शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

साखरझोपेतच झाली संसारांची माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 23:44 IST

भिवंडी इमारत दुर्घटना २४ कुटुंबे आली उघड्यावर घटनास्थळी रहिवाशांचा आक्रोश

नितीन पंडित।लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : धामणकरनाका परिसरातील पटेल कम्पाउंड येथील तीन मजली जिलानी इमारत सोमवारी मध्यरात्री कोसळली आणि साखरझोपेत असलेल्या येथील अनेक रहिवाशांचे संसार क्षणार्धात जमीनदोस्त झाले. येथील बऱ्याच रहिवाशांचे कुटुंबीय इमारतीच्या मलब्याखाली दबल्याने त्यांनी एकच आक्रोश सुरू केला. कुणी आपल्या म्हाताºया आईवडिलांना, कुणी पतीपत्नीला, तर कुणी कुटुंबातील चिमुकल्या जीवाला मलब्याखाली जीवाच्या आकांताने शोधण्याचा प्रयत्न करत होते.

जिलानी इमारतीतील रहिवाशांसाठी सोमवारची रात्र काळरात्र ठरली. या इमारतीतील काही कुटुंबीयांनी एक, तर काही कुटुंबीयांनी एकापेक्षा जास्त सदस्यांना गमावले होते. अनेक कुटुंबीय इमारतीच्या ढिगाºयात त्यांच्या आप्तेष्टांना शोधण्याचा प्रयत्न करत होते. इमारत कोसळल्याचा आवाज ऐकून संपूर्ण परिसर झोपेतून जागा झाला होता. महानगरपालिकेची यंत्रणा घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करेपर्यंत या स्थानिकांनीच रहिवाशांना मलबा हटवण्यास मदत केली. इमारत कोसळल्यामुळे येथील जवळपास २४ कुटुंबे उघड्यावर आली आहेत.

नशीब बलवत्तर म्हणूनच आम्ही पतीपत्नी या दुर्घटनेतून वाचलो; मात्र आमचा तीन वर्षांचा सुखी संसार डोळ्यादेखत मोडला, याचे दु:ख वाटते, अशी प्रतिक्रिया या इमारतीचे रहिवासी शरीफ अन्सारी यांनी व्यक्त केली. शरीफ अन्सारी हे पत्रकार आहेत. तीन वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर त्यांनी या इमारतीत दुसºया माळ्यावरील सदनिकेत संसार थाटला होता. सोमवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास शेजारी शब्बीर कुरेशी यांनी इमारतीला तडे जात असल्याचे शरीफ यांना सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शरीफ यांनी क्षणाचाही विलंब न लावता दुसºया मजल्यावरील रहिवाशांचे दरवाजे ठोठावत इमारत खाली करण्यास सांगितले. पत्नीला इमारतीबाहेर काढल्यानंतर शरीफ पुन्हा नागरिकांना बाहेर काढण्यासाठी इमारतीत गेले. दुसºया मजल्यावरील रहिवाशांना उठवत असतानाच इमारतीचा एक भाग कोसळला. त्यामुळे शरीफदेखील अडकले होते. कसेबसे इमारतीबाहेर पडणे त्यांना शक्य झाले. मात्र, ते राहत असलेली सदनिका तोपर्यंत जमीनदोस्त झाली होती. जीव वाचला मात्र तीन वर्षांचा संसार डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाल्याची भावनिक प्रतिक्रिया शरीफ यांनी व्यक्त केली. सोबतच, माझ्या डोळ्यांदेखत इमारतीतील हसतीखेळती चार मुले मरण पावली. ही दुर्घटना मी कधीही विसरू शकणार नाही. मला आणखी १० ते १५ मिनिटे मिळाली असती, तर कदाचित त्या चिमुकल्यांना मी वाचवू शकलो असतो, हे सांगताना शरीफ यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

इतरांना वाचवणाºया शब्बीरचे स्वत:चे कुटुंब धोक्यातइमारतीला तडे गेल्याची पहिली खबर रहिवाशांना देणारे शब्बीर कुरेशी हे पत्नी व चार मुलांसह दुसºया मजल्यावर राहतात. त्यांनी पत्नीला मुलांना घेऊन इमारतीबाहेर पडण्यास सांगितले. त्यानंतर, शब्बीर इतरांना जागे करण्यासाठी गेले आणि तेवढ्यात इमारत कोसळली.शब्बीर व त्यांची दोन लहान मुले या दुर्घटनेतून वाचली; मात्र त्यांची पत्नी, चार वर्षांची मुलगी व दोन वर्षांचा मुलगा असे तीन जण ढिगाºयाखाली अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी बचाव पथकाकडून दुपारपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

धोकादायक इमारतीतील सदनिका दिल्या होत्या भाड्यानेभिवंडी : शहरातील धामणकरनाका परिसरातील इमारत दुर्घटनेतून काही गंभीर मुद्दे उघडकीस आले आहेत. त्यानुसार, महानगरपालिका प्रशासनाने ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केल्यावरही येथील काही रहिवाशांनी त्यांच्या सदनिका भाड्याने देऊन निष्पाप, गरीब लोकांचे जीव धोक्यात घातल्याची माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे दुर्घटनाग्रस्त जिलानी इमारत ज्या पटेल कम्पाउंड परिसरात होती, त्या ठिकाणी अतिशय दाटीवाटीने इमारती आहेत. एकमेकांना खेटूनच इमारती उभ्या केल्याने बचावकार्यात अनंत अडचणी आल्या.जवळपास ३७ वर्षे जुन्या या इमारतीला मनपा प्रशासनाने धोकादायक ठरवले होते. त्यानुसार, नोटीस बजावून मनपा प्रशासनाने हात झटकले. त्याचप्रमाणे इमारतमालकानेही सुरुवातीलाच सदनिका विकून हात वर केले. पालिकेने इमारत धोकादायक ठरवल्यानंतर काही सदनिकांच्या मालकांनी आपापल्या सदनिका खाली केल्या; मात्र पैशांच्या हव्यासापोटी त्या पुन्हा भाड्याने दिल्या. कमी भाड्याच्या लालसेतून शहरातील कामगारांनी या इमारतीत आपला संसार थाटला होता. घरमालकांनी भाड्याच्या लालसेने गरीब भाडोत्री कुटुंबीयांच्या जीवाची कोणतीही पर्वा केली नाही, हे दुर्दैव. भाड्यापोटी दोन पैसे वाचवण्याच्या मोबदल्यात आपल्या कुटुंबीयांना मृत्यूच्या दाढेत कसे ठेवले होते, याची जाणीव आज येथील प्रत्येक गरीब मजूर रहिवाशांना झाली. या दुर्घटनेतील मृतांमध्ये काही अजाण मुलांचाही समावेश आहे. या निष्पाप जीवांना मरणानंतर तरी न्याय मिळेल का, हाच खरा प्रश्न आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भिवंडीत धोकादायक इमारतींचा प्रश्न या दुर्घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. ज्याज्या वेळी भिवंडीत एखादी इमारत दुर्घटना होते, त्यात्या वेळी क्लस्टर योजना राबविण्याचा मुद्दा पुढे येतो; मात्र त्यासाठी आवश्यक बाबींचा पाठपुरावा कधीच होत नाही. त्यामुळे शहरात अनधिकृत बांधकामे व धोकादायक इमारतींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मनपा प्रशासन फक्त नोटीस बजावून हात झटकण्याचा प्रयत्न करते; मात्र इमारत धोकादायक ठरवल्यानंतर तेथील रहिवाशांचा विचार होत नसल्याने हजारो नागरिक आजही धोकादायक इमारतींमध्ये भाड्याने राहत आहेत. त्यामुळे आता तरी मनपा प्रशासन जागे होणार का, असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटना