफाटा-डोंबिवलीवरून दिवा परिसराकडे येणारा सद्य:स्थितीतील रस्ता हा सहा मीटर रु ंदीचा असून त्याची रु ंदी कमी असल्याने या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.रुंदीकरणावर १०० कोटींचा खर्च- ठाणे महापालिकेने आखलेल्या या आराखड्यानुसार ६० मीटर रुंदीचा रस्ता म्हातार्र्डी ते आगासन आणि आगासन-कल्याण-शीळ रस्त्यास जोडला जाणार आहे. त्यामुळे दिवा विभाग कल्याण-शीळ रस्त्याला जोडला जाईल. यामुळे कल्याणफाटा तसेच शीळफाटा जंक्शनवरील रहदारीचा ताण कमी होईल, असा कयास पालिकेने लावला आहे.- या रस्त्याचे सर्वेक्षण आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच सल्लागाराची नियुक्ती केली आहे. असे असताना आता या रस्त्याची हद्द कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत २७ गावांपर्यंत वाढवावी, अशी मागणी महापालिकेने एमएमआरडीएकडे केली आहे. दरम्यान, रस्त्यांच्या या कामांसाठी १०० कोटींचा खर्च अपेक्षित असून २७ गावांमधील रस्त्यांची कामे एमएमआरडीएने केल्यास या भागातील नियोजनालाही हातभार लागणार आहे. त्यानुसार, रस्त्याचा प्रकल्प अहवाल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी एमएमआरडीएकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर, याला मंजुरी मिळाल्यास २७ गावांचाही विकास सुसाट होणार आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन