शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठामपाच्या अग्निशमन दलात दिसणार महिला ब्रिगेड, देशातील पहिलीच महापालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 03:01 IST

ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात असून येथे नव्याने इमारतींचे इमले उभे राहत असून मॉल संस्कृती झपाट्याने वाढू लागल्याने अग्निसुरक्षेचा प्रश्न गहन होऊ लागला आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आकृतीबंधाला शासनाने मंजुरी दिल्याने आता त्यानुसार टप्प्याटप्प्याने महापालिकेने भरती प्रक्रिया सुुरू केली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या अग्निशमन दलात आता ४३५ पदांची भरती केली जाणार आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात २५० पदे भरण्यात येणार असून त्यात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, सुमारे ८१ महिलांचीही भरती केली जाणार आहे. यासंदर्भातील जाहिरात येत्या १५ दिवसांच्या आत प्रसिद्ध होणार असून त्यानंतर पुढील सोपस्कारानंतर साधारणपणे चार महिन्यांच्या आत त्या अग्निशमन दलात सामील होणार आहेत. अग्निशमन दलात महिलांना स्थान देणारी ठाणे ही देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे.ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात असून येथे नव्याने इमारतींचे इमले उभे राहत असून मॉल संस्कृती झपाट्याने वाढू लागल्याने अग्निसुरक्षेचा प्रश्न गहन होऊ लागला आहे. मागील वर्षभरात शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरीसुद्धा वित्तहानी अधिक झालेली आहे. वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणाला ठाणे अग्निशमन दल अपुरे पडू लागले आहे. काही दिवसांपूर्वी दिव्यातील अग्निशमन केंद्र सुरू केले आहे.१५ दिवसांत देणार भरतीची जाहिरातविधानसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेचा आकृतीबंध मंजूर झाला आहे. त्यानुसार, आता विविध खात्यांत पदांची भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आता ठाणे अग्निशमन दलात ४३५ पदांची भरती ही टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. त्यानुसार, आता २५० च्या आसपास पदांची भरती पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. यामध्ये महिलांना खास ३० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रस्तावावर आयुक्तांनी स्वाक्षरी केलेली असून त्याची जाहिरात येत्या १५ दिवसांत काढली जाणार आहे. त्यानंतर, इतर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर, पुढील चार महिन्यांत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानुसार, ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. आता या फायरमन महिलांनादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळणार आहे.येथे होणार नवी अग्निशमन केंद्रेभविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणि शहराचा होणारा विस्तार पाहता, ठाणे महापालिकेने नितीन कंपनी, ओवळा, देसाईगाव, कोलशेत, कळवा हॉस्पिटलजवळ, वर्तकनगर, व्होल्टास, डायघर आणि पारसिक या नऊ ठिकाणी नव्याने अग्निशमन केंदे्र सुरूकरण्याचे निश्चित केले आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला २७ सप्टेंबर २०११ रोजी मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, सध्याच्या अग्निशमन केंद्रांसाठी ४३५ च्या स्टाफची गरज आहे.ठाणे महापालिका हद्दीतसात अग्निशमन केंद्रेठाणे महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने १९९१ मध्ये अग्निशमन केंद्रासाठी लागणारा कर्मचारीवर्ग आणि भविष्यात वाढणाºया लोकसंख्येच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला होता. परंतु, आज लोकसंख्या २२ लाखांवर गेली असली, तरी कर्मचाºयांचा स्टाफ हा ३४० एवढाच आहे. त्यात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाºयांवर अधिक कामाचा ताण पडत असून त्यांना नव्या अत्याधुनिक यंत्रणांचा सराव नसल्याने त्यांची कुमक आग विझवण्याच्या ठिकाणी कमी पडत आहे. सध्या ठाणे महापालिका हद्दीत सात अग्निशमन केंद्रे असून त्यामध्ये एकूण ३४० अधिकारी, कर्मचारीवर्गाचा स्टाफ आहे. पर्यवेक्षक, तांडेल, वाहनचालक आणि फायरमन यांची कित्येक पदे रिक्त आहेत. त्याचा शुभारंभ अद्याप झालेला नाही. प्रत्यक्षात एका अग्निशमन केंद्रासाठी तीन पाळ्यांमध्ये ३२ अधिक सहा असे ३८ कर्मचाºयांचे मनुष्यबळ आवश्यक आहे. परंतु, सध्या प्रत्येक केंद्रावर मनुष्यबळाची वानवा असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :thaneठाणे