शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

इमारत दुर्घटना : भाजीविक्रेत्या महिलेने दाखवली माणुसकी; हातगाड्यांवर वाहिले लोकांचे सामान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 01:29 IST

कोपरगावातील मैना विठू ही इमारत पडल्याची दुर्घटना कळताच स्वतःचा भाजीविक्रीचा व्यवसाय बंद ठेवून दोन हातगाड्या ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांचे घरसामान वाहून नेण्यासाठी देण्याचे औदार्य दाखवून वृंदा वाट यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.

- अनिकेत घमंडी  डोंबिवली : कोपरगावातील मैना विठू ही इमारत पडल्याची दुर्घटना कळताच स्वतःचा भाजीविक्रीचा व्यवसाय बंद ठेवून दोन हातगाड्या ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांचे घरसामान वाहून नेण्यासाठी देण्याचे औदार्य दाखवून वृंदा वाट यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.पहाटे पावणेतीन वाजता इमारत पडल्यानंतर घरांमधून जे सामान मिळेल ते तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी रहिवाशांची धावपळ सुरू होती. पण एवढ्या पहाटे टेम्पो, मोठी वाहने कशी मिळणार, या चिंतेने नागरिकांना ग्रासले होते. त्याची कल्पना येताच वृंदा वाट यांनी गुरुवारी व्यवसाय करायचा नाही, भाज्या ठेवण्यासाठी ज्या हातगाड्या होत्या, त्या नुकसानग्रस्तांच्या मदतकार्याला देण्याचा त्यांनी निर्णय घेतला.त्या म्हणाल्या की, एरव्ही माझ्याकडून वर्षानुवर्षे या नागरिकांनी भाजी नेली आहे, या सगळ्यांची मुले माझ्यासमोर मोठी झाली. संकटकाळात मदत करण्याची हीच ती संधी होती. रहिवासी पवन पाटील यांनी समस्या सांगितल्यावर मी दोन्ही हातगाड्या तेथे पाठवल्या. रस्त्यावर पडलेलं सामान युवकांनी ठेवले आणि मदतकार्याला वेग आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.एवढेच नव्हे, तर इमारत पडल्यानंतर तातडीने महिला, लहान मुलांना त्यांच्या रिकाम्या असलेल्या दोन घरांमध्ये सकाळपर्यंत थांबा असेही वृंदा यांनी सुचवले. ज्यांना कुठेही घर मिळत नसेल, त्यांनी आमच्या रिकाम्या घरात राहायला जावे, भाड्याचे नंतर बघू, नाही जमले तर दोन महिने भाडे देऊ नका, पण घाबरू नका असे सांगून त्यांनी रहिवाशांना दिलासा दिला. घराचे, सामानाचे नुकसान झाले, पण ते भरुन काढता येईल. संकटांना धैर्याने सामोरे जा, असे सांगून त्यांनी महिलांना धीर दिला. शुक्रवारी सकाळपर्यंत भाजीची गाडी त्यांनी मदतकार्याच्या ठिकाणी आणली होती. सर्व आटोपल्यावर व्यवसायाला सुरुवात करण्याच्या सूचना त्यांनी कुटुंबीयांना दिल्या होत्या.माजी नगरसेवक संजय पावशे यांनीही काही दुर्घटनाग्रस्त भाडेकरूंना राहण्यासाठी तत्काळ घर उपलब्ध करून दिलासा दिला. इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच सकाळीच अग्निशमन दल, विष्णुनगर पोलीस आणि समाजसेवकांसह इतरांनी सामाजिक बांधीलकीतून मदतकार्यासाठी तातडीने धाव घेतली. संजय पावशे यांनी टेम्पो, रिक्षा उपलब्ध करून देत रहिवाशांना धीर दिला. 

ऐन सणासुदीच्या दिवसात इमारतीचा भाग कोसळल्याने रहिवाशांवर मोठे संकट कोसळले आहे. दिवाळी तोंडावर आली असताना त्यांचा हक्काचा निवारा हिरावला गेला आहे. त्यामुळे त्यांचे संकट खूप मोठे आहे. माणुसकीच्या नात्यातून मी करीत असलेली मदत त्यांच्या संकटापुढे काहीच नाही, असा भावना वृंदा वाट यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :dombivaliडोंबिवली