शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

इमारत बांधकाम परवानग्यांतही घोळ

By admin | Updated: May 12, 2016 02:02 IST

एचडीआयएलला सुरुवातीला जी प्लस ७ अशा स्वरुपाची मोघम परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर फेरबदल करून जी प्लस १२, जी प्लस १४, जी प्लस १६ अशा परवानग्या देण्यात आल्या

वसई : एचडीआयएलला सुरुवातीला जी प्लस ७ अशा स्वरुपाची मोघम परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर फेरबदल करून जी प्लस १२, जी प्लस १४, जी प्लस १६ अशा परवानग्या देण्यात आल्या. या परवानग्या कोणत्या नियमानुसार दिल्यात व त्यासाठी लागणारा एफएसआय कुठून उपलब्ध केला. याचे स्पष्टीकरण वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचनाकार विभागाला देता आले नाही. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण लेआऊटच्या दोन एफएसआय पेक्षा जास्त एफएसआय बेकायदेशीरपणे वापरल्याचे निदर्शनास येते, असा आरोप शिवसेनेचे गटनेते गावडे यांनी केला आहे.विकासकाने महानगरपालिकेस सादर केलेल्या लेआऊट नकाशामध्ये विकासकाने प्रशासनाच्या व इतर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या मदतीने प्रत्यक्ष जागेवरील आरक्षणे इतरत्र हलविली आहेत. त्यामध्ये आर झोन टू लो डेस्टनी झोन अशा पद्धतीने आरक्षण हलविले आहे. त्याचवेळेला विकासकाने काही आरक्षणे हलवून ती शासकीय जमिनीवर तथा सीआरझेड क्षेत्रात देखील नेल्याचे पुराव्यासहीत सिद्ध होत आहे असेही त्यांनी म्हंटले आहे.या प्रकल्पानुसार जर विकासकाने काम पूर्ण केले तर कमीत कमी ४ लाख सदनिका बांधल्या जातील. याचाच अर्थ एका सदनिकेमध्ये अंदाजे ४ व्यक्ती धरल्या तरी वसई विरार येथील लोकसंख्येमध्ये १६ लाखाने वाढ होण्याची शक्यता आहे. यात २५ एकर जमीन शासनाची असून तिच्या हस्तांतरणाबाबत वसई-विरार महापालिकेकडून कोणत्याही उपययोजना झाल्या नसल्याचा दावा गावडे यांनी केला आहे. एचडीआयएलने मागितलेल्या रेंटल हाऊसींग स्कीममध्ये २५ एकर जमीन शासनाची आहे. ज्यामध्ये गाव मौजे डोंगरे येथील सर्वे क्रमांक ४६,४८ व ६३ चा समावेश आहे. त्यातील दोन खाजण स्वरुपाच्या व एक गुरेचरण स्वरुपाची आहे. सदर जमिनी हस्तांतरणाबाबत किंवा कोणत्याही स्वरुपाच्या संरक्षणाबाबत महानगरपालिकेमार्फत कोणतीही उपाययोजना केल्याचे आढळून येत नसल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे वसई विरारची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १३ लाख ४३ हजार इतकी आहे. तिलाच पायाभूत सुविधा पुरविण्यास वसई विरार शहर महानगरपालिका अपुरी पडत आहे. तर दुसरीकडे लाखो सदनिका अनधिकृतपणे बांधण्यात येणार आहेत. भविष्यात हा वाढता लोकसंख्येचा भर महानगरपालिका कसा पेलणार असा प्रश्न उदभवणार आहे. (प्रतिनिधी)वसई-विरार शहरावर लोकसंख्या वाढीचा प्रचंड ताण अगोदरच सहन करावा लागत आहे. रेल्वे, वाहतूक, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण अशा मुलभूत समस्या वसई-विरारकरांना भेडसावत आहेत. याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख धनंजय गावडे यांनी सांगितले आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त, नगररचना विभागाचे उपसंचालक, तत्कालीन सिडको प्राधिकरण, एचडीआयएल एव्हरशाईन डेव्हलपर्स, त्याचप्रमाणे एव्हरशाईन बिल्डरचे आर्किटेक्ट दिवेश शहा, एचडीआयएलचे आर्किटेक्ट अजय वाडे यांंनी हा भ्रष्टाचार संगनमताने केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एक विशेष पथकामार्फत (एस.आय.टी.) चौकशी करण्यात यावी आणि या सर्व प्रकरणामध्ये दोषी आढळून आलेल्या संबंधीत व्यक्तींवर शासनाच्या नियमानुसार कठोर कार्यवाही प्रस्तावित करावी, अशी मागणी गावडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.