शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

बुलेट ट्रेन जमीन खरेदीत कब्जेदार शेतकऱ्यांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:14 IST

शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही; प्रांताधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन 

नितिन पंडीत

भिवंडी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखले जाणारे बुलेट ट्रेन प्रकल्प भिवंडी तालुक्यातील भरोडी ,अंजुर ,सुरई ,कशेळी ,काल्हेर ,केवणी, खारबाव या भागातून जात असून त्यासाठी शासनाने बाजार भाव पेक्षा ही अधिक दर देत जमिनीचा मोबदला जाहीर केल्या नंतर या भागातील भूमाफिया जमीन दलाल यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून थेट जमीन मालक सावकारा सोबत खरेदी व्यवहार केल्याने मागील तीन पिढ्या शेतजमिनीत घाम गाळून शेत पिकवणाऱ्या कब्जेदार शेतकरी याची फसवणूक होत होरपळ सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश निर्माण झाला आहे .

बुलेट ट्रेन प्रकल्पातील बाधित जमिनींचे हस्तांतरण करतांना व खरेदी विक्री करतांना सात बारा सदरी नाव असलेल्या सावकार व मालकांचाच विचार केला जात आहे मात्र तीन पिढ्यांतून अधिक काळ शेती कसणाऱ्या व कब्ज्यात असणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र नाव नसल्याचे कारण देत जमीन मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याने येथील बाधित कब्जेदार शेतकरी शासकीय यंत्रणेवर प्रचंड नाराज झाले आहेत . विशेष म्हणजे भिवंडीतील ग्रामीण भागात अनेक शेतकरी अशिक्षित असल्याने पूर्वी पासून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या इतरांच्या नावे आहेत . विशेष म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयात ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचे गट बुक उपलब्ध नसल्याने आपल्या जमिनी नेमकी कोणाच्या नावावर आहेत हे देखील येथील शेतकऱ्यांना माहित नसल्याने जमीन दलाल भूमी अभिलेख व जमीन मालक यांच्याशी संगनमत करून थेट जमिनी विकत आहेत . मात्र या विक्री प्रक्रियेपासून कब्जेदार शेतकरी वंचित राहत असल्याचा आरोप येथील शेतकरी करीत आहेत . त्यातच बुलेट ट्रेन साठी होणारा खरेदी व्यवहार कब्जेदार शेतकरी यांना अंधारात ठेवून होत असल्याचा आरोप शेतकरी संघटना भरोडीचे मनोज भोईर यांनी केला आहे .

          बुलेट ट्रेनचे काम स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन न करता सुरू केले असून मौजे भरोडी येथील सर्व्हे क्रमांक १४९ व १३४  मधील भूसंपादन मिळकतीची थेट खरेदी न करता प्रकल्पाचे काम शेतजमिनीत सुरू आहे . कब्जा वहीवाटीच्या हरकती सुनावणी न घेताच थेट खरेदी केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून नुकताच शेतकरी संघटना भरोडी च्या शेतकरी शिष्टमंडळा सोबत उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नाळदकर यांच्या दालनात सोमवारी चर्चेसाठी आमंत्रित केले होते .या वेळी बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्यांसह भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस व बाधित कब्जेदार व अन्याय झालेले शेतकरी उपस्थित होते. यावेळी एकही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन भिवंडी प्रांताधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले आहे . 

          या बैठकीं दरम्यान उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी भरोडी गावातील भूसंपादन संदर्भातील वाद मिटविण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम राबवावी असे आदेश संबंधितांना देत बाधित शेतकऱ्यांनी एक ही खोटी केस सहन करायची नाही ,त्यासाठी कोणत्याही दलालाला पैसे मोजायचे नसून भूमापक अधिकारी यांनी पारदर्शक काम करून दोन दिवसात शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर द्यावे ,कब्जेदार यांना विश्वासात घेतले नसल्यास अथवा कब्जेदार शेतकऱ्यांचे नाव इतर हक्कात असल्यास नक्कीच सहकार्य करू असे डॉ मोहन नळदकर यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देत कब्जेदार कुळ असल्यास कायदेशीर मदत करता येणे शक्य असून बुलेट ट्रेन यांना सावकारा सोबत नोंदणी करीत असताना ताबा घेताना कब्जे दार उभा राहिल्यास त्या मध्ये निराकरण होऊ शकते तसेच प्रकल्प थांबवता येत नाही परंतु शेतकऱ्यांच्या शंकांचे निराकरण होत राहील त्यासाठी शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे डॉ मोहन नळदकर यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे . या शिष्टमंडळात मनोज भोईर, संदीप पाटील ,विजय पाटील, विनोद पाटील भरोडीकर ,कचरू कृष्णा पाटील ,वरूण पाटील यांसह अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनFarmerशेतकरी