शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

चेणे नदीवर पूल व बंधारा बांधणार; ३० कोटींच्या प्रकल्पाला राज्य सरकारची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 19:24 IST

मात्र तांत्रिक अडचणीमुळे पाणी योजना होण्याबाबत कार्यवाही झाली नाही व हा प्रस्ताव पडून होता.

मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील लक्ष्मी (चेणे) नदीवर पूल बांधण्यासाठी लागणाऱ्या ३० कोटी रुपयांच्या निधीस राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील ४ कोटी रुपये वर्ग केले आहेत. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, चेणे नदीचे पाणी गेले अनेक वर्षे वाया जात आहे. नदीचे पाणी अडवून त्याचा सदुपयोग व्हावा अशी आपली सततची मागणी होती.  मात्र तांत्रिक अडचणीमुळे पाणी योजना होण्याबाबत कार्यवाही झाली नाही व हा प्रस्ताव पडून होता.

पावसाळ्यात चेणे नदी पूर्ण क्षमतेने वाहत असते. या नदीत येणारे पाणी अडवून त्या पाण्यातून मीरा भाईंदर परिसरासाठी लघु पाणी पुरवठा योजना तयार करावी. बंधारा बांधला जावा, अशी पुन्हा मागणी महाविकास आघाडीचे शासन आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बैठकीत केली होती. त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

संबंधित अधिकाऱ्यांसह चेणे नदीच्या परिसराची मार्चमध्ये पाहणी झाली होती. नदीवर पूल व बंधारा बांधून पाणी अडवायचे व मीरा भाईंदर शहराला या पाण्याचा पुरवठा करायचे असे ठरले व जलसंपदा विभागाने सर्वेक्षण करून येथे पूल-बंधारा बांधण्याचे डिजाईन तयार केले होते. आता चेणे  नदीवर पूल बांधण्याच्या कामासाठी एकूण ३० कोटींच्या खर्चाला राज्य शासनाने मान्यता दिली असून पहिल्या टप्यातील कामासाठी ४ कोटी रुपयांची रक्कम ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात येत असल्याचे नगरविकास विभागाने पत्र पाठवून कळवले आहे. 

सरनाईक म्हणाले की, चेणे नदीवर पूल व बंधारा बांधून पाणी साठवले जाईल. २ दशलक्ष लिटर पाणी साठवू शकेल इतक्या क्षमतेची साठवण टाकी महापालिकेच्या माध्यमातून बांधली जाणार आहे. या पाण्याची वितरण व्यवस्था पालिकाच करेल. पालिकेचा किमान ५  दशलक्ष लिटर पाण्याचा स्वतःचा स्तोत्र निर्माण होईल.

वसई खाडीचे पाणी नदीत मिसळू नये म्हणून या बंधा-याला एका बाजूला झडपा असणार आहेत. त्या झडपांमुळे खाडीचे पाणी नदीत जाणार नाही. तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातून डोंगरावरून वाहणारे पाणी अडवले जाईल. नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात जाऊ नये यासाठी नदीच्या कडेला कुंपण भिंत बांधली जाणार आहे. पूल, बंधारा, कुंपण भिंत व साठवण टाकी अशी कामे यात होणार आहेत. 

गडचिरोली येथे अशा प्रकारे 'पूल व बंधारा' बांधून 'पाणी अडवा-पाणी जिरवा' अंतर्गत गावाला पाणीपुरवठा करण्यात आला आहे. अशा पद्धतीने चेणे नदीवर होणारा हा ठाणे जिल्ह्यातील पहिला प्रकल्प असणार आहे. नदीचे पाणी अडवून-जिरवून शहराला तसेच आजूबाजूचे शेतकरी व आदिवासी पाड्यांना या पाण्याचा उपयोग होऊ शकेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीरा-भाईंदर शहरासाठी अनेक कामे मंजूर केली आहेत. नगरविकास विभागाने चेणे नदीवरील पूल बांधकामाच्या कामाचा संपूर्ण ३० कोटीच्या खर्चासह या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहरवासीयांच्या वतीने आभार मानत असल्याचे सरनाईक म्हणाले.