शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

बीएसएनएलने थकवले महावितरणचे १५ लाख ६० हजारांचे बिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 18:40 IST

बीएसएनएल या केंद्र सरकारच्या कंपनीने महावितरणचे डोंबिवलीमधील पाच कनेक्शन मिळून १५.६० लाखांचे वीज बिल थकवले आहे. त्यामुळे महावितरणने त्यांची वीज कनेक्शन कापले आहेत.

डोंबिवली: बीएसएनएल या केंद्र सरकारच्या कंपनीने महावितरणचे डोंबिवलीमधील पाच कनेक्शन मिळून १५.६० लाखांचे वीज बिल थकवले आहे. त्यामुळे महावितरणने त्यांची वीज कनेक्शन कापले आहेत. परिणामी शहरातील हजारो ग्राहकांचे दुरध्वनी बंद पडले आहेत.त्यामुळे ग्राहक त्रस्त असून आता काय करायचे हा मोठा पेच निर्माण झाला आहे.

महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज दिक्कड यांनी दिलेल्या माहितीनूसार बीएसएनएलने गेल्या चार महिन्यांपासून वीज बिल भरणा न केल्याने नाईलाजास्तव हे पाऊल महावितरणला उचलावे लागले आहे. शहरातील मानपाडा स्टार कॉलनी, कोपर रोड, आनंदनगर यांसह टिळकनगर भागातील बीएसएनएलच्या कार्यालयामधून वीज बील भरणा न झाल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडीत केला आहे. या चार केंद्रामध्ये महावितरणच्या माध्यमातून ५ कनेक्शन मधून वीज पुरवठा केला जातो. चार महिने झाले बील थकवल्यासंदर्भात संबंधितांना नोटीसही बजावण्यात आली होती, परंतू त्यावर काहीही प्रतिक्रिया आली नाही की थकीत वीज बिलाची रक्कम भरण्यात आली. त्यामुळे चार महिन्यांचे मिळून १५ .६० लाखांचे एकूण बील झाल्यानंतर आम्हालाही वरिष्ठांकडून विचारणा होत असल्याने ही भूमिका घ्यावी लागली. मार्च महिना असून आमचेही ऑडिट होत असते, त्यात ही तफावत येणे ही गंभीर बाब वरिष्ठांनी निदर्शनास आणून दिली. त्यांच्याच आदेशांनूसार ही कार्यवाही करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

दुरध्वनी बंद असल्याकारणे अनेकांनी ठिकठिकाणी दुरध्वनी कार्यालयात खेपा मारल्या, परंतू नेमकी माहिती ग्राहकांना न मिळाल्याने ग्राहक देखिल हवालदिल झाले आहेत. शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे तांत्रिक अडचण उद्भवली असल्याच्या तर्क वितर्कांनाही उधाण आले आहे. परंतू महावितरण अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांनी वस्तूस्थिती सांगितली. त्यासंदर्भात बीएसएनएलएच्या विभागीय व्यवस्थापकांना मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :BSNLबीएसएनएलdombivaliडोंबिवली